शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मार्चच्या प्रारंभीच गुळवंचला टंचाईच्या झळा महिलांची वणवण : विहिरींनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 23:58 IST

गुळवंच : सिन्नर तालुक्यातील गुळवंच शिवारातील विहिरींनी तळ गाठला असून, मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपाण्यासाठी महिलांवर वणवण भटकंती करण्याची वेळ तातडीने टॅँकर सुरू करण्याची मागणी

गुळवंच : सिन्नर तालुक्यातील गुळवंच शिवारातील विहिरींनी तळ गाठला असून, मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांवर वणवण भटकंती करण्याची वेळ आल्याचे चित्र आहे. गुळवंच येथील सार्वजनिक विहिरीत जेमतेम पाणी आहे. सार्वजनिक विहिरीत थोडेफार पाणी असूनही ते पिण्यायोग्य नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रतन इंडिया कंपनीने दिलेल्या दोन विहिरीत पाणी नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाला पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा प्रस्ताव तयार करण्याची वेळ आली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा प्रस्ताव पाठविल्यानंतर त्वरित टँकर मंजूर होईल का याची शंका उपस्थितीत केली जात आहे. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी महिलांनी भटकंती करण्याची वेळ आल्याने पंचायत समिती व तहसील कार्यालयाने येथे निर्माण झालेली टंचाई पाहून तातडीने टॅँकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बारागांव पिंप्रीसह सात गाव पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात असून, केपानगर येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण होईपर्यंत ही योजना चालू होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे. टॅँकर सुरू करण्यापेक्षा योजना सुरू झाल्यास या गुळवंचसह योजनेत समाविष्ट असलेल्या सातही गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटेल यासाठी योजनेचे काम लवकर मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.