शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

भाजप शिवसेनेवर दुसऱ्यांदा भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:15 IST

नाशिक : खरे तर संख्याबळ पुरेसे नाही; मात्र तरीही भाजपला नामोहरम करून सत्ता जाईल अशी भीती निर्माण करण्यात शिवसेनेला ...

नाशिक : खरे तर संख्याबळ पुरेसे नाही; मात्र तरीही भाजपला नामोहरम करून सत्ता जाईल अशी भीती निर्माण करण्यात शिवसेनेला यश येते. परंतु अखेरीस भाजप सेनेपेक्षा वरचढ ठरत सत्ता कायम ठेवत असल्याचा अनुभव दीड वर्षात दुसऱ्यांदा आला आहे. महापौरपदाच्या पाठाेपाठ यंदा स्थायी समितीत सत्ता बदल होणार असे दावे शिवसेनेने केले; परंतु प्रत्यक्षात अन्य विरोधी पक्षांना वेगवेगळ्या मार्गाने शिवसेनेपासून तोडण्यात भाजपला यश आल्याने तटस्थतेची नामुष्की पत्करण्याची वेळ भाजपावर आली आणि महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आपल्या ताब्यात ठेवण्यात भाजपला यश आले आहे. महापालिकेतील कोणत्याही पंचवार्षिक निवडणुकीत काहीही घडू शकते, हे लक्षात घेऊन शिवसेनेने स्थायी समितीची सत्ता काबीज करण्यासाठी फासे टाकण्यास सुरुवात केली होती. भाजपाचे संख्याबळ ६६ वरून ६४ नगरसेवक असे झाल्याने स्थायी समितीत या पक्षाचा एक सदस्य पक्षीय तौालनिक संख्याबळानुसार कमी होतो तर शिवसेनेचा एक सदस्य वाढतो हा भाजपाचा गेल्या वर्षांपासून दावा होता. त्याला या वर्षी न्यायालयाने कौल दिला. परंतु पुढे त्याचा फायदा सेनेला घेता आला नाही. सेनेची सुरुवातीची आक्रमकता बघून भाजप अधिकच सावध झाली आणि सर्वांना वश करण्याचे कौशल्य असलेल्या गीते यांना सभापतीपद कबूल करून त्या दृष्टीनेच दगा फटका टाळण्यासाठी केवळ निवडणुकीपुरते माजी महापौर व माजी सभापती यांना समितीत स्थान देऊन सभापतीपदाच्या निवडणुकीतील स्वपक्षीयांचा संभाव्य दगा फटका टाळला.

आता राहिला प्रश्न विरोधकांचा. त्यातील मनसे अगोदरपासूनच भाजपजवळ असला तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेच्या फार जवळ गेले असेही नाही. महापौरपदाच्या निवडणुकीत दोन्ही थडीवर काही पक्षांनी हात ठेवले आणि त्यामुळे सेनेचे गणित फिस्कटले. आताही तेच होण्याची शक्यता सेनेचे अगोदरच ओळखली आणि माघार घेऊन भाजपाला बाय देऊन टाकला. त्यामुळे राजकीय वैर असूनही भाजपला सेनेने फायदा करून दिला; परंतु दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबरच मनसेलाही झटका बसला. काही जणांची अवस्था तर ‘दोन्ही घरचा पाहुणा उपाशी’ अशीही झाली. समोर स्पर्धकच नसल्याने

निवडणूक भाजपाला बऱ्यापैकी ‘स्वस्ता’त पार पडल्याची चर्चा आहे.

इन्फो...

महापालिका पंचवार्षिक कारकिर्दीतील हे अखेरचे वर्ष असल्याने त्यावेळी एखाद्या महत्त्वपूर्ण स्थानावरील सत्ता जाणे हे नगरसेवकांचे नीतीधैर्य खचवणारे ठरते. त्यामुळे भाजपचे नेते, माजी पालकमंत्री गिरीश महाजन, नाशिक शहर प्रभारी जयकुमार रावल अशा सर्वांनीच सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी केलेली पराकाष्ठा अखेर यश देणारी ठरली.