शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

भुजबळ-कांदे नाराजी नाट्यावर नाशिकमध्ये तोडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:14 IST

नाशिक : आपात्कालीन निधीच्या मुद्यावरून पालकमंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यात नांदगाव येथे झालेल्या वादावर रविवारी नाशिकमध्ये ...

नाशिक : आपात्कालीन निधीच्या मुद्यावरून पालकमंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यात नांदगाव येथे झालेल्या वादावर रविवारी नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत पडदा पडला. तत्काळ मदत देण्यासाठी पुनर्नियोजित निधीचा प्रस्ताव शासनाला पाठविला जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे नांदगावला तत्काळ निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नांदगाव येथे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घर पडझडीमुळे अनेकांना बेघर व्हावे लागले असून, त्यांना इतरत्र आश्रय घ्यावा लागला आहे. काहींचे संसार वाहून गेले आहेत. अशा परिस्थितीत आपत्कालीन निधीतून पाच टक्के निधी मिळावा अशी मागणी आमदार कांदे यांनी पालकमंत्र्यांकडे केली होती. मात्र, कोविडमुळे अशा प्रकारचा निधी शिल्लक नसल्याने तत्काळ निधी वितरण करणे शक्य नसल्याचे, तसेच ठराविक प्रक्रियेनंतर शासनाला अहवाल पाठवावा लागणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितल्याने उभयतांमध्ये जुंपली होती.

रविवारी पालकमंत्र्यांनी नाशिकमध्ये कोरोना आढावा बैठक घेतली. भुजबळ यांची कोविड बैठक होई पर्यंत कांदे जिल्हाधिकारी कार्यालयात थांबून होते. बैठक आटोपल्यानंतर भुजबळ, कांदे, जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी यांची संयुक्त ैबैठक झाली. सुमारे अर्धातास चर्चा झाल्यानंतर मदतीच्या मुद्यावर तोडगा निघाला. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नुकसानीचा निधी आणि पंचनामे करण्याबाबत शासनाचे मापदंड आहेत. याबाबत मदत व पुर्नससनमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचनादेखील दिलेल्या आहेत. त्यानुसार पंचनामे करावे लागणार असून, एकही पात्र व्यक्ती मदतीपासून वंचित राहाणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

शासनाकडून मदत येण्याची वाट न पाहता अशा वेळी तत्काळ निधी देण्याची तरतूद आहे. मात्र, कोविडमुळे जिल्हा नियोजन विभागाकडे तत्काळचा निधी उपलब्ध नसल्याने आता याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात जिल्हा परिषदेचा अहवाल प्राप्त झाला असून, नगरपालिका आणि महसूल विभागाची यादीदेखील शासनाला पाठवून पुनर्नियोजित निधी मिळावा अशी विनंती केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

त्यामुळे आता शासनाच्या नुकसानभरपाईच्या निधी मंजुरी प्रक्रियेची वाट न पाहाता नांदगावातील नुकसानग्रस्त शेतकरी, नागरिकांना तत्काळ निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरात लवकर निधी मिळविण्यासाठीचा प्रयत्न केला जाणार आहे.