शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
4
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
5
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
6
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
7
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
8
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
9
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
10
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
11
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
12
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
13
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
14
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
15
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
16
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
17
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
18
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
19
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
20
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?

कांद्याला भाव नसल्याने बळीराजा हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2016 23:08 IST

पाणीटंचाई : खाद्य, किटकनाशके महागल्याने वाढले संकट

राजेश पवार भऊरकेंद्र शासनाकडून कांद्याचे निर्यातमूल्य शून्य करूनही बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येणाऱ्या कांद्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत सध्या भाव मिळत नसून त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.उन्हाळी कांद्याच्या हंगामात कांद्याचे निर्यातमूल्य वाढलेले असताना ही कांद्याला चांगला बाजारभाव मिळत होता. पावसाळी पोळ व रांगडा कांद्यालाही कमीत कमी १५ ते २० रुपये याप्रमाणे चांगला बाजारभाव मिळून दोन पैसे आपल्या पदरी पडतील या अपेक्षेत कांदा उत्पादकांनी अनेक अडीअडचणींवर मात करीत पावसाळी कांद्याची लागवड केली. लागवडीपूर्वी काळे उळे (बियाणे) महाग असूनही उत्पादकांनी त्याची उपलब्धता करुन रोपे टाकली. रोपे उगवल्यापासून लागवडीपर्यंत नेहमीचेच ढगाळ हवामान, बेमोसमी पावसाची शक्यता, खाद्य, किटकनाशके, बुरशीनाशके यांच्या वाढलेल्या किमती, पाण्याची व मजुरांची टंचाई या संकटावर मात करीत कांदा उत्पादकांनी पीक सांभाळले. गत उन्हाळी हंगामात कांद्याच्या वाढलेल्या बाजारभावामुळे कांदा लागवड, निंदणी, खुरपणी, कांदे काढणी, चाळीत साठवणूक करुन विक्रीसाठी निवड करणेपर्यंत मजुरांना वाढीव २०० ते २५० रुपये रोज कांदा उत्पादकांना द्यावा लागत होता. सध्या पावसाळी लाल कांद्याला बाजार समितींमध्ये ३ रुपयांपासून १० रुपयांपर्यंत सरासरी ७ ते ८ रुपये बाजारभाव मिळत आहे.गत दोन ते तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती, डाळिंबावरील तेल्या रोग, बेमोसमी पाऊस व गारपिटीने झोडपलेल्या शेतकऱ्यांनी उसनवारीने, बॅँकेकडून कर्ज काढून, उधारीने पावसाळी लाल कांद्याची लागवड केली आहे. सध्याचा बाजारभाव बघता कांदा उत्पादकांचा अपेक्षाभंग होऊन कांद्याच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत कांदा विक्री करुन हाती काहीच शिल्लक राहत नाही. बॅँकेचे कर्ज, खत, खाद्य, फवारणीची उधारी फेडायची कशी ? कुटुंब, संसाराचा गाडा चालवायचा कसा? असा प्रश्न कांदा उत्पादकांच्या समोर निर्माण झाल्याचे सत्यचित्र आहे. उशीरा लागवड केलेल्या कांद्याची पाण्याअभावी अतिशय खराब परिस्थिती असून काही ठिकाणी अर्धवट अवस्थेतील कांद्याचे पीक सोडावे लागणार आहे. काही ठिकाणी फक्त लहान गोल्टी आकाराचा कांदा हाती येणार आहे.शासनाचा शेती व शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन, शेतीविषयी धोरण हे शेती हिताचे दिसत नसल्यामुळे शेतीचा व्यवसाय तोट्यात जाऊन शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. शेती पिकाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य बाजारभाव मिळत नसल्यामुळे घरातील आर्थिकस्त्रोत कमी होऊन तरुणांची अवस्था ‘घरात आई जेवायला देत नाही आणि बाप भीक मागू देत नाही’ अशी झाली आहे.(वार्ताहर)