शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांचा सल्ला डावलून बससेवेची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 00:28 IST

नागरिकांवर कराचा बोजा नको म्हणून बससेवेचा फेरविचार करावा, असा सल्ला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला असला तरी प्रत्यक्षात मात्र, ही सेवा सुरू होणे अटळ आहे.

ठळक मुद्देसूचनेकडे दुर्लक्ष : ठेकेदारांना लेटर आॅफ अवॉर्ड

नाशिक : नागरिकांवर कराचा बोजा नको म्हणून बससेवेचा फेरविचार करावा, असा सल्ला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला असला तरी प्रत्यक्षात मात्र, ही सेवा सुरू होणे अटळ आहे.शहर बस वाहतूक सुरू करण्याचे प्रस्ताव आत्तापर्यंत सहा वेळा फेटाळण्यात आले होते. मात्र, राज्यात भाजप-शिवसेना सरकार असताना त्यांनी हा प्रस्ताव पाठविला आणि महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने त्यांना तो मंजूर करावा लागला. त्यानंतर निविदा मागविण्यात आल्याशिवाय परिवहन कंपनी स्थापन करण्यात आली आहे. फेब्रुवारी किंवा फार तर मार्च महिन्यात ही सेवा सुरू होणार असतानाच राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर पालकमंत्री भुजबळ यांनी नाशिकसाठी राज्य सरकारने मंजूर केलेल्या मेट्रो आणि बससेवेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.नागपूरला मेट्रो रिकाम्या धावत असताना नाशिकमध्ये अशी सेवा कितपत उपयुक्त असा प्रश्न त्यांनी केला होता. तसेच बससेवा कायम तोट्यात जाणारी असल्याने त्यासाठी नाशिककरांवर बोजा लादू नका, असा सल्ला त्यांनी दिला होता. मात्र, महापालिका प्रशासनाने दोन ठेकेदारांना लेटर आॅफ अवॉर्ड दिले आहे. यात ट्रॅव्हलटाईम कार रेन्टल प्रा.लि. या ठेकेदार कंपनीला १२० सीएनजी आणि ३० डिझेल बसेस पुरवण्याचे तर सिटी लाइफलाइन या ठेकेदार कंपनीला ८० सीएनजी आणि वीस डिझेल बसेस उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहे.अगोदरच कल्पना देण्यात आली होती...गेल्या सोमवारी (दि.२०) छगन भुजबळ यांची महापौर सतीश कुलकर्णी यांनी भेट घेतली होती. त्यावेळी या सेवेचा विचार करण्याबाबत फेरविचार करण्याची चर्चा झाली असली तरी बससेवेसाठी निविदा मागवून ठेकेदार नियुक्त करण्यात आला आहे. या सेवेसाठी खूपच पुढे गेले असल्याने माघार घेणे कठीण असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका