शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

भाजप शिवसेनेवर दुसऱ्यांदा भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:15 IST

नाशिक : खरे तर संख्याबळ पुरेसे नाही; मात्र तरीही भाजपला नामोहरम करून सत्ता जाईल अशी भीती निर्माण करण्यात शिवसेनेला ...

नाशिक : खरे तर संख्याबळ पुरेसे नाही; मात्र तरीही भाजपला नामोहरम करून सत्ता जाईल अशी भीती निर्माण करण्यात शिवसेनेला यश येते. परंतु अखेरीस भाजप सेनेपेक्षा वरचढ ठरत सत्ता कायम ठेवत असल्याचा अनुभव दीड वर्षात दुसऱ्यांदा आला आहे. महापौरपदाच्या पाठाेपाठ यंदा स्थायी समितीत सत्ता बदल होणार असे दावे शिवसेनेने केले; परंतु प्रत्यक्षात अन्य विरोधी पक्षांना वेगवेगळ्या मार्गाने शिवसेनेपासून तोडण्यात भाजपला यश आल्याने तटस्थतेची नामुष्की पत्करण्याची वेळ भाजपावर आली आणि महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आपल्या ताब्यात ठेवण्यात भाजपला यश आले आहे. महापालिकेतील कोणत्याही पंचवार्षिक निवडणुकीत काहीही घडू शकते, हे लक्षात घेऊन शिवसेनेने स्थायी समितीची सत्ता काबीज करण्यासाठी फासे टाकण्यास सुरुवात केली होती. भाजपाचे संख्याबळ ६६ वरून ६४ नगरसेवक असे झाल्याने स्थायी समितीत या पक्षाचा एक सदस्य पक्षीय तौालनिक संख्याबळानुसार कमी होतो तर शिवसेनेचा एक सदस्य वाढतो हा भाजपाचा गेल्या वर्षांपासून दावा होता. त्याला या वर्षी न्यायालयाने कौल दिला. परंतु पुढे त्याचा फायदा सेनेला घेता आला नाही. सेनेची सुरुवातीची आक्रमकता बघून भाजप अधिकच सावध झाली आणि सर्वांना वश करण्याचे कौशल्य असलेल्या गीते यांना सभापतीपद कबूल करून त्या दृष्टीनेच दगा फटका टाळण्यासाठी केवळ निवडणुकीपुरते माजी महापौर व माजी सभापती यांना समितीत स्थान देऊन सभापतीपदाच्या निवडणुकीतील स्वपक्षीयांचा संभाव्य दगा फटका टाळला.

आता राहिला प्रश्न विरोधकांचा. त्यातील मनसे अगोदरपासूनच भाजपजवळ असला तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेच्या फार जवळ गेले असेही नाही. महापौरपदाच्या निवडणुकीत दोन्ही थडीवर काही पक्षांनी हात ठेवले आणि त्यामुळे सेनेचे गणित फिस्कटले. आताही तेच होण्याची शक्यता सेनेचे अगोदरच ओळखली आणि माघार घेऊन भाजपाला बाय देऊन टाकला. त्यामुळे राजकीय वैर असूनही भाजपला सेनेने फायदा करून दिला; परंतु दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबरच मनसेलाही झटका बसला. काही जणांची अवस्था तर ‘दोन्ही घरचा पाहुणा उपाशी’ अशीही झाली. समोर स्पर्धकच नसल्याने

निवडणूक भाजपाला बऱ्यापैकी ‘स्वस्ता’त पार पडल्याची चर्चा आहे.

इन्फो...

महापालिका पंचवार्षिक कारकिर्दीतील हे अखेरचे वर्ष असल्याने त्यावेळी एखाद्या महत्त्वपूर्ण स्थानावरील सत्ता जाणे हे नगरसेवकांचे नीतीधैर्य खचवणारे ठरते. त्यामुळे भाजपचे नेते, माजी पालकमंत्री गिरीश महाजन, नाशिक शहर प्रभारी जयकुमार रावल अशा सर्वांनीच सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी केलेली पराकाष्ठा अखेर यश देणारी ठरली.