शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थी राहिले दूर, भलतीकडेच अनुदानाचा पूर

By admin | Updated: June 20, 2014 01:18 IST

दाभाडी ; शासनाकडून गारपीटग्रस्तांना मिळालेल्या अनुदानाच्या रकमा आणि लाभार्थींची नावे बघून ग्रामीण भागात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

घनश्याम अहिरे ल्ल दाभाडीशासनाकडून गारपीटग्रस्तांना मिळालेल्या अनुदानाच्या रकमा आणि लाभार्थींची नावे बघून ग्रामीण भागात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. खरे लाभार्थी दूर आणि भलत्यालाच लाभ मिळत असल्याने गारपीटग्रस्त नेमके कोण, हाच प्रश्न सर्वांसमोर निर्माण झाला आहे.अवकाळी पावसाने डाळींब, मकाधारक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित चुकून गेले. हातातोंडाशी आलेले पीक तुफान वारा अन् गारपिटीने हिरावून नेले. होत्याचं नव्हतं करून टाकणाऱ्या या स्थितीत लोकप्रतिनिधी अन् शासन जागे झाले. पंचनाम्याचे फर्मान सुटले. त्यानुसार अल्पवेळेत शंभर टक्के पंचनाम्याचे शिवधनुष्य महसूल विभागाने पेलले. परंतु झालेल्या पंचनाम्याचे ‘खरे’ परिणाम आता अनुदानाच्या यादीवरून दिसू लागले आहेत. ज्याचे लाखो रुपयाचे डाळींब, मका मातीमोल झालेत, जनावरं मेलीत, शेतमळ्यातील घरं पडलीत; चारा नेस्तनाबूत झाला. दुधाचा व्यवसाय बुडाला, लाखोंची हानी सोसणाऱ्या या त्रस्त बळीराजाला अनुदानातून फुल ना फुलाची पाकळी गवसेल अशी अपेक्षा होती. लाखोंची डाळींब शेती बरबाद झाली असताना मायबाप सरकारने हेक्टरी (अडीच एकर) क्षेत्राला १६ ते १७ हजारांची (जाहीर मदतीच्या ५० टक्के) मदत दिली. खरे लाभार्थी राहिले दूर गारपिटीने ज्यांचे पीक नव्हे ढेकळं फुटलीत त्यांना अनुदान असा प्रकार बघून खऱ्या नुकसानभरपाई ग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचेच काम शासनाने केले आहे. त्यामुळे गारपीटग्रस्तांचे पंचनामे करताना शासनाने अल्पमुदतीत शंभर टक्के पंचनामे करण्याचे फर्मान महसूल विभागाने किती पारदर्शकपणे (?) केले याचा नमुना यानिमित्ताने सिद्ध झाला आहे. प्राप्त अनुदान याद्या बघून मालेगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात बळीराजा शासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत असताना ‘लाल फितीच्या’ या अनोख्या कामगिरीवर जाहीरपणे टीका करीत आहेत.डाळींब, मका व खरीप पिकांच्या नुकसानात अनेकांची नावे नाहीत. अधिकाऱ्यांच्या नातेवाइकांची यादीत वर्णी लागल्याची चर्चा अनेक गावांमध्ये ऐकावयास मिळत आहेत. नातेवाइकांचे ‘उखळ पांढरं’ करणारे पंचनामेधारक अधिकारी वर्गाविषयी प्रचंड नाराजीचा सूर माळमाथा व काटवन भागातून व्यक्त होतो आहे, तर डाळिंबाचे लाखो व कोटीचे नुकसान सोसणारा फळधारक शेतकरी या अनुदानामुळे हतबलता व्यक्त करीत आहे.महसूल विभागाकडून प्रत्यक्षात पंचनामे झालेले असतानाही अशा क्षेत्रधारकांना कोणत्या कारणास्तव डावलण्यात आली हे खरे तर न उलगडणारे कोडे बनले आहे. यादीत नावे नसलेल्या शेतकरी वर्गाकडून पंचनामे करणाऱ्यांची चौकशी करण्यात यावी तर पंचनाम्यानंतर नुकसानग्रस्तांची नावे कोणत्या कारणास्तव वगळण्यात आली याचा खुलासा अधिकारी वर्गाने करावा व सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.