शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

राज्यात येणाऱ्या नवउद्योजकांचे ‘स्टार्टअप’ महागात

By admin | Updated: March 13, 2016 23:34 IST

एमआयडीसीचा निर्णय : औद्योगिक भूखंडाच्या दरात वाढ

संजय पाठक नाशिकराज्यात औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यासाठी एकीकडे शासन ‘मेक इन महाराष्ट्र’सारखे उपक्रम राबवित असताना दुसरीकडे मात्र औद्योगिक विकास महामंडळाने राज्यातील औद्योगिक भूखंडांचे दर दीड ते दोन पटीने वाढविले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात येणाऱ्या उद्योगांना सवलत देण्याचे सोडून अशा प्रकारे दरवाढ केली जाणार असेल तर उद्योग येतील कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.विशेषत: नव्या उद्योजकांनी भूखंड मागणीसाठी यापूर्वीच अर्ज केला असेल आणि त्यावर भूखंड वाटप समितीने निर्णय घेतला नसेल अशा शेकडो नवउद्योजकांनाही आता महागड्या दराने भूखंड खरेदी करावा लागणार आहे. गेल्याच महिन्यात राज्य शासनाच्या वतीने मेक इन इंडियाअंतर्गत मेक इन महाराष्ट्र उपक्रम राबविण्यात आला. त्यासाठी जगभरातून उद्योजकांना निमंत्रित करण्यात आले. विशेष म्हणजे राज्य शासनाच्या वतीने उद्योगांना निमंत्रण देण्यासाठी विदेश दौरे केले जात असताना दुसरीकडे याचवेळी मुंबईत एमआयडीसीचे अधिकारी मात्र औद्योगिक भूखंड दरवाढीचा निर्णय घेण्याचे घाटत होते. ३० नोव्हेंबर रोजी महामंडळाच्या बैठकीत दरवाढीला मान्यता देण्यात आली. त्यानंतर महामंडळाचा हा अंतिम निर्णय ७ जानेवारीपासून जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील सर्वच औद्योगिक वसाहतींचे दर वाढविण्यात आले आहेत. यात पुणे, नाशिक, मुंबई, रायगड, नागपूर असे जिल्हानिहाय औद्योगिक, निवासी आणि व्यापारी दराच्या भूखंडात मोठी वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही दरवाढ करताना ज्या प्रकरणात देकारपत्रे देण्यात आली आहेत आणि देकार पत्रातील नोंदीनुसार पंधरा दिवसांत जर इसारा रक्कम भरली असेल तर त्यांना देकारपत्रातील दर लागू राहतील तर ज्यात सुधारित दरांची अट घातली असेल त्यांना नव्या पत्रानुसार दर भरावे लागतील. विशेष म्हणजे औद्योगिक भूखंड विक्रीसाठी देताना भूखंड वाटप समितीत भूखंड देण्याचा निर्णय घेतला आहे.