शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

आता व्हा आत्मनिर्भर; ३३५ जणांना मिळणार १० लाखांपर्यंत अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:18 IST

केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग ही योजना २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांसाठी ...

केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग ही योजना २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांसाठी राबविली जाणार आहे. यांतर्गत प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के आणि कमाल १० लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहेत. एक जिल्हा एक पीक अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील कांदा या पिकाची निवड करण्यात आली असून, कांदाप्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी हे अनदान देण्यात येणार आहे.

चौकट-

जिल्ह्याला ३३५ लाभार्थींचे उद्दिष्ट

आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यात कांदा प्रक्रिया उद्योग उभारणाऱ्या उद्योजकांना त्यांच्या प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के किंवा जास्तीत जास्त दहा लाखांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. आठपेक्षा कमी कामगारांत काम करणाऱ्यांना यात प्राधान्य देण्यात येणार आहे. उद्योग उभारणीत लाभार्थ्यांचा १० टक्के स्वत:चा निधी असणे बंधनकारक असून, उर्वरित भांडवल बँकेकडून कर्ज रूपाने दिले जाणार आहे. लाभार्थ्याने कर्जफेड केल्यानंतर त्यांना सबसीडीची रक्कम मिळणार आहे. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेत सहभाग घेता येणार असून, यासाठी उमेदवार किमान आठवी पास असणे आवश्यक आहे.

चौकट-

कोणाला घेता येणार लाभ?

प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य यानुसार या योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड होणार असून, यासाठी लाभार्थी किमान आठवी पास असणे आवश्यक आहे. सध्या जर प्रक्रिया उद्योग सुरू असेल आणि त्याची वाढ करावयाची असेल ते उद्योजक आणि नव्याने प्रक्रिया उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या व्यक्तींचा यात समावेश करण्यात येणार आहे.

चौकट-

असा करा अर्ज

आत्मनिर्भर भारत योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक असून, त्यासाठी http://pmfme.mofpi.gov.in ही वेबसाइट आहे. या वेबसाइटवर जाऊन इच्छुकांनी आपली माहिती भरून आपला यूजर आयडी आणि पासवर्ड तयार करावा.

कोट-

आत्मनिर्भर भारत योजनेसाठी नाशिक जिल्ह्याची कांदा या पिकासाठी निवड करण्यात आली असून, कांदा प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी ऑनलाइन अर्ज करावयाचा असून, तालुका कृषी अधिकाऱ्यांकडेचही या याेजनेची माहिती उपलब्ध आहे. आतापर्यंत यासाठी १९१ अर्ज दाखल करण्यात आले असून, जिल्ह्याला ३३५ सतके उद्दिष्ट देण्यात आले असून, त्यापेक्षा अधिक अर्ज आले तर त्यांचाही विचार होऊ शकतो.

- विश्वास बर्वे, तंत्र अधिकारी, कृषी विभाग, नाशिक