शहरं
Join us  
Trending Stories
1
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
2
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
3
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
4
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
5
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
6
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
7
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
8
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
9
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
10
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
11
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
12
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
14
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
16
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
17
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
18
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
19
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
20
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video

भाम प्रकल्पग्रस्त महिलांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:32 IST

नाशिक : भाम धरणात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन झालेले नाही, धरणाच्या पायथ्याशी असूनही पिण्यासाठी पाणी नाही तर रस्ते, गटार या मूलभूत सुविधाही न देण्यात आल्याने इगतपुरी तालुक्यातील भरवज-निरपण येथील प्रकल्पग्रस्त महिलांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक देऊन पुनवर्सन कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. अखेर येत्या २४ आॅगस्ट रोजी पुनर्वसित ठिकाणी भेट देऊन प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी समजावून घेण्यास प्रशासन तयार झाल्याने सायंकाळी ५ वाजता महिलांनी ठिय्या मागे घेतला.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालय : पुनर्वसनाच्या प्रश्नावर आक्रमक

नाशिक : भाम धरणात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन झालेले नाही, धरणाच्या पायथ्याशी असूनही पिण्यासाठी पाणी नाही तर रस्ते, गटार या मूलभूत सुविधाही न देण्यात आल्याने इगतपुरी तालुक्यातील भरवज-निरपण येथील प्रकल्पग्रस्त महिलांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक देऊन पुनवर्सन कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. अखेर येत्या २४ आॅगस्ट रोजी पुनर्वसित ठिकाणी भेट देऊन प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी समजावून घेण्यास प्रशासन तयार झाल्याने सायंकाळी ५ वाजता महिलांनी ठिय्या मागे घेतला.भाम धरणाची यंदा घळभरणी करण्यात आली असून, धरणात शंभर टक्के पाणी साठले आहे. तत्पूर्वी ४८० भाम धरणग्रस्तांचे मे महिन्यात भरवज-निरपण येथे स्थलांतर व पुनर्वसन करण्यात आले. आता मात्र पाऊस सुरू असल्याने प्रकल्पग्रस्तांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून, धरण पूर्णपणे भरल्याने धरणाच्या खालच्या बाजूला करण्यात आलेल्या पुनर्वसनाच्या घरांमध्ये जमिनीखालून पाण्याचे झरे निघू लागले आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या पाणीपुरवठा करण्यासाठी पाइपलाइन टाकण्यात आली, परंतु अजूनही नळांना पाणी येत नाही, त्यामुळे धरणाच्या पायथ्याशी असूनही महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. १५ आॅगस्ट रोजी प्रकल्पग्रस्तांनी नांदूरमधमेश्वर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन प्रश्न सोडविण्याची मागणी केली, परंतु त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गुरुवारी सकाळी असंख्य महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपली व्यथा मांडली. अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व त्यानंतर त्यांनी पुनर्वसन कार्यालयाच्या बाहेरच ठिय्या मांडला. काही ठिकाणी हातपंप करण्यात आले, परंतु ते नादुरुस्त आहेत. गटारींचे काम अपूर्ण असल्याने सांडपाणी वाहून जाण्याची सोय नाही. रस्तादेखील मातीचा असून, घोटी ते भरवज-निरपण हा नवीन रस्ता तयार करण्यात यावा, शेतजमिनीत बांधलेल्या घरासाठी विद्युत पुरवठा करण्यात यावा, प्रकल्पग्रस्तांचा दारिद्र्यरेषेत समावेश करण्यात यावा, अशा मागण्या आहेत.