शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

जिल्ह्यातील २०८ शाळांमध्ये वाजली घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:12 IST

नाशिक : राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आठवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या असून जिल्ह्यातील ३३५ कोरोनामुक्त ...

नाशिक : राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आठवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या असून जिल्ह्यातील ३३५ कोरोनामुक्त गावांपैकी २०८ शाळांमध्ये सोमवारी (दि. १९) प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा घंटा वाजली आहे. उर्वरित शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

कोरोनामुक्त गावांतील शाळा सुरू करताना शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून ज्या शिक्षकांची चाचणी झालेली आहे, अशाच शिक्षकांनी पहिल्या दिवसापासून शाळेत विद्यार्थ्यांना अध्यापन सुरू केल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी दिली. उर्वरित शिक्षकांच्या चाचण्या व लसीकरण टप्प्या-टप्प्याने झाल्यानंतर अन्य शाळा सुरू करण्याचे शिक्षण विभागाचे प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील कोरोना स्थिती आणि कोरोनापश्चात आजारांबाबत आढावा घेतल्यानंतर शनिवारी (दि. १७) जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाच्या शाळा सुरू करण्याबाबतच्या सूचनांनुसार ग्रामीण भागातील ज्या गावांत मागील एका महिन्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही, अशा गावांतील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली. ती देतानाच जिल्ह्यातील ३३५ कोरोनामुक्त गावांतील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या गावांमधील २०८ शाळा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार शिक्षण व आरोग्य विभाग, तसेच संबंधित ग्रामपंचायतींच्या मदतीने शाळा स्वच्छता व शाळेचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असून विद्यार्थ्यांसाठी मास्क, वर्गात विद्यार्थ्यांमधील सुरक्षित अंतर, पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरच शाळा सुरू करण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी दिली आहे. तसेच सोमवारपासून सुरू केलेल्या सर्व २०८ शाळांतील शिक्षकांची प्राधान्यक्रमाने आरटीपीसीआर तपासणी करून घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, राज्य शासनाच्या सूचनांप्रमाणे दर सोमवारी कोरोनामुक्त गावांची यादी प्रसिद्ध होणार असल्याने पुढील आठवड्यात आणखी काही शाळा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इन्फो-

जिल्ह्यातील कोरोनामुक्त ३३५ गावांतील शाळांमध्ये जवळपास एक लाख ३१ हजार १५९ विद्यार्थी आहेत. त्यापैकी ४२ हजार ८४० विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांच्या पाल्यास शाळेत पाठविण्यासाठी लेखी संमती दिली आहे. त्यामुळे शिक्षण व आरोग्य विभागाने जिल्हा प्रशासनाच्या सूचनांनुसार स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतींच्या मदतीने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करून शाळा सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.