शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
4
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
5
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
6
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
7
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
8
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
9
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
10
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
11
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
12
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
13
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
14
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
15
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
16
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
17
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
18
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
19
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
20
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."

ग्रंथपालाची अर्धवेळची सेवा ग्राह्य धरून जुन्या पेन्शन योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:21 IST

नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित जयरामभाई हायस्कूलच्या ग्रंथपाल वीणा उपासनी यांनी अर्धवेळ म्हणून नियुक्ती असलेली ग्रंथपालपदाची सेवा ...

नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित जयरामभाई हायस्कूलच्या ग्रंथपाल वीणा उपासनी यांनी अर्धवेळ म्हणून नियुक्ती असलेली ग्रंथपालपदाची सेवा ग्राह्य धरून त्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे राज्यात अशाप्रकारची सेवा बजावणाऱ्या ग्रंथपालांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. डी. धनुका व आर. आय. चागला यांनी ४ ऑगस्ट रोजी

याचिकाकर्त्याच्या बाजूने निकाल दिला. त्यांच्या वतीने ॲड. प्रणिता हिंगमिरे यांनी काम पहिले.

वीणा उपासनी या अर्धवेळ ग्रंथपालपदावर २० ऑगस्ट १९९५ ते ३१ जुलै २००८ पर्यंत कार्यरत होत्या. १ ऑगस्ट २००८ रोजी त्या पूर्णवेळ झाल्या. या दोन्ही नियुक्तीस शिक्षणाधिकारी यांची मान्यता प्राप्त होती. १ नोव्हेंबर २००५ नंतरची पूर्णवेळ पदावर नियुक्ती असल्यामुळे जुनी पेन्शन योजनेच्या लाभापासून त्या वंचित राहिल्या होत्या. शासनाच्या निर्देशानुसार डीसीपीएस/एनपीएसचे खाते उघडले होते. त्यानुसार त्यांची वर्गणी कपात होत होती. सेवानिवृत्तीपूर्वी त्यांनी अर्धवेळ सेवा ग्राह्य धरून जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळावा यासाठी अकौंटंट जनरल मुंबई यांच्याकडे शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत सेवानिवृत्तिवेतन प्रस्ताव दाखल केला. हा प्रस्ताव १ नोव्हेंबर २००५ नंतरची नियुक्तीचे कारण देत पेन्शन देता येत नाही असे पत्र देऊन अकौंटंट जर्नल यांनी प्रस्ताव अमान्य केला. त्याच्या विरोधात न्याय मिळण्यासाठी वीणा उपासनी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने अकौंटंट जनरल यांचे अर्धवेळ सेवानिवृत्तिवेतनासाठी ग्राह्य नसल्याचे १९ ऑक्टोबर २०२० चे आदेश रद्द ठरवून याचिकाकर्त्याला अर्धवेळची सेवा ग्राह्य धरून जुन्या पेन्शन योजनेचा लाभ द्यावा तसेच डीसीपीएस - एनपीएस खात्यात आतापर्यंत जमा असलेली रक्कम तीन महिन्याच्या आत याचिकाकर्त्यास देण्याचे आदेश पारित केले आहे. या निर्णयामुळे राज्यातील जे अर्धवेळ ग्रंथपाल २००५ नंतर पूर्णवेळ झालेले आहे त्यांना या निर्णयाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोट...

अर्धवेळ सेवा ही शंभर टक्के अनुदानित शाळेवरील नियमित सेवा असूनही अशा अर्धवेळ ग्रंथपालांना जुन्या पेन्शन योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जाते. सारख्याच मागणीसाठी ग्रंथपालांना न्यायालयात धाव घ्यावी लागत आहे. न्यायालयाने निकाल देऊनही शिक्षण विभागाकडून मुदतीत कार्यवाही होत नाही. त्यामुळे शासनाने सर्व पात्र ग्रंथपालांसाठी शासन निर्णय त्वरित पारीत करून इतर पात्र ग्रंथपालांना न्याय द्यावा.

- विलास सोनार, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदचे ग्रंथालय शिक्षक विभाग.