शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
4
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
5
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
6
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
7
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
8
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
9
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
10
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
11
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
12
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
13
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
14
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
15
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
16
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
17
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
18
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
19
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
20
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल

भीष्मराज बाम : पर्यावरणस्नेही व्यक्ती-संस्थांना वसुंधरा सन्मान

By admin | Updated: August 12, 2016 00:52 IST

स्वच्छता, वाहतूक नियम पालनाचे व्हावे संस्कार

नाशिक : एखाद्या खेड्याला शहर बनविण्यासाठी सर्वप्रथम सार्वजनिक स्वच्छता आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे संस्कार गरजेचे आहे. आपण शहरात राहतो हा नाशिककरांचा एक गैरसमज आहे, असे मत ज्येष्ठ क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम यांनी व्यक्त केले.वसुंधरा महोत्सवाला शहरात मंगळवारपासून (दि.९) प्रारंभ करण्यात आला. ‘माझे शहर : स्मार्ट आणि शाश्वत’ अशी या वर्षाची संकल्पना ठरविण्यात आली होती. गुरुवारी (दि.११) गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा सभागृहात विविध पर्यावरणस्नेही व्यक्ती व संस्थांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबाबत वसुंधरा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बाम बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पुरस्कारार्थी प्रसिद्ध वास्तुविशारद संजय पाटील, नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष जसपालसिंग बिरदी, ‘केअर नाशिक, ग्रीन कॉल’ अभियानचे प्रमुख धनश्री हरदास, सॅमसोनाईट वृक्षारोपण अभियानाचे वाय. एम. सिंग, वसुंधराचे व्यवस्थापक वीरेंद्र चित्राव, हेमंत बेळे, मंदार पराशरे आदि उपस्थित होते. यावेळी बाम म्हणाले, वैयक्तिक स्वच्छतेबाबत नाशिककर सजग आहेत; मात्र सार्वजनिक स्वच्छतेबाबत अद्याप या खेड्यात उदासीनता दिसून येते. स्मार्ट-शाश्वत शहर बनविण्याअगोदर सार्वजनिक स्वच्छता आणि वाहतूक नियमांचे पालन याबाबत असलेली मरगळ नाशिककरांना झटकावी लागणार आहे, तरच येणाऱ्या पिढीला एक चांगले अद्ययावत सुरक्षित शहर आपण देऊ शकू , असे बाम म्हणाले. कचरा जाळण्यासारखे मोठे दुसरे पाप नाही, त्यामुळे या पापापासून आपण दूर रहावे, असे आवाहन करताना शहराच्या प्रारंभी कचऱ्याचा ढीग साठवून तो जाळण्यात येतो, हे दुर्दैव असल्याची खंतही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. (प्रतिनिधी)