शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

पाण्यासाठी सुरु असलेले आमरण उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 19:43 IST

अंदरसुल : पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई झाल्याने व प्रशासनाच्या वेळ काडू धोरणाचा निषेध करीत बोकटे ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांनी सुरु केलेले आमरण उपोषण अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देबोकटे ग्रामपंचायत समोर ग्रामस्थांची एकजुट; अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन

अंदरसुल : पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई झाल्याने व प्रशासनाच्या वेळ काडू धोरणाचा निषेध करीत बोकटे ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांनी सुरु केलेले आमरण उपोषण अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.बोकटे येथे पालखेड कालव्याच्या आवर्तनातही पाणी मिळाले नाही, नंतर येवल्याच्या पाण्याबरोबर आरक्षीत असलेल्या पालखेडच्या पाण्याने बंधारे कोरडेच राहिल्याने परिसरातील पाण्याचे झरे आटल्याने विहिरी बोरवेल कोरडे झाले आहेत, त्या मुळे बोकटे पंचक्र ोशीत भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे, त्या मुळे कुटुंबासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्या मुळे दोन तीन किलो मीटर अंतरावर गोरगरिबांना पाण्यासाठी भटकंती करावे लागत आहे. म्हणुन गावांसाठी, वाडीवस्तीवर टँकर कुटुंबासाठी तसेच मोठ्या प्रमाणात असलेल्या पशुधनासाठी ग्रामस्थांनी बोकटे ग्रामपंचायतीकडे लेखी निवेदन दिले होते, कि गावावरती निर्माण झालेला पाणी प्रश्नावर त्वरीत दखल घेऊन टँकर सुरु करावे. मात्र अपेक्षीत टँकर सुरु न झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी शुक्रवारी दि. ५ एप्रिल रोजी बोकटे येथील संभाजी दाभाडे, किरण दाभाडे, भाऊसाहेब कदम, बापुसाहेब दाभाडे, हितेश दाभाडे, प्रदीप दाभाडे, निखिल दाभाडे यांनी बोकटे येथे ग्रामपंचायती समोर आमरण उपोषण सुरू केले.त्यात बोकटे येथील असंख्य महिला हांडे घेऊन ग्रामपंचायत समोर सुरु असलेल्या उपोषणात सहभागी झाल्या. त्यावेळीं गावातील ग्रामस्थांनी टँकर द्या, नळाने सुरू करा पण पाणी पुरवठा करा. अशी मागणी केली. पण प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे आज हि परिस्थीती निर्माण झाली असून नंतर गटविकास अधिकारी यांच्याकडे उपोषणाची त्वरीत दखल घेऊन बोकटेकरांना न्याय मिळवून द्यावा यासाठी विनंती केली. म्हणुन पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आहिरे यांनी बोकटे येथे उपोषणकर्त्यांची भेट घेतली. बोकटेसह वाडी-वस्तीवर टँकर सुरुकरण्याबाबत लेखी आश्वासन देऊन महिलांसह गावकऱ्यांना दिलासा मिळाला व उपोषण मागे घेण्यात आले.