शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

लाभ जाहीर झाले, अंमलबजावणीही तत्पर व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:40 IST

धनगर समाजाला अनुसूचित जमातींसाठी असलेल्या २२ प्रकारच्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत. या संदर्भातील निर्णय राज्य मंत्रिमंडळाने जाहीर केला आहे. सरकारच्या या निर्णयासंदर्भात समाज बांधवांच्या जाणून घेतलेल्या प्रतिक्रिया.

नाशिक : धनगर समाजाला अनुसूचित जमातींसाठी असलेल्या २२ प्रकारच्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत. या संदर्भातील निर्णय राज्य मंत्रिमंडळाने जाहीर केला आहे. सरकारच्या या निर्णयासंदर्भात समाज बांधवांच्या जाणून घेतलेल्या प्रतिक्रिया.राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अनुसूचित जमातींमधील २२ सवलती धनगर समाजाला लागू होणार आहेत. यामध्ये मेंढपाळांसाठी जागा उपलब्ध करणे, विद्यार्थ्यांना वसतिगृहाची निर्मिती करणे, समाजासाठी दहा हजार घरकुल बांधणे, मेंढपाळांना चराई अनुदान देणे, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देणे तसेच परीक्षा शुल्कात सवलती देणे यांसारख्या विविध सवलती लागू करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या ४० वर्षांपासून समाजातर्फे संघर्ष सुरू होता. सरकारने जो आज निर्णय दिला त्यासाठी आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. पण आमच्या ज्या मूळ मागण्या आहे त्या अद्याप प्रलंबित ठेवण्यात आल्या आहे. तसेच समाजाला एसटी प्रवर्गाचे प्रमाणपत्र अपेक्षित होते त्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला नाही. तसेच जो निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीच्या आधी समाजासाठी वापरण्यात यावा.— बापूसाहेब शिंदे, प्रदेशाध्यक्ष, धनगर समाज संघर्ष समितीसरकारने दिलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. त्यांनी जो दिलेला निर्णयामुळे समाजासाठी फायदा होईल याची अपेक्षा आहे, इतर पक्षांनी धनगर समाजाला नेहमीच डावलले होते. पण भाजपा सरकार धनगर समाजासाठी नेहमीच सकारात्मक राहिले होते. या निर्णयाचा फायदा आमच्या मुला-मुलांसाठी होईल असे वाटते. त्यामुळे लोकशाहीचे पण मी आभार मानतो. तसेच सरकारने दिलेला निर्णयाची अंबलबजावणी लवकर करावी हीच अपेक्षा आहे.- आप्पासाहेब टरपले, कार्याध्यक्ष,धनगर समाज संघर्ष समितीया निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार मानतो. आमची मागणी ही शंभर टक्के पूर्ण झाली नसली तरी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आमचे आज हे एक पाऊल पुढे पडले आहे. या निर्णयामुळे मुख्यत: मेंढपाळाच्या मुलांना शिक्षणासाठी याचा फायदा होईल असे वाटते. तसेच इतर मागण्यांसाठी समाजासाठी पुन्हा प्रयत्न केले जातील.- डॉ. मेघश्याम करडे, जिल्हाध्यक्ष,धनगर समाज समिती, अमरावतीशासनाने जाहीर केलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. निर्णय अत्यंत चांगला असल्याने समाजाच्या वतीने आम्ही मुख्यमंत्री फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांचे आभार मानतो. मात्र त्याबाबतचा अध्यादेश त्वरित निघणे आवश्यक आहे. परंतु, जोपर्यंत खऱ्या अर्थाने लाभ मिळत नाही, तोपर्यंत त्याची शाश्वती वाटत नाही.- संगीता पाटील, यशवंत सेना महिला आघाडी अध्यक्षमुख्यमंत्री फडणवीसआणि रासपचे नेते महादेव जानकर यांनी मिळून घेतलेला निर्णय हा समाजासाठी मोठादूरगामी परिणाम करणारा ठरेल. कॉँग्रेसच्या शासकांनी गेल्या ७० वर्षांत जे आमच्या समाजाला दिले नाही, ते सारं काही भाजपाने समाजाला दिले असल्याने त्यांचे आम्हीआभारी आहोत.- राजेंद्र कोठारे, उत्तर महाराष्टÑ अध्यक्ष, रासप

टॅग्स :GovernmentसरकारDhangar Reservationधनगर आरक्षण