शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

काँग्रेससमोर भाजपा, माकपाचे आव्हान

By admin | Updated: February 16, 2017 23:00 IST

चुरस : राष्ट्रवादीच्या साथीमुळे काँग्रेसचे हौसले बुलंद

मनोज देवरे ल्ल कळवणजिल्हा परिषदेच्या अभोणा गटाच्या मागील चार निवडणुका यशवंत गवळी या व्यक्तीच्या भोवताली फिरल्या असून, त्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याने या गटात किंगमेकर म्हणूनच गवळी यांनी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांची भूमिका आणि उमेदवारी ही या गटात महत्त्वपूर्ण ठरणारी असल्याने त्यांना भाजपाचे नवखा उमेदवार जितेंद्र ठाकरे यांच्या रूपाने आवाहन उभे केले आहे. भाजपाचा अनुभव घेऊन कॉँग्रेसमध्ये आलेल्या गवळींसमोर भाजपाचे तोकडे आवाहन समजले जात आहे. माकपाने विश्वनाथ थैल यांना उमेदवारी देऊन आपल्या हक्काच्या मतदारासमोर निशाणीचे चिन्ह केंद्रित केले आहे.जिल्हा परिषदेच्या गेल्या चार पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेससमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे आव्हान होते; पण ते झिडकारत कॉँग्रेसने आपल्या विजयाची परंपरा कायम ठेवून इतिहास घडविला होता. यंदा मात्र राष्ट्रवादीच्या दृष्टीने जणू बदला घेण्याचेच पोषक वातावरण तयार झाले असताना केवळ जागा अदालाबदलीच्या वाटपात काँग्रेसला राष्ट्रवादीचे समर्थन लाभल्याने कॉँग्रेसचे पुन्हा एकदा हौसले बुलंद झाले आहेत. राष्ट्रवादीच्या अहिताचे समर्थन असले तरी तालुक्याच्या राजकारणाला अपेक्षित अन् पोषक ठरल्याने त्याचा परिणाम तालुक्यातील मानूर, कनाशी व खर्डे दिगर गटावर होणार आहे. भाजपा व माकपाने उमेदवार उभे करून कॉँग्रेसला आव्हान दिले आहे.सन १९९७, २००२, २००७ व २०१२ या चार पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अभोणा गटात कॉँग्रेसचा बोलबाला राहिला असून, सन २००७ वगळता अन्य तिन्ही पंचवार्षिक निवडणुकीत यशवंत गवळी परिवारातील सदस्याने बाजी मारली आहे. विमलताई बागुल यांच्या रूपाने जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण सभापतिपद व रवींद्र देवरे यांच्या रूपाने जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापतिपद गटाला मिळाले आहे.आघाडीचे बेरजेचे राजकारण गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत वचपा काढण्यासाठी या गटात राष्ट्रवादी काँग्रेस सरसावणार असे राजकीय रंग निवडणुकीत दिले गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार याच कडवे आव्हान देऊन या गटात सर्जिकल स्ट्राइक करतील, असे बोलले जात होते. काँग्रेसची परंपरा खंडित होईल, असा राजकीय अंदाज या बिगफाईटमध्ये होता.मात्र माघारीच्या आदल्या दिवशी कळवण तालुक्यात जिल्हास्तरीय नेतृत्वाने धाव घेऊन समझोता एक्स्प्रेसने अभोण्यात थांबा घेतल्याने राष्ट्रवादीला अभोण्यात थांबावे लागल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, गट आणि गणात राष्ट्रवादीचे समर्थन कॉँग्रेसला लाभणार आहे तर पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार कळवण तालुक्यात आघाडीचे बेरजेचे राजकारण खेळण्यास सुरुवात यानिमित्ताने झाली आहे.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या ग्रामीण भागाशी संलग्न असल्याने या भागात सध्या शेतमालाचा बाजारभाव, कांदा, टमाटे व भाजीपाल्याचे घसरलेले बाजारभाव, नोटाबंदीचा शेतीव्यवसायावर झालेला परिणाम व ठप्प झालेले व्यवहार, पैसे असूनही बॅँकांकडे चलन उपलब्ध नसल्याने त्याचा दैनंदिन व्यवहारावर होणारा परिणाम याचा निवडणुकीच्या निकालावर परिणाम होईल, असे शेतकरी आता उघड बोलू लागले आहेत. गटातील सर्व गावांमध्ये वैयक्तिक जनसंपर्क अन् उमेदवारांची असलेली पकडच मतपेटीतून स्पष्ट होणार असल्याने या गावांमध्ये सध्या भेटीगाठी अन प्रचाराचा चांगलाच धुराळा उडाला आहे.