शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

आधारासाठी लाभार्थी घरी सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 00:12 IST

बॅँकेतील कर्ज खात्याशी आधारलिंक नसलेल्या कर्जदार शेतऱ्यांचे खाते आधार लिंक करण्याची कार्यवाही जिल्ह्यात जवळपास पूर्ण झालेली आहे. आता केवळ सातशे कर्जदार शेतकऱ्यांचे आधार लिंक करण्याचे काम शिल्लक राहिले आहे. परंतु प्रशासनापुढे भलताच पेच निर्माण झाला असून या लाभार्थींपैकी अनेकांना शोधण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

ठळक मुद्देप्रशासनापुढे अडचणी : आता राहिले अवघे ७०० लिंकिंग

नाशिक : बॅँकेतील कर्ज खात्याशी आधारलिंक नसलेल्या कर्जदार शेतऱ्यांचे खाते आधार लिंक करण्याची कार्यवाही जिल्ह्यात जवळपास पूर्ण झालेली आहे. आता केवळ सातशे कर्जदार शेतकऱ्यांचे आधार लिंक करण्याचे काम शिल्लक राहिले आहे. परंतु प्रशासनापुढे भलताच पेच निर्माण झाला असून या लाभार्थींपैकी अनेकांना शोधण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी त्यांचे बॅँक खाते आधारलिंक असणे अपेक्षित असल्याने जिल्ह्यातील सुमारे साडेसात हजार खातेधारकांचे खाते आधार लिंक करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविली जात आहे. यामध्ये जिल्हा बॅँकेच्या ४६४ खातेदारांचा समावेश आहे, तर उर्वरित अन्य बॅँकांमधील खातेदार शेतकरी आहेत. शेतकºयांपर्यंत प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी पोहोचले आहेत, मात्र संबंधित कर्जदार शेतकरी घरी नसल्याने त्यांचे आधारलिंकिंग राहिले आहे. बहुतेक शेतकरी हे बाहेरगावी गेल्याने त्यांची भेट होऊ शकलेली नाही तर काही शेतकºयांचे ‘थम-इंप्रेशन’ जुळत नसल्याने त्यांच्याकडे वारंवार चकरा मराव्या लागत आहेत. ही फार मोठी अडचण नसल्याने संपूर्ण शेतकºयाचे आधारलिंकिंग होण्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.या खातेदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविली जात आहे. सदर काम पूर्णत्वास आल्यासारखेच आहे. परंतु शंभर टक्केकाम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली असून, ज्या शेतकºयांचे दोन लाखांपर्यंत पीककर्ज आहे अशा शेतकºयांच्या खात्यात दोन लाख रुपये जमा होणार आहेत. सदर योजना आधारलिंक असल्याने ज्या कर्जदार शेतकºयांचे बॅँक खाते कर्जखात्याशी लिंक आहे अशाच शेतकºयांना त्याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे या योजनेपासून कुणीही वंचित राहू नये यासाठी आधारलिंक नसलेल्या शेतकºयांची नावे शोधून अशा शेतकºयांपर्यंत जिल्हा प्रशासन पोहोचले आहे. आता केवळ सातशे शेतकºयांचे आधार लिंक राहिले आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड