शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

बिटको कोरोना सेंटर झाले निम्मे रिकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:15 IST

नाशिक शहर व जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातल्याने शासनासह सर्व वैद्यकीय यंत्रणा हतबल झाली होती. शहरातील सर्वात मोठ्या मनपाच्या बिटको ...

नाशिक शहर व जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातल्याने शासनासह सर्व वैद्यकीय यंत्रणा हतबल झाली होती. शहरातील सर्वात मोठ्या मनपाच्या बिटको कोरोना सेंटरमध्ये गेल्या पंधरा दिवसांपूर्वी ८०० हून अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल होते. रुग्णांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक वणवण करत फिरत होते, मात्र गेल्या दहा-बारा दिवसांपासून शहर व जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेऊन व्यवस्थित नीट होऊन घरी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच कोरोनाची चाचणी केल्यानंतर पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाणही अवघ्या पाच ते सहा टक्क्यावर येऊन ठेपल्याने कोरोनाबाधितांची संख्या कमी होण्यास मोठा हातभार लागला आहे.

गेल्या पंधरवड्यात बिटको कोरोना सेंटरमध्ये बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मिळविण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक सर्व स्तरावरून प्रयत्न करत होते. मात्र आता कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेऊन बरे होत आहेत. त्यामुळे बिटको कोरोना सेंटरमध्ये फक्त ३४२ रुग्ण उपचार घेत आहे. त्यामध्ये व्हेंटिलेटरवर १८ रुग्ण, ऑक्सीजन बेडवर २६० व सर्वसाधारण बेडवर १६४ रुग्ण उपचार घेत आहेत. सर्वसाधारण बेडवरील रुग्ण लवकरच घरी जातील. त्यानंतर ऑक्सिजन बेडवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची ऑक्सिजनची लेव्हल व्यवस्थित होताच त्यांना सोडून दिले जाईल. जून महिन्याच्या अखेरीपर्यंत यामधील बहुतांश रुग्ण बरे होऊन घरी जातील असे बिटको कोरोना सेंटरचे नोडल अधिकारी डॉ. जितेंद्र ज्ञानेश्वर यांनी सांगितले.

कोरोनाबाधित रुग्ण घरी येऊन बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने तसेच कोरोनाची टेस्ट केल्यानंतर पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण कमी असल्याने संबंधित रुग्ण, नातेवाईक, मित्रपरिवार त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.