शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

भाजप शिवसेनेवर दुसऱ्यांदा भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:15 IST

नाशिक : खरे तर संख्याबळ पुरेसे नाही; मात्र तरीही भाजपला नामोहरम करून सत्ता जाईल अशी भीती निर्माण करण्यात शिवसेनेला ...

नाशिक : खरे तर संख्याबळ पुरेसे नाही; मात्र तरीही भाजपला नामोहरम करून सत्ता जाईल अशी भीती निर्माण करण्यात शिवसेनेला यश येते. परंतु अखेरीस भाजप सेनेपेक्षा वरचढ ठरत सत्ता कायम ठेवत असल्याचा अनुभव दीड वर्षात दुसऱ्यांदा आला आहे. महापौरपदाच्या पाठाेपाठ यंदा स्थायी समितीत सत्ता बदल होणार असे दावे शिवसेनेने केले; परंतु प्रत्यक्षात अन्य विरोधी पक्षांना वेगवेगळ्या मार्गाने शिवसेनेपासून तोडण्यात भाजपला यश आल्याने तटस्थतेची नामुष्की पत्करण्याची वेळ भाजपावर आली आणि महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आपल्या ताब्यात ठेवण्यात भाजपला यश आले आहे. महापालिकेतील कोणत्याही पंचवार्षिक निवडणुकीत काहीही घडू शकते, हे लक्षात घेऊन शिवसेनेने स्थायी समितीची सत्ता काबीज करण्यासाठी फासे टाकण्यास सुरुवात केली होती. भाजपाचे संख्याबळ ६६ वरून ६४ नगरसेवक असे झाल्याने स्थायी समितीत या पक्षाचा एक सदस्य पक्षीय तौालनिक संख्याबळानुसार कमी होतो तर शिवसेनेचा एक सदस्य वाढतो हा भाजपाचा गेल्या वर्षांपासून दावा होता. त्याला या वर्षी न्यायालयाने कौल दिला. परंतु पुढे त्याचा फायदा सेनेला घेता आला नाही. सेनेची सुरुवातीची आक्रमकता बघून भाजप अधिकच सावध झाली आणि सर्वांना वश करण्याचे कौशल्य असलेल्या गीते यांना सभापतीपद कबूल करून त्या दृष्टीनेच दगा फटका टाळण्यासाठी केवळ निवडणुकीपुरते माजी महापौर व माजी सभापती यांना समितीत स्थान देऊन सभापतीपदाच्या निवडणुकीतील स्वपक्षीयांचा संभाव्य दगा फटका टाळला.

आता राहिला प्रश्न विरोधकांचा. त्यातील मनसे अगोदरपासूनच भाजपजवळ असला तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेच्या फार जवळ गेले असेही नाही. महापौरपदाच्या निवडणुकीत दोन्ही थडीवर काही पक्षांनी हात ठेवले आणि त्यामुळे सेनेचे गणित फिस्कटले. आताही तेच होण्याची शक्यता सेनेचे अगोदरच ओळखली आणि माघार घेऊन भाजपाला बाय देऊन टाकला. त्यामुळे राजकीय वैर असूनही भाजपला सेनेने फायदा करून दिला; परंतु दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबरच मनसेलाही झटका बसला. काही जणांची अवस्था तर ‘दोन्ही घरचा पाहुणा उपाशी’ अशीही झाली. समोर स्पर्धकच नसल्याने

निवडणूक भाजपाला बऱ्यापैकी ‘स्वस्ता’त पार पडल्याची चर्चा आहे.

इन्फो...

महापालिका पंचवार्षिक कारकिर्दीतील हे अखेरचे वर्ष असल्याने त्यावेळी एखाद्या महत्त्वपूर्ण स्थानावरील सत्ता जाणे हे नगरसेवकांचे नीतीधैर्य खचवणारे ठरते. त्यामुळे भाजपचे नेते, माजी पालकमंत्री गिरीश महाजन, नाशिक शहर प्रभारी जयकुमार रावल अशा सर्वांनीच सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी केलेली पराकाष्ठा अखेर यश देणारी ठरली.