शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

बाबासाहेबांंच्या नावाचा वापर फायद्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 01:31 IST

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ६५ वर्षांच्या आयुष्यात जन्मापासून उपेक्षा अवहेलना आणि धिक्काराचा सामना करूनही वंचितांचे, दलितांचे शोषण, गरिबी व रुढी परंपरा याविरोधात कोणत्याही विद्वेशाशिवाय विद्रोह करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला. परंतु वर्तमान स्थितीत राजकीय नेत्यांकडून राजकीय स्वार्थासाठी पावलोपावली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊनही विद्वेश आणि स्वार्थपूर्ण राजकारण केले जात असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते विवेक घळसासी यांनी केले.

ठळक मुद्देविवेक घळसासी : हिरे स्मृती व्याख्यानमाला

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ६५ वर्षांच्या आयुष्यात जन्मापासून उपेक्षा अवहेलना आणि धिक्काराचा सामना करूनही वंचितांचे, दलितांचे शोषण, गरिबी व रुढी परंपरा याविरोधात कोणत्याही विद्वेशाशिवाय विद्रोह करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला. परंतु वर्तमान स्थितीत राजकीय नेत्यांकडून राजकीय स्वार्थासाठी पावलोपावली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊनही विद्वेश आणि स्वार्थपूर्ण राजकारण केले जात असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते विवेक घळसासी यांनी केले.ग्रामोदय शिक्षण संस्था आणि हिरे परिवारातर्फे रावसाहेब थोरात सभागृहात दिवंगत रामराव तथा पोपटराव हिरे यांच्या स्मृती व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर माजी केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील, महापौर रंजना भानसी, भदंत सुगत महास्तगी (बुद्धगया),भदंत हर्षबोधी (बिहार), भदंत सुगत, भदंत आर्यनाग माजी महापौर गुरुमित बग्गा, नगरसेवक दिनकर पाटील आदी उपस्थित होते. विवेक घळसासी म्हणाले, राजकीय पुढारी पदोपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा राजकीय स्वार्थासाठी उपयोग करतात.विविध वादग्रस्त विधानांच्या माध्यमातून समाजात संभ्रम निर्माण करण्याचे काम केले जाते. हेच पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यमग्नतेचा आदर्श न घेता संसदेत अनुपस्थित राहतात. अथवा अनाकलनीय गोंधळ घालून वेळ वाया घालवतात. त्यामुळे डॉ. बाबासाहेब यांचे विचार आणि वास्तविक जीवनचरित्र सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.दरम्यान, माजी महापौर गुरुमित बग्गा यांनी पोपटराव हिरे एक कुशल संघटक व राजकारणी असलेले अवलिया व्यक्तिमत्व असल्याचे सांगत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रास्ताविक नगरसेवक योगेश हिरे यांनी केले. सूत्रसंचालन साहेबराव अहिरे यांनी केले.लोकसभा निवडणुकीत डॉ. बाबासाहेबांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले. परंतु याची कल्पना असूनही बाबासाहेबांनी विद्वेशाचे राजकारण न करता विद्रोहाची भूमिका घेतली. अशीच भूमिका बाबासाहेबांच्या अनुयायांसह सर्वच समाजाने घेऊन जातीयता, वर्णभेद, रुढी परंपरा, अंधश्रद्धा, अन्यायाविरोधात विद्वेशरहित विद्रोह करण्याची गरज असल्याचे घळसासी म्हणाले.

टॅग्स :Politicsराजकारण