शहरं
Join us  
Trending Stories
1
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
2
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
3
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
4
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
5
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
6
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
7
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
8
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
9
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
10
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
12
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
13
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
14
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
15
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!
16
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
17
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
18
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
19
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
20
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!

भाम प्रकल्पग्रस्त महिलांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:32 IST

नाशिक : भाम धरणात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन झालेले नाही, धरणाच्या पायथ्याशी असूनही पिण्यासाठी पाणी नाही तर रस्ते, गटार या मूलभूत सुविधाही न देण्यात आल्याने इगतपुरी तालुक्यातील भरवज-निरपण येथील प्रकल्पग्रस्त महिलांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक देऊन पुनवर्सन कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. अखेर येत्या २४ आॅगस्ट रोजी पुनर्वसित ठिकाणी भेट देऊन प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी समजावून घेण्यास प्रशासन तयार झाल्याने सायंकाळी ५ वाजता महिलांनी ठिय्या मागे घेतला.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालय : पुनर्वसनाच्या प्रश्नावर आक्रमक

नाशिक : भाम धरणात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन झालेले नाही, धरणाच्या पायथ्याशी असूनही पिण्यासाठी पाणी नाही तर रस्ते, गटार या मूलभूत सुविधाही न देण्यात आल्याने इगतपुरी तालुक्यातील भरवज-निरपण येथील प्रकल्पग्रस्त महिलांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक देऊन पुनवर्सन कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. अखेर येत्या २४ आॅगस्ट रोजी पुनर्वसित ठिकाणी भेट देऊन प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी समजावून घेण्यास प्रशासन तयार झाल्याने सायंकाळी ५ वाजता महिलांनी ठिय्या मागे घेतला.भाम धरणाची यंदा घळभरणी करण्यात आली असून, धरणात शंभर टक्के पाणी साठले आहे. तत्पूर्वी ४८० भाम धरणग्रस्तांचे मे महिन्यात भरवज-निरपण येथे स्थलांतर व पुनर्वसन करण्यात आले. आता मात्र पाऊस सुरू असल्याने प्रकल्पग्रस्तांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून, धरण पूर्णपणे भरल्याने धरणाच्या खालच्या बाजूला करण्यात आलेल्या पुनर्वसनाच्या घरांमध्ये जमिनीखालून पाण्याचे झरे निघू लागले आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या पाणीपुरवठा करण्यासाठी पाइपलाइन टाकण्यात आली, परंतु अजूनही नळांना पाणी येत नाही, त्यामुळे धरणाच्या पायथ्याशी असूनही महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. १५ आॅगस्ट रोजी प्रकल्पग्रस्तांनी नांदूरमधमेश्वर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन प्रश्न सोडविण्याची मागणी केली, परंतु त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गुरुवारी सकाळी असंख्य महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपली व्यथा मांडली. अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व त्यानंतर त्यांनी पुनर्वसन कार्यालयाच्या बाहेरच ठिय्या मांडला. काही ठिकाणी हातपंप करण्यात आले, परंतु ते नादुरुस्त आहेत. गटारींचे काम अपूर्ण असल्याने सांडपाणी वाहून जाण्याची सोय नाही. रस्तादेखील मातीचा असून, घोटी ते भरवज-निरपण हा नवीन रस्ता तयार करण्यात यावा, शेतजमिनीत बांधलेल्या घरासाठी विद्युत पुरवठा करण्यात यावा, प्रकल्पग्रस्तांचा दारिद्र्यरेषेत समावेश करण्यात यावा, अशा मागण्या आहेत.