शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

ठोस आश्वासनानंतर उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:14 IST

पांगरी : शेतीपंपाची वीज बिल वसुली चुकीच्या पद्धतीने होत असून ती थांबवावी. बंद रोहित्रे त्वरित चालू करण्यात यावे, शेतमालाच्या ...

पांगरी : शेतीपंपाची वीज बिल वसुली चुकीच्या पद्धतीने होत असून ती थांबवावी. बंद रोहित्रे त्वरित चालू करण्यात यावे, शेतमालाच्या हमी भावाचे नियोजन करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी पांगरी येथील अरुण पांगारकर यांनी चार दिवसांपूर्वी हरीबाबा मंदिरात उपोषणाला सुरुवात केली होती. उपकार्यकारी अभियंता ऋषिकेश खैरनार यांनी मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याने पांगरकर यांनी सुरू केलेले उपोषण थांबविले.

पांगारकर यांनी सरकार वीज बिल वसुलीसाठी तज्ज्ञ लोकांची समिती स्थापन करून नियोजन करू शकते, त्याच पद्धतीने शेतमालाला हमी भाव देण्यासाठी नियोजन करण्यात यावे, सरकारकडून स्वतंत्र शेती पीक नियोजन खाते स्थापन करण्यात यावे, प्रत्येक पिकाचे प्रमाण निर्धारित करून ते टिकवून ठेवण्यासाठी उपाययोजना करावी, गावाची प्रत्येक पिकांची पेरणी क्षेत्र मर्यादा ठरवून त्यानुसार तलाठी कार्यालय मार्फत शेतकऱ्यांना बियाणांचा पुरवठा करण्यात यावा, उत्पादन खर्चानुसार हमीभाव टाकण्यात यावा, आदी मागण्या केल्या होत्या. वीज बील वसुली मोहिमेत दुरुस्ती, बील वसुलीसाठी किमान एक महिना अगोदर नोटीस देण्यात यावी आणि अनिवार्य असेल तरच रोहित्रे बंद करावी, ज्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे त्यांना दोन महिन्यांच्या मुदतीवर वीजपुरवठा चालू करून देण्यात यावा, वीज कनेक्शन तोडल्याच्या काळात ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे पाण्याअभावी नुकसान झाले आहे त्यांचा पंचनामा होऊन त्यांच्या पिकांच्या नुकसान भरपाईचे नियोजन करण्यात यावे, या मागण्या करण्यात आल्या होत्या. वीज प्रश्नासंदर्भातील सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आल्याने उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी वावी उपकेंद्राचे अजय सावळे, वायरमन सूरज लासुरे, संदीप खरात, संदीप पांगारकर, भाऊसाहेब दळवी, किशोर कुलकर्णी आदी उपस्थित होते.

चौकट-

वीज महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपोषणस्थळी येऊन भेटले. वीज प्रश्नासंदर्भातील मागण्या मान्य करून उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. तसेच मुख्यमंत्री कार्यालयाचा देखील संदेश आला. शेतमाल हमीभावासंदर्भात मागण्यांचे निवेदन पुढील कार्यवाहीसाठी त्यांनी कृषी विभाग आणि पणन विभागाकडे पाठवले आहे. ते नेमकी काय कार्यवाही करणार, हे पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी एक महिना वाट पाहावी लागणार आहे. हमीभावाच्या दृष्टीने अभ्यास आणि जनजागृती यासाठी वेळ आवश्यक आहेच. शासनाचा प्रतिसाद सकारात्मक न मिळाल्यास जन आंदोलन उभे करणार असल्याचे अरुण पांगारकर यांनी सांगितले.