शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २०८ शाळांमध्ये वाजली घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:12 IST

नाशिक : राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आठवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या असून जिल्ह्यातील ३३५ कोरोनामुक्त ...

नाशिक : राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आठवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या असून जिल्ह्यातील ३३५ कोरोनामुक्त गावांपैकी २०८ शाळांमध्ये सोमवारी (दि. १९) प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा घंटा वाजली आहे. उर्वरित शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

कोरोनामुक्त गावांतील शाळा सुरू करताना शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून ज्या शिक्षकांची चाचणी झालेली आहे, अशाच शिक्षकांनी पहिल्या दिवसापासून शाळेत विद्यार्थ्यांना अध्यापन सुरू केल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी दिली. उर्वरित शिक्षकांच्या चाचण्या व लसीकरण टप्प्या-टप्प्याने झाल्यानंतर अन्य शाळा सुरू करण्याचे शिक्षण विभागाचे प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील कोरोना स्थिती आणि कोरोनापश्चात आजारांबाबत आढावा घेतल्यानंतर शनिवारी (दि. १७) जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाच्या शाळा सुरू करण्याबाबतच्या सूचनांनुसार ग्रामीण भागातील ज्या गावांत मागील एका महिन्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही, अशा गावांतील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली. ती देतानाच जिल्ह्यातील ३३५ कोरोनामुक्त गावांतील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या गावांमधील २०८ शाळा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार शिक्षण व आरोग्य विभाग, तसेच संबंधित ग्रामपंचायतींच्या मदतीने शाळा स्वच्छता व शाळेचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असून विद्यार्थ्यांसाठी मास्क, वर्गात विद्यार्थ्यांमधील सुरक्षित अंतर, पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरच शाळा सुरू करण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी दिली आहे. तसेच सोमवारपासून सुरू केलेल्या सर्व २०८ शाळांतील शिक्षकांची प्राधान्यक्रमाने आरटीपीसीआर तपासणी करून घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, राज्य शासनाच्या सूचनांप्रमाणे दर सोमवारी कोरोनामुक्त गावांची यादी प्रसिद्ध होणार असल्याने पुढील आठवड्यात आणखी काही शाळा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इन्फो-

जिल्ह्यातील कोरोनामुक्त ३३५ गावांतील शाळांमध्ये जवळपास एक लाख ३१ हजार १५९ विद्यार्थी आहेत. त्यापैकी ४२ हजार ८४० विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांच्या पाल्यास शाळेत पाठविण्यासाठी लेखी संमती दिली आहे. त्यामुळे शिक्षण व आरोग्य विभागाने जिल्हा प्रशासनाच्या सूचनांनुसार स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतींच्या मदतीने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करून शाळा सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.