शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
7
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
8
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
9
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
10
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
11
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
12
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
13
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
14
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
15
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
16
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
17
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
18
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
19
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
20
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

ठोस आश्वासनानंतर उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:14 IST

पांगरी : शेतीपंपाची वीज बिल वसुली चुकीच्या पद्धतीने होत असून ती थांबवावी. बंद रोहित्रे त्वरित चालू करण्यात यावे, शेतमालाच्या ...

पांगरी : शेतीपंपाची वीज बिल वसुली चुकीच्या पद्धतीने होत असून ती थांबवावी. बंद रोहित्रे त्वरित चालू करण्यात यावे, शेतमालाच्या हमी भावाचे नियोजन करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी पांगरी येथील अरुण पांगारकर यांनी चार दिवसांपूर्वी हरीबाबा मंदिरात उपोषणाला सुरुवात केली होती. उपकार्यकारी अभियंता ऋषिकेश खैरनार यांनी मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याने पांगरकर यांनी सुरू केलेले उपोषण थांबविले.

पांगारकर यांनी सरकार वीज बिल वसुलीसाठी तज्ज्ञ लोकांची समिती स्थापन करून नियोजन करू शकते, त्याच पद्धतीने शेतमालाला हमी भाव देण्यासाठी नियोजन करण्यात यावे, सरकारकडून स्वतंत्र शेती पीक नियोजन खाते स्थापन करण्यात यावे, प्रत्येक पिकाचे प्रमाण निर्धारित करून ते टिकवून ठेवण्यासाठी उपाययोजना करावी, गावाची प्रत्येक पिकांची पेरणी क्षेत्र मर्यादा ठरवून त्यानुसार तलाठी कार्यालय मार्फत शेतकऱ्यांना बियाणांचा पुरवठा करण्यात यावा, उत्पादन खर्चानुसार हमीभाव टाकण्यात यावा, आदी मागण्या केल्या होत्या. वीज बील वसुली मोहिमेत दुरुस्ती, बील वसुलीसाठी किमान एक महिना अगोदर नोटीस देण्यात यावी आणि अनिवार्य असेल तरच रोहित्रे बंद करावी, ज्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे त्यांना दोन महिन्यांच्या मुदतीवर वीजपुरवठा चालू करून देण्यात यावा, वीज कनेक्शन तोडल्याच्या काळात ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे पाण्याअभावी नुकसान झाले आहे त्यांचा पंचनामा होऊन त्यांच्या पिकांच्या नुकसान भरपाईचे नियोजन करण्यात यावे, या मागण्या करण्यात आल्या होत्या. वीज प्रश्नासंदर्भातील सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आल्याने उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी वावी उपकेंद्राचे अजय सावळे, वायरमन सूरज लासुरे, संदीप खरात, संदीप पांगारकर, भाऊसाहेब दळवी, किशोर कुलकर्णी आदी उपस्थित होते.

चौकट-

वीज महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपोषणस्थळी येऊन भेटले. वीज प्रश्नासंदर्भातील मागण्या मान्य करून उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. तसेच मुख्यमंत्री कार्यालयाचा देखील संदेश आला. शेतमाल हमीभावासंदर्भात मागण्यांचे निवेदन पुढील कार्यवाहीसाठी त्यांनी कृषी विभाग आणि पणन विभागाकडे पाठवले आहे. ते नेमकी काय कार्यवाही करणार, हे पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी एक महिना वाट पाहावी लागणार आहे. हमीभावाच्या दृष्टीने अभ्यास आणि जनजागृती यासाठी वेळ आवश्यक आहेच. शासनाचा प्रतिसाद सकारात्मक न मिळाल्यास जन आंदोलन उभे करणार असल्याचे अरुण पांगारकर यांनी सांगितले.