शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
3
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
4
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
5
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
6
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
7
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
8
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
9
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
10
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
11
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
12
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
13
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
14
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
15
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
16
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
17
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
18
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

पाणीप्रश्नावर भाजपाची भंबेरी !

By admin | Published: November 06, 2015 11:02 PM

नाकीनव : म्हणे महापौरांनी बैठकीसाठी निमंत्रितच केले नाही !

नाशिक : मराठवाड्यासाठी पाणी सोडल्यानंतर नाशिकमध्ये सुरू झालेल्या आंदोलनाच्या वेळी गायब असलेल्या भाजपा आमदारांनी मंगळवारी आपण याविषयावर संवेदनशील असून, नाशिककरां-बरोबरच असल्याचा दावा केला. मात्र त्याचवेळी महापौरांनी आमंत्रण दिले नाही म्हणून पाणीप्रश्नी बैठकीला आणि आंदोलनात सहभागी झालो नाही, असा केलेला दावा त्यांच्याच अंगलट आला. माध्यम प्रतिनिधींनी प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर भाजपाची भंबेरी उडाली. आणि मित्रपक्ष शिवसेना आणि विरोधकांवर दुगण्या देत राजकारण करू नये, असा सल्ला देत हा विषय थांबविण्याचे आवाहन करण्यात आले.मराठवाड्याला दारणा आणि गंगापूर धरणातून पाणी सोडण्याच्या वेळी चुकीची माहिती सादर करण्यात आल्याने उच्च न्यायालयाने पिण्यासाठी पाणी सोडण्याचे आदेश दिल्यानंतर तातडीने रात्रीच्या वेळी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गेल्या रविवारपासून मनसे, कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने पाणी पेटवले असून, आंदोलने होत आहेत. परंतु भाजपाच्या शहरातील तिन्ही आमदारांचा किंवा पदाधिकाऱ्यांचा यात कोणताही समावेश नसल्याने तिन्ही आमदारांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जाग आलेल्या भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप यांनी शुक्रवारी आणि शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांपासून शहरात भाजपाविषयी शहरात वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न सुरू असून, भाजपाच्या आमदारांसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. शहरातून तीन भाजपा आमदार निवडून आल्याने अन्य पक्षांना ते सहन झालेले नाही. त्यातून महापालिकेत यंदाच्या पंचवार्षिकमध्ये दुसऱ्या टर्ममध्ये विरोधकांची अनिष्ट युती झाली असून, त्यातून हेच घडणार होते, असे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी सांगितले.आमदार देवयानी फरांदे यांनी मराठवाड्याला समन्यायी पद्धतीने पाणीवाटपाचा निर्णय हा राज्यात कॉँग्रेस आघाडी सरकार असताना झाला. त्यावेळीच जलनियामक प्राधिकरणाला संवैधानिक अधिकार मिळाले. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे वजनदार मंत्री होते, त्यावेळी या सर्व प्रकाराला विरोध का झाला नाही, असा प्रश्न केला. प्राधिकरणाला पाणी सोडण्याचे न्यायिक अधिकार असल्याने जलसंपदामंत्री अथवा शासन त्यात हस्तक्षेप करू शकले नाही. आळंदी धरणाला गंगापूर धरणाच्या समूहात दाखविले, धरणातील मृत साठाही जिवंत दाखविल्यामुळे गोंधळ झाल्याचे सांगतानाच प्रा. फरांदे यांनी या सर्वबाबतीत दुरुस्ती करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले.जोड