शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
5
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
6
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
7
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
8
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
9
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
10
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
11
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
12
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
13
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
14
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
15
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
16
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
17
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
18
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
19
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
20
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी

पाणीप्रश्नावर भाजपाची भंबेरी !

By admin | Updated: November 6, 2015 23:03 IST

नाकीनव : म्हणे महापौरांनी बैठकीसाठी निमंत्रितच केले नाही !

नाशिक : मराठवाड्यासाठी पाणी सोडल्यानंतर नाशिकमध्ये सुरू झालेल्या आंदोलनाच्या वेळी गायब असलेल्या भाजपा आमदारांनी मंगळवारी आपण याविषयावर संवेदनशील असून, नाशिककरां-बरोबरच असल्याचा दावा केला. मात्र त्याचवेळी महापौरांनी आमंत्रण दिले नाही म्हणून पाणीप्रश्नी बैठकीला आणि आंदोलनात सहभागी झालो नाही, असा केलेला दावा त्यांच्याच अंगलट आला. माध्यम प्रतिनिधींनी प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर भाजपाची भंबेरी उडाली. आणि मित्रपक्ष शिवसेना आणि विरोधकांवर दुगण्या देत राजकारण करू नये, असा सल्ला देत हा विषय थांबविण्याचे आवाहन करण्यात आले.मराठवाड्याला दारणा आणि गंगापूर धरणातून पाणी सोडण्याच्या वेळी चुकीची माहिती सादर करण्यात आल्याने उच्च न्यायालयाने पिण्यासाठी पाणी सोडण्याचे आदेश दिल्यानंतर तातडीने रात्रीच्या वेळी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गेल्या रविवारपासून मनसे, कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने पाणी पेटवले असून, आंदोलने होत आहेत. परंतु भाजपाच्या शहरातील तिन्ही आमदारांचा किंवा पदाधिकाऱ्यांचा यात कोणताही समावेश नसल्याने तिन्ही आमदारांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जाग आलेल्या भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप यांनी शुक्रवारी आणि शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांपासून शहरात भाजपाविषयी शहरात वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न सुरू असून, भाजपाच्या आमदारांसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. शहरातून तीन भाजपा आमदार निवडून आल्याने अन्य पक्षांना ते सहन झालेले नाही. त्यातून महापालिकेत यंदाच्या पंचवार्षिकमध्ये दुसऱ्या टर्ममध्ये विरोधकांची अनिष्ट युती झाली असून, त्यातून हेच घडणार होते, असे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी सांगितले.आमदार देवयानी फरांदे यांनी मराठवाड्याला समन्यायी पद्धतीने पाणीवाटपाचा निर्णय हा राज्यात कॉँग्रेस आघाडी सरकार असताना झाला. त्यावेळीच जलनियामक प्राधिकरणाला संवैधानिक अधिकार मिळाले. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे वजनदार मंत्री होते, त्यावेळी या सर्व प्रकाराला विरोध का झाला नाही, असा प्रश्न केला. प्राधिकरणाला पाणी सोडण्याचे न्यायिक अधिकार असल्याने जलसंपदामंत्री अथवा शासन त्यात हस्तक्षेप करू शकले नाही. आळंदी धरणाला गंगापूर धरणाच्या समूहात दाखविले, धरणातील मृत साठाही जिवंत दाखविल्यामुळे गोंधळ झाल्याचे सांगतानाच प्रा. फरांदे यांनी या सर्वबाबतीत दुरुस्ती करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले.जोड