शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

जैविक कचरा प्रदूषण बनली गंभीर बाब

By admin | Updated: April 20, 2017 00:47 IST

नाशिकरोड : जैविक कचरा प्रदूषण ही गंभीर बाब झाली असून, त्याचे व्यवस्थापन करणे ही काळाची गरज झाली आहे

नाशिकरोड : जैविक कचरा प्रदूषण ही गंभीर बाब झाली असून, त्याचे व्यवस्थापन करणे ही काळाची गरज झाली आहे. प्रत्येक रुग्णालय व्यवस्थापनाने मानव व पर्यावरणाची हानी होणार नाही, अशा पद्धतीने जैविक कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मुख्य वैज्ञानिक अधिकारी डॉ. ए. आर. सुपाते यांनी केले.विभागीय आयुक्त कार्यालय आवारातील महाराष्ट्र एनव्हायरमेन्ट इंजिनिअरिंग ट्रेनिंग अ‍ॅन्ड रिसर्च अकॅडमीत सोमवारी जैविक कचरा व्यवस्थापनावर (बायोमेडिकल वेस्ट) दोनदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. सुपाते म्हणाले की, २०१६ च्या जैविक कचरा व्यवस्थापन नियमानुसार जैविक कचऱ्याची योग्य आणि वेळेत विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधित रुग्णालयाचे मुख्य अधिकारी, व्यवस्थापक, संस्थेचे अध्यक्ष, सीईओ आदिंवर आहेत. याबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. तसेच समिती स्थापन करून व स्वत:ची वेबसाईट करून त्यावर दरवर्षी जैविक कचरा व्यवस्थापनाचा अहवाल प्रकाशित करावा. जो जैविक कचरा करतो, संकलन करतो, वाहतूक करतो, विल्हेवाट लावतो त्यांना २०१६ चे नियम लागू आहेत. रुग्णालय, लॅब, दवाखाने, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, शैक्षणिक संस्था, ब्लड बॅँक, प्रथमोपचार केंद्रे आदिंनी जैविक कचऱ्याची योग्य जागी, योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली पाहिजे, असे डॉ. सुपाते यांनी सांगितले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक एस. पी. जगदाळे, मनपा मुख्य आरोग्याधिकारी, डॉ. विजय डेकाटे, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे मुख्य अधिकारी आर. व्ही. पाटील, उपमुख्य अधिकारी आनंद कुडे, डॉ. सुरज भांगे आदि मान्यवर उपस्थित होते. दोनदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेत बंगळुरूचे डॉ. अर्जुनन्, डॉ. बी. एस. नंदकुमार, डॉ. दिनेश राजाराम, समीर हुडेलकर, डॉ. अर्जुन इसाक, चेतन सावंत आदिंनी मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळा राज्य शासन, गेफ, युनिडो, बंगळुरूचे रामय्या मेडिकल कॉलेज, एमएसआरएमसी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत राज्यातील निमंत्रित रुग्णालयांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)