शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नाही; मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा नकार
2
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
3
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
4
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट
5
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरला अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; PSU Stocks मध्ये आजही खरेदी
7
'७ विमाने पाडली होती', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जुनाच सूर लावला; भारत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?
8
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
9
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
10
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
11
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
12
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
13
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
14
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
15
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
16
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
17
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
18
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
19
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
20
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 

जिल्ह्यात कांदा लिलाव बंदमुळे कोट्यवधीचे व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:10 IST

धुळवड सणामुळे लासलगावसह जिल्ह्यातील सर्व शेतीमालाच्या लिलाव बंद राहिल्याने अर्थकारण ठप्प झाले आहे. सुमारे दीड ते ...

धुळवड सणामुळे लासलगावसह जिल्ह्यातील सर्व शेतीमालाच्या लिलाव बंद राहिल्याने अर्थकारण ठप्प झाले आहे. सुमारे दीड ते दोन लाख क्विंटल विक्री होणाऱ्या या शेतीमालाचे लिलाव बंद राहिले. त्यामुळे वीस कोटींचा फटका बसला असून, विविध व्यवसाय ठप्प झाले आहेत. सलग लिलाव बंदमुळे केवळ शेतकऱ्यांचेच नव्हे, तर व्यापारी हमाल, मापारी, ट्रक मालक, चालक, मालक व्यावसायिकांच्या दुकानाचे व्यवहार ठप्प होणार आहेत. लासलगाव ही देशातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. देशाच्या विविध भागांत जिल्ह्यातून कांदा निर्यात होत असो, एकट्या लासलगाव बाजार समितीत दिवसाला कांद्याची सुमारे ३० ते ३५ हजार क्विंटल आवक होते, तर पिंपळगाव, नाशिक, दिंडोरी, कळवण विविध बाजार समित्यांमध्ये प्रतिदिन एकूण दोन लाख हजार क्विंटल कांदा आवक होते. मात्र, उद्या व परवा सलग दोन दिवस जिल्ह्यातील कांद्याबरोबरच शेतीमालाचे लिलाव बंद असल्याने, कांदा पिकासह भाजीपाला याची प्रथमच कोंडी होत आहे. लासलगाव येथील भाजीपाला लिलावात मोठ्या प्रमाणावर आवक होत असते.

बाजार समित्या ४ एप्रिलपर्यंत बंदच

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, मार्चअखेर केले जाणारे ऑडिट, बँकांचे बंद असणारे व्यवहार अशी करणे देत, जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये दि. ४ एप्रिलपर्यंत व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. काही ठिकाणी या बाजार समित्या ८ ते १० दिवस बंद राहणार आहेत. ऐन कांदा काढणी हंगामात बाजार समित्यांचे कामकाज बंद राहणार असल्याने, शेतकऱ्यांना शेतमाल विक्री करण्यात अडचणी येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत वर्षात प्रतिबंधित क्षेत्र जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणी बाजार समिती परिसर बंद, तर पुन्हा चालू करण्याचा निर्णय घेण्यात आले होते. त्यामुळे बाजार समितीच्या कामात व्यत्यय येत गेला. काम सुलभ होण्यासाठी मजूर टंचाईचे कारण देत, खुले कांदा लिलाव गोणीत सुरू करण्यात आले. शेतकऱ्यांचा विरोध झाल्यावर पुन्हा ते खुल्या पद्धतीने सुरू झाले. आता पुन्हा ऐन काढणी हंगामात बाजार समित्यांचे कामकाज दि. ४ एप्रिलपर्यंत बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्री करताना अनेक अडचणी येणार आहेत. सध्या जिल्ह्यातील कांदा उत्पादक पट्ट्यात काढणीच्या कामांना वेग आला आहे. त्यामुळे आर्थिक गरज व अवकाळीमुळे कांद्याची टिकवण क्षमता घटली. परिणामी, शेतकरी कांदा विक्री करताना करताना दिसून येत आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर कांदा कसा विकायचा, असा प्रश्न आहे. आठ-दहा दिवस कामकाज बंद राहणे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे आहे. त्यामुळे बाजार समित्यांनी किमान दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

बाजार समित्या बंदची स्थिती

बाजार समित्या बंदची तारीख

लासलगाव २७ ते ४ एप्रिल

पिंपळगाव २९ ते ४ एप्रिल

नामपूर २६ ते ४ एप्रिल

उमराणे २७ ते ४ एप्रिल

मनमाड २९ ते ४ एप्रिल

येवला २५ ते ४ एप्रिल

सिन्नर २७ ते ४ एप्रिल