शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
2
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
3
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
4
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
5
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
6
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
7
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
8
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय
9
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
10
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
11
गवार, मटारचा भाव २०० रुपयांवर; पालक ६०, तर मेथी ५० रुपये जुडी, दसऱ्याला भाजीपाल्याला महागाईची फोडणी
12
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
13
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
14
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
15
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
16
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
17
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
18
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
19
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
20
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?

बाबासाहेबांंच्या नावाचा वापर फायद्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 01:31 IST

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ६५ वर्षांच्या आयुष्यात जन्मापासून उपेक्षा अवहेलना आणि धिक्काराचा सामना करूनही वंचितांचे, दलितांचे शोषण, गरिबी व रुढी परंपरा याविरोधात कोणत्याही विद्वेशाशिवाय विद्रोह करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला. परंतु वर्तमान स्थितीत राजकीय नेत्यांकडून राजकीय स्वार्थासाठी पावलोपावली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊनही विद्वेश आणि स्वार्थपूर्ण राजकारण केले जात असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते विवेक घळसासी यांनी केले.

ठळक मुद्देविवेक घळसासी : हिरे स्मृती व्याख्यानमाला

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ६५ वर्षांच्या आयुष्यात जन्मापासून उपेक्षा अवहेलना आणि धिक्काराचा सामना करूनही वंचितांचे, दलितांचे शोषण, गरिबी व रुढी परंपरा याविरोधात कोणत्याही विद्वेशाशिवाय विद्रोह करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला. परंतु वर्तमान स्थितीत राजकीय नेत्यांकडून राजकीय स्वार्थासाठी पावलोपावली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊनही विद्वेश आणि स्वार्थपूर्ण राजकारण केले जात असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते विवेक घळसासी यांनी केले.ग्रामोदय शिक्षण संस्था आणि हिरे परिवारातर्फे रावसाहेब थोरात सभागृहात दिवंगत रामराव तथा पोपटराव हिरे यांच्या स्मृती व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर माजी केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील, महापौर रंजना भानसी, भदंत सुगत महास्तगी (बुद्धगया),भदंत हर्षबोधी (बिहार), भदंत सुगत, भदंत आर्यनाग माजी महापौर गुरुमित बग्गा, नगरसेवक दिनकर पाटील आदी उपस्थित होते. विवेक घळसासी म्हणाले, राजकीय पुढारी पदोपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा राजकीय स्वार्थासाठी उपयोग करतात.विविध वादग्रस्त विधानांच्या माध्यमातून समाजात संभ्रम निर्माण करण्याचे काम केले जाते. हेच पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यमग्नतेचा आदर्श न घेता संसदेत अनुपस्थित राहतात. अथवा अनाकलनीय गोंधळ घालून वेळ वाया घालवतात. त्यामुळे डॉ. बाबासाहेब यांचे विचार आणि वास्तविक जीवनचरित्र सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.दरम्यान, माजी महापौर गुरुमित बग्गा यांनी पोपटराव हिरे एक कुशल संघटक व राजकारणी असलेले अवलिया व्यक्तिमत्व असल्याचे सांगत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रास्ताविक नगरसेवक योगेश हिरे यांनी केले. सूत्रसंचालन साहेबराव अहिरे यांनी केले.लोकसभा निवडणुकीत डॉ. बाबासाहेबांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले. परंतु याची कल्पना असूनही बाबासाहेबांनी विद्वेशाचे राजकारण न करता विद्रोहाची भूमिका घेतली. अशीच भूमिका बाबासाहेबांच्या अनुयायांसह सर्वच समाजाने घेऊन जातीयता, वर्णभेद, रुढी परंपरा, अंधश्रद्धा, अन्यायाविरोधात विद्वेशरहित विद्रोह करण्याची गरज असल्याचे घळसासी म्हणाले.

टॅग्स :Politicsराजकारण