शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

पाण्यासाठी सुरु असलेले आमरण उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 19:43 IST

अंदरसुल : पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई झाल्याने व प्रशासनाच्या वेळ काडू धोरणाचा निषेध करीत बोकटे ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांनी सुरु केलेले आमरण उपोषण अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देबोकटे ग्रामपंचायत समोर ग्रामस्थांची एकजुट; अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन

अंदरसुल : पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई झाल्याने व प्रशासनाच्या वेळ काडू धोरणाचा निषेध करीत बोकटे ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांनी सुरु केलेले आमरण उपोषण अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.बोकटे येथे पालखेड कालव्याच्या आवर्तनातही पाणी मिळाले नाही, नंतर येवल्याच्या पाण्याबरोबर आरक्षीत असलेल्या पालखेडच्या पाण्याने बंधारे कोरडेच राहिल्याने परिसरातील पाण्याचे झरे आटल्याने विहिरी बोरवेल कोरडे झाले आहेत, त्या मुळे बोकटे पंचक्र ोशीत भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे, त्या मुळे कुटुंबासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्या मुळे दोन तीन किलो मीटर अंतरावर गोरगरिबांना पाण्यासाठी भटकंती करावे लागत आहे. म्हणुन गावांसाठी, वाडीवस्तीवर टँकर कुटुंबासाठी तसेच मोठ्या प्रमाणात असलेल्या पशुधनासाठी ग्रामस्थांनी बोकटे ग्रामपंचायतीकडे लेखी निवेदन दिले होते, कि गावावरती निर्माण झालेला पाणी प्रश्नावर त्वरीत दखल घेऊन टँकर सुरु करावे. मात्र अपेक्षीत टँकर सुरु न झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी शुक्रवारी दि. ५ एप्रिल रोजी बोकटे येथील संभाजी दाभाडे, किरण दाभाडे, भाऊसाहेब कदम, बापुसाहेब दाभाडे, हितेश दाभाडे, प्रदीप दाभाडे, निखिल दाभाडे यांनी बोकटे येथे ग्रामपंचायती समोर आमरण उपोषण सुरू केले.त्यात बोकटे येथील असंख्य महिला हांडे घेऊन ग्रामपंचायत समोर सुरु असलेल्या उपोषणात सहभागी झाल्या. त्यावेळीं गावातील ग्रामस्थांनी टँकर द्या, नळाने सुरू करा पण पाणी पुरवठा करा. अशी मागणी केली. पण प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे आज हि परिस्थीती निर्माण झाली असून नंतर गटविकास अधिकारी यांच्याकडे उपोषणाची त्वरीत दखल घेऊन बोकटेकरांना न्याय मिळवून द्यावा यासाठी विनंती केली. म्हणुन पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आहिरे यांनी बोकटे येथे उपोषणकर्त्यांची भेट घेतली. बोकटेसह वाडी-वस्तीवर टँकर सुरुकरण्याबाबत लेखी आश्वासन देऊन महिलांसह गावकऱ्यांना दिलासा मिळाला व उपोषण मागे घेण्यात आले.