शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

बायोगॅस प्रकल्प ठरतोय डोकेदुखी

By admin | Updated: March 20, 2017 23:47 IST

दुर्गंधीमुळे नाराजी : सापगाववासीयांचे मुख्याधिकाऱ्यांना साकडेत्

र्यंबकेश्वर : येथील नगरपालिकेच्या वतीने सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने साकारण्यात आलेला सापगाव शिवारातील बायोगॅस प्रकल्प सापगाववासीयांना दुर्गंधीमुळे त्रासदायक ठरत आहे. हा प्रकल्प तातडीने बंद करण्याची मागणी सरपंच सीताबाई दिवे, उपसरपंच रामदास दिवे, पंढरीनाथ दिवे आदिंसह ग्रामस्थांनी केली आहे.सुमारे १३ लाख रु पये खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. वास्तविक हा प्रकल्प उभा करताना सापगाव ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला घेणे गरजेचे होते. या प्रकल्पाचे दूषित पाणी बाजूच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत मिसळले जात असल्याने लोकांनी विहिरीचे पाणी पिणे बंद केले आहे. तथापि, थोड्याच अंतरावर असलेल्या पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. ४०० ते ५०० लोक तेथे पाणी भरतात. त्या विहिरीतदेखील बायोगॅसचे दूषित पाणी पाझरून प्यायचे पाणीदेखील दूषित होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असे भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. हॉटेलांमधील उरलेले शिळे अन्न, शहरातील ओला कचरा आदि या बायोगॅसचे खाद्य. तेथील टिपांमध्ये हे नासके अन्न ठेवले जाते. त्या अन्नाची व आउटलेटच्या घाणीची दुर्गंधी जवळपास दोन किलोमीटर अंतरावर येत असते. याबाबत सापगावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ आदिंनी त्यांची भेट घेऊन कैफीयत मांडली. (वार्ताहर)