शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

पंचायत समिती कार्यालयावर घरकुल लाभार्थींचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:01 IST

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तालुक्यातील लाभार्थींना घराचे पूर्ण बांधकाम करूनही घरकुलाचा तिसरा व चौथा हप्ता अद्यापही मिळाला नसल्याच्या कारणाने येथील पंचायत समिती कार्यालयावर भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देसुरगाणा : डीवायएफआय संघटनेच्या वतीने आयोजन

सुरगाणा : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तालुक्यातील लाभार्थींना घराचे पूर्ण बांधकाम करूनही घरकुलाचा तिसरा व चौथा हप्ता अद्यापही मिळाला नसल्याच्या कारणाने येथील पंचायत समिती कार्यालयावर भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.मोर्चानंतर झालेल्या सभेत उपसभापती इंद्रजित गावित, पेठ येथील डीवायएफआयचे तालुकाध्यक्ष महेश टोपले, पालघर येथील पं. स. सदस्य नंदू हाडळ, सुभाष भोये, पांडुरंग गायकवाड, भारती चौधरी, तुळशीराम खोटरे, मोनिका पवार, देवीदास हाडळ, एसएफआयचे राज्य कमिटी अध्यक्ष अजय टोपले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थींच्या मागणीबाबतचे निवेदन घरकुल योजनेचे सहायक प्रकल्प अधिकारी डॉ. संजय माळी यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण घरकुल ब यादीतील ३९७४ लाभार्थींना शासनामार्फत पहिला व दुसरा हप्ता मिळाला आहे, मात्र तिसरा व चौथा हप्ता लाभार्थीने घराचे बांधकाम पूर्ण करूनही मिळालेला नाही. परिणामी गरीब आदिवासी लाभार्थींची मोठी हेळसांड होत आहे. तिसरा व चौथा हप्ता मिळेल या भरवशावर उसनवारी करून घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले आहे. हप्ता तर मिळालाच नाही मात्र ज्यांच्याकडून उसनवारी केली ते पैसे मागत असल्याने लाभार्थी मेटाकुटीला आला आहे. राज्य व केंद्र सरकारच्या परस्परविरोधी राजकारणाचा बळी गरीब आदिवासी लाभार्थी पडू नये यासाठी या मोर्चाचे आयोजन डीवायएफआय संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी रोजगार हमी योजनेचे दोन वर्षांपासून पैसे मिळाले नसल्याचे तसेच विहिर प्रकरण व घरकुल हफ्त्यासाठी लाभार्थी कडून पैसे घेत असल्याची तक्र ार करण्यात आली. यापुढे असे घडल्यास तक्रार करण्याचे व संबंधितावर कारवाई करण्याचे आश्वासन सहायक प्रकल्प अधिकारी डॉ. संजय माळी व गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी दिले.आश्वासनानंतर उपोषण मागेगुरुवारपासून (दि.६) यासंदर्भात पंचायत समितीसमोर उपोषण सुरू करण्यात आले होते. मात्र, शासनाचे आदेश प्राप्त होताच पुढील कार्यवाही तालुकास्तरावरून तत्काळ करण्याचे लेखी आश्वासन पंचायत समितीकडून देण्यात आल्याने उपोषणास बसलेले सुभाष भोये, पांडुरंग गायकवाड, राहुल अहेर, मेनका पवार, भारती चौधरी, नितीन गावित, तुळशीराम खोटरे, देवीदास हाडळ, योगेश जाधव, कृष्णा भोये, लक्ष्मण कनोजे, राहुल गावित, कान्हा हिरे, नितीन पवार यांनी उपोषण मागे घेतले.

टॅग्स :Strikeसंपpanchayat samitiपंचायत समिती