शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

जिल्ह्यातील २०८ शाळांमध्ये वाजली घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:12 IST

नाशिक : राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आठवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या असून जिल्ह्यातील ३३५ कोरोनामुक्त ...

नाशिक : राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आठवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या असून जिल्ह्यातील ३३५ कोरोनामुक्त गावांपैकी २०८ शाळांमध्ये सोमवारी (दि. १९) प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा घंटा वाजली आहे. उर्वरित शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

कोरोनामुक्त गावांतील शाळा सुरू करताना शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून ज्या शिक्षकांची चाचणी झालेली आहे, अशाच शिक्षकांनी पहिल्या दिवसापासून शाळेत विद्यार्थ्यांना अध्यापन सुरू केल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी दिली. उर्वरित शिक्षकांच्या चाचण्या व लसीकरण टप्प्या-टप्प्याने झाल्यानंतर अन्य शाळा सुरू करण्याचे शिक्षण विभागाचे प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील कोरोना स्थिती आणि कोरोनापश्चात आजारांबाबत आढावा घेतल्यानंतर शनिवारी (दि. १७) जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाच्या शाळा सुरू करण्याबाबतच्या सूचनांनुसार ग्रामीण भागातील ज्या गावांत मागील एका महिन्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही, अशा गावांतील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली. ती देतानाच जिल्ह्यातील ३३५ कोरोनामुक्त गावांतील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या गावांमधील २०८ शाळा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार शिक्षण व आरोग्य विभाग, तसेच संबंधित ग्रामपंचायतींच्या मदतीने शाळा स्वच्छता व शाळेचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असून विद्यार्थ्यांसाठी मास्क, वर्गात विद्यार्थ्यांमधील सुरक्षित अंतर, पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरच शाळा सुरू करण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी दिली आहे. तसेच सोमवारपासून सुरू केलेल्या सर्व २०८ शाळांतील शिक्षकांची प्राधान्यक्रमाने आरटीपीसीआर तपासणी करून घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, राज्य शासनाच्या सूचनांप्रमाणे दर सोमवारी कोरोनामुक्त गावांची यादी प्रसिद्ध होणार असल्याने पुढील आठवड्यात आणखी काही शाळा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इन्फो-

जिल्ह्यातील कोरोनामुक्त ३३५ गावांतील शाळांमध्ये जवळपास एक लाख ३१ हजार १५९ विद्यार्थी आहेत. त्यापैकी ४२ हजार ८४० विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांच्या पाल्यास शाळेत पाठविण्यासाठी लेखी संमती दिली आहे. त्यामुळे शिक्षण व आरोग्य विभागाने जिल्हा प्रशासनाच्या सूचनांनुसार स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतींच्या मदतीने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करून शाळा सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.