शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

भीष्मराज बाम : पर्यावरणस्नेही व्यक्ती-संस्थांना वसुंधरा सन्मान

By admin | Updated: August 12, 2016 00:52 IST

स्वच्छता, वाहतूक नियम पालनाचे व्हावे संस्कार

नाशिक : एखाद्या खेड्याला शहर बनविण्यासाठी सर्वप्रथम सार्वजनिक स्वच्छता आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे संस्कार गरजेचे आहे. आपण शहरात राहतो हा नाशिककरांचा एक गैरसमज आहे, असे मत ज्येष्ठ क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम यांनी व्यक्त केले.वसुंधरा महोत्सवाला शहरात मंगळवारपासून (दि.९) प्रारंभ करण्यात आला. ‘माझे शहर : स्मार्ट आणि शाश्वत’ अशी या वर्षाची संकल्पना ठरविण्यात आली होती. गुरुवारी (दि.११) गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा सभागृहात विविध पर्यावरणस्नेही व्यक्ती व संस्थांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबाबत वसुंधरा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बाम बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पुरस्कारार्थी प्रसिद्ध वास्तुविशारद संजय पाटील, नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष जसपालसिंग बिरदी, ‘केअर नाशिक, ग्रीन कॉल’ अभियानचे प्रमुख धनश्री हरदास, सॅमसोनाईट वृक्षारोपण अभियानाचे वाय. एम. सिंग, वसुंधराचे व्यवस्थापक वीरेंद्र चित्राव, हेमंत बेळे, मंदार पराशरे आदि उपस्थित होते. यावेळी बाम म्हणाले, वैयक्तिक स्वच्छतेबाबत नाशिककर सजग आहेत; मात्र सार्वजनिक स्वच्छतेबाबत अद्याप या खेड्यात उदासीनता दिसून येते. स्मार्ट-शाश्वत शहर बनविण्याअगोदर सार्वजनिक स्वच्छता आणि वाहतूक नियमांचे पालन याबाबत असलेली मरगळ नाशिककरांना झटकावी लागणार आहे, तरच येणाऱ्या पिढीला एक चांगले अद्ययावत सुरक्षित शहर आपण देऊ शकू , असे बाम म्हणाले. कचरा जाळण्यासारखे मोठे दुसरे पाप नाही, त्यामुळे या पापापासून आपण दूर रहावे, असे आवाहन करताना शहराच्या प्रारंभी कचऱ्याचा ढीग साठवून तो जाळण्यात येतो, हे दुर्दैव असल्याची खंतही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. (प्रतिनिधी)