शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

भाजपला भारी, पण शिवसेना घेईल का यंदा उभारी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:18 IST

नाशिक महापालिकेत पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीपासून २०१२ पर्यंत शिवसेना भाजप यांच्यात युती होती. १९९२ मध्ये भाजपचे १०, तर शिवसेनेचे ९ ...

नाशिक महापालिकेत पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीपासून २०१२ पर्यंत शिवसेना भाजप यांच्यात युती होती. १९९२ मध्ये भाजपचे १०, तर शिवसेनेचे ९ नगरसेवक निवडून आले होेते. नंतर मात्र, त्यात भाजपाची पीछेहाट होत गेली. २००७ मध्ये शिवसेनेचे २१ नगरसेवक, तर भाजपचे १६ नगरसेवक निवडून आले. शिवसेना-भाजप युतीची सत्ता असल्याने शिवसेनेने अधिक आक्रमकता दाखविली. त्यावेळी शिवसेनेत बऱ्यापैकी एकसंधता होती. २००२ मध्ये पुन्हा शिवसेनेचे ३८, तर भाजपचे २२ नगरसेवक निवडून आले. २००७ मध्ये शिवसेनेचे संख्याबळ घटले आणि २६ नगरसेवक, तर भाजपचे १४ नगरसेवक निवडून आले. २०१२ मध्ये म्हणजे शिवसेना आणि भाजप स्वतंत्ररीतीने लढल्यानंतर त्यावेळी मनसेच्या लाटेचा दोन्ही पक्षांना फटका बसला आणि शिवसेनेचे १९, तर भाजपचे १४ नगरसेवक निवडून आले. दोघांची युती झाली असती तरी ते मनसेच्या एकूण संख्याबळाच्या म्हणजे ४० नगरसेवक होत नव्हते. त्यातच भाजपने मनसेला साथ दिली. त्यामुळे सेना भाजपचे नाशिकमध्येच नव्हे, तर वरिष्ठ पातळीवरही संबंध ताणले गेले हेाते. २०१२ मध्ये पहिल्या अडीच वर्षांत मनसे-भाजप युती असली तरी नंतर मात्र, लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात युती झाल्याने पुन्हा महापालिकेत युती झाली; परंतु त्याचा उपयोग महापौरपद गाठण्यात झाला नाही.

२०१७ मध्ये राज्यात भाजप हाच मोठा भाऊ होता आणि शिवसेनाही सत्तेत असली तरी भाजपने बाजी मारली. सुरुवातीला नाशिकमध्ये राजकीय वातावरण वेगळे होते. ६० ते ६५ नगरसेवक शिवसेनेचे आणि भाजपचे ३० ते ३५ नगरसेवक येतील असे सांगितले जात हेाते. मात्र, नंतर भाजपने डाव फिरवला. निवडणुकीसाठी लागणारी भरपूर रसद उमेदवारांपर्यंत पोहोचवली, त्याचा आणि एकूणच देशात तसेच राज्यात असलेल्या भाजपच्या लाटेचा फायदाही त्या पक्षाला झाला.

आता राज्यात सत्ता, पुन्हा महाविकास आघाडी असे समीकरण असले आणि भाजप विरोधी पक्षात असला तरी सेनेच्या दृष्टीने भाजप हेच मोठे आव्हान आहे. त्यातच भाजपत वाढलेली बेदीली, फाटाफूट बऱ्यापैकी पथ्यावर पडू शकेल असे शिवसेनेचे म्हणणे आहे.

इन्फो..

गेल्या निवडणुकीत केवळ भाजपने जादा बळ वापरले किंवा तत्सम कितीही घडमोडी असल्या तरी सेनेतील वाद विवादांचादेखील फटका बसला. उमेदवारी देण्यावरून थेट हॉटेलात नेत्यांनाच बदडून काढले. भाजपात उघड वाद दिसत होते. तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन आणि त्यावेळी त्यांचे उजवे हात म्हणून ओळखले जाणारे तत्कालीन आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडे सूत्रे होती, त्यावेळी पक्षात नवे जुने वाद खदखद होते; मात्र तरीही भाजपने बाजी मारली. सेनेत मात्र अंतर्गत वाद कायम राहिले.

इन्फाे...

शिवसेनेची महापालिकेतील वाटचाल

१९९२- ९

१९९७- २१

२००२- ३८

२००७- २६

२०१२- १९

२०१७- ३५