शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
4
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
5
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
6
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
7
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
8
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
9
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
10
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
11
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
12
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
13
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
14
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
15
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
16
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
17
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
18
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
19
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
20
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...

बाबासाहेबांंच्या नावाचा वापर फायद्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 01:31 IST

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ६५ वर्षांच्या आयुष्यात जन्मापासून उपेक्षा अवहेलना आणि धिक्काराचा सामना करूनही वंचितांचे, दलितांचे शोषण, गरिबी व रुढी परंपरा याविरोधात कोणत्याही विद्वेशाशिवाय विद्रोह करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला. परंतु वर्तमान स्थितीत राजकीय नेत्यांकडून राजकीय स्वार्थासाठी पावलोपावली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊनही विद्वेश आणि स्वार्थपूर्ण राजकारण केले जात असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते विवेक घळसासी यांनी केले.

ठळक मुद्देविवेक घळसासी : हिरे स्मृती व्याख्यानमाला

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ६५ वर्षांच्या आयुष्यात जन्मापासून उपेक्षा अवहेलना आणि धिक्काराचा सामना करूनही वंचितांचे, दलितांचे शोषण, गरिबी व रुढी परंपरा याविरोधात कोणत्याही विद्वेशाशिवाय विद्रोह करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला. परंतु वर्तमान स्थितीत राजकीय नेत्यांकडून राजकीय स्वार्थासाठी पावलोपावली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊनही विद्वेश आणि स्वार्थपूर्ण राजकारण केले जात असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते विवेक घळसासी यांनी केले.ग्रामोदय शिक्षण संस्था आणि हिरे परिवारातर्फे रावसाहेब थोरात सभागृहात दिवंगत रामराव तथा पोपटराव हिरे यांच्या स्मृती व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर माजी केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील, महापौर रंजना भानसी, भदंत सुगत महास्तगी (बुद्धगया),भदंत हर्षबोधी (बिहार), भदंत सुगत, भदंत आर्यनाग माजी महापौर गुरुमित बग्गा, नगरसेवक दिनकर पाटील आदी उपस्थित होते. विवेक घळसासी म्हणाले, राजकीय पुढारी पदोपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा राजकीय स्वार्थासाठी उपयोग करतात.विविध वादग्रस्त विधानांच्या माध्यमातून समाजात संभ्रम निर्माण करण्याचे काम केले जाते. हेच पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यमग्नतेचा आदर्श न घेता संसदेत अनुपस्थित राहतात. अथवा अनाकलनीय गोंधळ घालून वेळ वाया घालवतात. त्यामुळे डॉ. बाबासाहेब यांचे विचार आणि वास्तविक जीवनचरित्र सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.दरम्यान, माजी महापौर गुरुमित बग्गा यांनी पोपटराव हिरे एक कुशल संघटक व राजकारणी असलेले अवलिया व्यक्तिमत्व असल्याचे सांगत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रास्ताविक नगरसेवक योगेश हिरे यांनी केले. सूत्रसंचालन साहेबराव अहिरे यांनी केले.लोकसभा निवडणुकीत डॉ. बाबासाहेबांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले. परंतु याची कल्पना असूनही बाबासाहेबांनी विद्वेशाचे राजकारण न करता विद्रोहाची भूमिका घेतली. अशीच भूमिका बाबासाहेबांच्या अनुयायांसह सर्वच समाजाने घेऊन जातीयता, वर्णभेद, रुढी परंपरा, अंधश्रद्धा, अन्यायाविरोधात विद्वेशरहित विद्रोह करण्याची गरज असल्याचे घळसासी म्हणाले.

टॅग्स :Politicsराजकारण