शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

लाभ जाहीर झाले, अंमलबजावणीही तत्पर व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:40 IST

धनगर समाजाला अनुसूचित जमातींसाठी असलेल्या २२ प्रकारच्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत. या संदर्भातील निर्णय राज्य मंत्रिमंडळाने जाहीर केला आहे. सरकारच्या या निर्णयासंदर्भात समाज बांधवांच्या जाणून घेतलेल्या प्रतिक्रिया.

नाशिक : धनगर समाजाला अनुसूचित जमातींसाठी असलेल्या २२ प्रकारच्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत. या संदर्भातील निर्णय राज्य मंत्रिमंडळाने जाहीर केला आहे. सरकारच्या या निर्णयासंदर्भात समाज बांधवांच्या जाणून घेतलेल्या प्रतिक्रिया.राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अनुसूचित जमातींमधील २२ सवलती धनगर समाजाला लागू होणार आहेत. यामध्ये मेंढपाळांसाठी जागा उपलब्ध करणे, विद्यार्थ्यांना वसतिगृहाची निर्मिती करणे, समाजासाठी दहा हजार घरकुल बांधणे, मेंढपाळांना चराई अनुदान देणे, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देणे तसेच परीक्षा शुल्कात सवलती देणे यांसारख्या विविध सवलती लागू करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या ४० वर्षांपासून समाजातर्फे संघर्ष सुरू होता. सरकारने जो आज निर्णय दिला त्यासाठी आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. पण आमच्या ज्या मूळ मागण्या आहे त्या अद्याप प्रलंबित ठेवण्यात आल्या आहे. तसेच समाजाला एसटी प्रवर्गाचे प्रमाणपत्र अपेक्षित होते त्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला नाही. तसेच जो निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीच्या आधी समाजासाठी वापरण्यात यावा.— बापूसाहेब शिंदे, प्रदेशाध्यक्ष, धनगर समाज संघर्ष समितीसरकारने दिलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. त्यांनी जो दिलेला निर्णयामुळे समाजासाठी फायदा होईल याची अपेक्षा आहे, इतर पक्षांनी धनगर समाजाला नेहमीच डावलले होते. पण भाजपा सरकार धनगर समाजासाठी नेहमीच सकारात्मक राहिले होते. या निर्णयाचा फायदा आमच्या मुला-मुलांसाठी होईल असे वाटते. त्यामुळे लोकशाहीचे पण मी आभार मानतो. तसेच सरकारने दिलेला निर्णयाची अंबलबजावणी लवकर करावी हीच अपेक्षा आहे.- आप्पासाहेब टरपले, कार्याध्यक्ष,धनगर समाज संघर्ष समितीया निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार मानतो. आमची मागणी ही शंभर टक्के पूर्ण झाली नसली तरी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आमचे आज हे एक पाऊल पुढे पडले आहे. या निर्णयामुळे मुख्यत: मेंढपाळाच्या मुलांना शिक्षणासाठी याचा फायदा होईल असे वाटते. तसेच इतर मागण्यांसाठी समाजासाठी पुन्हा प्रयत्न केले जातील.- डॉ. मेघश्याम करडे, जिल्हाध्यक्ष,धनगर समाज समिती, अमरावतीशासनाने जाहीर केलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. निर्णय अत्यंत चांगला असल्याने समाजाच्या वतीने आम्ही मुख्यमंत्री फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांचे आभार मानतो. मात्र त्याबाबतचा अध्यादेश त्वरित निघणे आवश्यक आहे. परंतु, जोपर्यंत खऱ्या अर्थाने लाभ मिळत नाही, तोपर्यंत त्याची शाश्वती वाटत नाही.- संगीता पाटील, यशवंत सेना महिला आघाडी अध्यक्षमुख्यमंत्री फडणवीसआणि रासपचे नेते महादेव जानकर यांनी मिळून घेतलेला निर्णय हा समाजासाठी मोठादूरगामी परिणाम करणारा ठरेल. कॉँग्रेसच्या शासकांनी गेल्या ७० वर्षांत जे आमच्या समाजाला दिले नाही, ते सारं काही भाजपाने समाजाला दिले असल्याने त्यांचे आम्हीआभारी आहोत.- राजेंद्र कोठारे, उत्तर महाराष्टÑ अध्यक्ष, रासप

टॅग्स :GovernmentसरकारDhangar Reservationधनगर आरक्षण