शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

भीमराज दराडे : पालकमंत्री शेत-पाणंद रस्ते योजनेंतर्गत कार्यशाळा मूलभूत सुविधांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:12 IST

येवला : ग्रामीण भागात प्रगतीसाठी रस्ते, वीज, पाणी आदी मूलभूत सुविधांची अधिक गरज आहे. कोणतीही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सकारात्मक मानसिकता ठेवून परस्पर सहकार्याने योजनेची अंमलबजावणी करावी.

ठळक मुद्देतहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजनपोलिसांचे कामदेखील कमी होईल

येवला : ग्रामीण भागात प्रगतीसाठी रस्ते, वीज, पाणी आदी मूलभूत सुविधांची अधिक गरज आहे. कोणतीही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सकारात्मक मानसिकता ठेवून परस्पर सहकार्याने योजनेची अंमलबजावणी करावी. यासाठी प्रशासन सर्व बाबतीत सहकार्य करण्यास बांधील असल्याचे प्रतिपादन भीमराज दराडे यांनी येथे केले. ग्रामीण शेतशिवारातील कच्च्या रस्त्यांचे मजबुतीकरण व्हावे यासाठी शासनाने जाहीर केलेल्या पालकमंत्री शेत-पाणंद रस्ते योजनेची माहिती देण्यासाठी येथील महात्मा फुले नाट्यगृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे होते. जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक, येवला उपविभागीय अधिकारी कार्यालय, येवला तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक संस्थेच्या विनीता वाघ, सारिका चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले.तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांनी, पालकमंत्री योजनेंतर्गत शेतशिवारातील रस्ते झाले तर गावे तंटामुक्त होण्यास मदत होईल. पोलिसांचे कामदेखील कमी होईल. न्यायालयीन कामकाजातील शेतबांध व रस्ते यावरून असलेले वाद निकालात निघतील, असे मत मांडले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित गटविकास अधिकारी सुनील अहिरे, उपअभियंता वाघ, जलसंधारणच्या सहायक कार्यकारी अभियंता सोनल पाटील, बाळासाहेब लोखंडे, सहायक गटविकास अधिकारी ए. ए. शेख, नायब तहसीलदार सविता पठारे, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, मजूर फेडरेशनचे माजी संचालक गोरख शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.उपस्थितांना पालकमंत्री शेत- पाणंद रस्ते योजनेची प्रत्येक गावात यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी शासनाच्या परिपत्रकाची प्रत देण्यात आली. कार्यशाळा यशस्वीतेसाठी संतोष तरटे, उत्तम खांडवे, शरद घाडगे, आनंद शंकपाळ, विजय चव्हाण, विशाल राऊत, विलास साबळे, रमेश कुंभार्डे, सुधीर पाटसकर यांनी परिश्रम घेतले. दत्ता महाले यांनी सूत्रसंचालन केले. नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगले यांनी आभार मानले.