शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

लाभ जाहीर झाले, अंमलबजावणीही तत्पर व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:40 IST

धनगर समाजाला अनुसूचित जमातींसाठी असलेल्या २२ प्रकारच्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत. या संदर्भातील निर्णय राज्य मंत्रिमंडळाने जाहीर केला आहे. सरकारच्या या निर्णयासंदर्भात समाज बांधवांच्या जाणून घेतलेल्या प्रतिक्रिया.

नाशिक : धनगर समाजाला अनुसूचित जमातींसाठी असलेल्या २२ प्रकारच्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत. या संदर्भातील निर्णय राज्य मंत्रिमंडळाने जाहीर केला आहे. सरकारच्या या निर्णयासंदर्भात समाज बांधवांच्या जाणून घेतलेल्या प्रतिक्रिया.राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अनुसूचित जमातींमधील २२ सवलती धनगर समाजाला लागू होणार आहेत. यामध्ये मेंढपाळांसाठी जागा उपलब्ध करणे, विद्यार्थ्यांना वसतिगृहाची निर्मिती करणे, समाजासाठी दहा हजार घरकुल बांधणे, मेंढपाळांना चराई अनुदान देणे, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देणे तसेच परीक्षा शुल्कात सवलती देणे यांसारख्या विविध सवलती लागू करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या ४० वर्षांपासून समाजातर्फे संघर्ष सुरू होता. सरकारने जो आज निर्णय दिला त्यासाठी आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. पण आमच्या ज्या मूळ मागण्या आहे त्या अद्याप प्रलंबित ठेवण्यात आल्या आहे. तसेच समाजाला एसटी प्रवर्गाचे प्रमाणपत्र अपेक्षित होते त्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला नाही. तसेच जो निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीच्या आधी समाजासाठी वापरण्यात यावा.— बापूसाहेब शिंदे, प्रदेशाध्यक्ष, धनगर समाज संघर्ष समितीसरकारने दिलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. त्यांनी जो दिलेला निर्णयामुळे समाजासाठी फायदा होईल याची अपेक्षा आहे, इतर पक्षांनी धनगर समाजाला नेहमीच डावलले होते. पण भाजपा सरकार धनगर समाजासाठी नेहमीच सकारात्मक राहिले होते. या निर्णयाचा फायदा आमच्या मुला-मुलांसाठी होईल असे वाटते. त्यामुळे लोकशाहीचे पण मी आभार मानतो. तसेच सरकारने दिलेला निर्णयाची अंबलबजावणी लवकर करावी हीच अपेक्षा आहे.- आप्पासाहेब टरपले, कार्याध्यक्ष,धनगर समाज संघर्ष समितीया निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार मानतो. आमची मागणी ही शंभर टक्के पूर्ण झाली नसली तरी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आमचे आज हे एक पाऊल पुढे पडले आहे. या निर्णयामुळे मुख्यत: मेंढपाळाच्या मुलांना शिक्षणासाठी याचा फायदा होईल असे वाटते. तसेच इतर मागण्यांसाठी समाजासाठी पुन्हा प्रयत्न केले जातील.- डॉ. मेघश्याम करडे, जिल्हाध्यक्ष,धनगर समाज समिती, अमरावतीशासनाने जाहीर केलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. निर्णय अत्यंत चांगला असल्याने समाजाच्या वतीने आम्ही मुख्यमंत्री फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांचे आभार मानतो. मात्र त्याबाबतचा अध्यादेश त्वरित निघणे आवश्यक आहे. परंतु, जोपर्यंत खऱ्या अर्थाने लाभ मिळत नाही, तोपर्यंत त्याची शाश्वती वाटत नाही.- संगीता पाटील, यशवंत सेना महिला आघाडी अध्यक्षमुख्यमंत्री फडणवीसआणि रासपचे नेते महादेव जानकर यांनी मिळून घेतलेला निर्णय हा समाजासाठी मोठादूरगामी परिणाम करणारा ठरेल. कॉँग्रेसच्या शासकांनी गेल्या ७० वर्षांत जे आमच्या समाजाला दिले नाही, ते सारं काही भाजपाने समाजाला दिले असल्याने त्यांचे आम्हीआभारी आहोत.- राजेंद्र कोठारे, उत्तर महाराष्टÑ अध्यक्ष, रासप

टॅग्स :GovernmentसरकारDhangar Reservationधनगर आरक्षण