शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

जिल्हा बॅँकेमुळे अडकले लाभार्थ्यांचे धनादेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 19:01 IST

नाशिक : समाजकल्याण विभागाच्या अधिनस्त असलेल्या योजनांचा थेट निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाची अडचण असल्याचे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या बैठकीत उघड झाले.समाजकल्याण सभापती सुनीता रामदास चारोस्कर यांच्या उपस्थितीत समाजकल्याण विभागाची मासिक बैठक झाली. बैठकीत समाजकल्याण विभागाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. पंचायत समिती स्तरावर बहुतांश निधी अखर्चित ...

नाशिक : समाजकल्याण विभागाच्या अधिनस्त असलेल्या योजनांचा थेट निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाची अडचण असल्याचे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या बैठकीत उघड झाले.समाजकल्याण सभापती सुनीता रामदास चारोस्कर यांच्या उपस्थितीत समाजकल्याण विभागाची मासिक बैठक झाली. बैठकीत समाजकल्याण विभागाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. पंचायत समिती स्तरावर बहुतांश निधी अखर्चित असून हा निधी अद्याप खर्च का केला नाही? याचा जाब सभापती सुनीता चारोस्कर यांनी अधिकाºयांना विचारला. ज्या योजनांचा खर्च झाला नाही. त्या योजनांचा निधी वेळेत खर्च झाला नाही, तो शासनाला परत करण्याच्या सूचना सुनीता चारोस्कर यांनी दिल्या. अपंगांचा तीन टक्के निधी खर्च करण्याबाबत पंचायत समिती स्तरावर उदासिनता असून, योजनांचा प्रचार व प्रसार करण्यात गटविकास अधिकारी कमी पडत असल्याने योजनांचे फलक पंचायत समिती बाहेर लावण्याच्या सूचना गटविकास अधिकाºयांना देण्याबाबत आदेश सभापती सुनीता चारोस्कर यांनी दिले. तसेच तीन टक्के अपंग निधीतून जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात ३० लाख रूपये खर्चून उदवाहक (लिफ्ट) बसविण्यास अपंग कल्याण आयुक्तांनी मान्यता दिल्याने त्याबाबतची कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या. दलीतवस्ती सुधार योजनेतर्गंत२ ६३४ कामांना १० टक्के निधी देणे बाकी असून, ७७ कामे अद्याप सुरूच झालेली नाही. ही कामे तात्काळ रदद करून त्या कामांचा निधी शासनाला परत करण्याच्या सूचना सभापती सुनीता चारोस्कर यांनी दिल्या. समाजकल्याण विभागाच्या अधिनस्त किती लाभार्थी आहेत. त्यांच्यावर किती खर्च होत आहे, याची माहिती आठ दिवसात देण्याची मागणी सदस्य हिरामण खोसकर यांनी केली. सर्वात महत्वाचे म्हणजे समाजकल्याण विभागाच्या योजनांमधील लाभार्थ्यांच्या खात्यात थेट लाभ जमा होत आहे. मात्र जिल्हा बॅँकेचे धनादेश वटत नसल्याने या लाभार्थ्यांच्या खात्यात योजनांच्या अनुदानाचे पैसे जमा झालेले नाहीत. अशा लाभार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाकडे पाठपुरावा करून त्यांच्या खात्यात आरटीजीएसने पैसे जमा करून घेण्याची मागणी करावी, अशा सूचना सभापती सुनीता चारोस्कर यांनी केली.