शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

आता व्हा आत्मनिर्भर; ३३५ जणांना मिळणार १० लाखांपर्यंत अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:18 IST

केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग ही योजना २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांसाठी ...

केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग ही योजना २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांसाठी राबविली जाणार आहे. यांतर्गत प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के आणि कमाल १० लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहेत. एक जिल्हा एक पीक अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील कांदा या पिकाची निवड करण्यात आली असून, कांदाप्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी हे अनदान देण्यात येणार आहे.

चौकट-

जिल्ह्याला ३३५ लाभार्थींचे उद्दिष्ट

आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यात कांदा प्रक्रिया उद्योग उभारणाऱ्या उद्योजकांना त्यांच्या प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के किंवा जास्तीत जास्त दहा लाखांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. आठपेक्षा कमी कामगारांत काम करणाऱ्यांना यात प्राधान्य देण्यात येणार आहे. उद्योग उभारणीत लाभार्थ्यांचा १० टक्के स्वत:चा निधी असणे बंधनकारक असून, उर्वरित भांडवल बँकेकडून कर्ज रूपाने दिले जाणार आहे. लाभार्थ्याने कर्जफेड केल्यानंतर त्यांना सबसीडीची रक्कम मिळणार आहे. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेत सहभाग घेता येणार असून, यासाठी उमेदवार किमान आठवी पास असणे आवश्यक आहे.

चौकट-

कोणाला घेता येणार लाभ?

प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य यानुसार या योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड होणार असून, यासाठी लाभार्थी किमान आठवी पास असणे आवश्यक आहे. सध्या जर प्रक्रिया उद्योग सुरू असेल आणि त्याची वाढ करावयाची असेल ते उद्योजक आणि नव्याने प्रक्रिया उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या व्यक्तींचा यात समावेश करण्यात येणार आहे.

चौकट-

असा करा अर्ज

आत्मनिर्भर भारत योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक असून, त्यासाठी http://pmfme.mofpi.gov.in ही वेबसाइट आहे. या वेबसाइटवर जाऊन इच्छुकांनी आपली माहिती भरून आपला यूजर आयडी आणि पासवर्ड तयार करावा.

कोट-

आत्मनिर्भर भारत योजनेसाठी नाशिक जिल्ह्याची कांदा या पिकासाठी निवड करण्यात आली असून, कांदा प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी ऑनलाइन अर्ज करावयाचा असून, तालुका कृषी अधिकाऱ्यांकडेचही या याेजनेची माहिती उपलब्ध आहे. आतापर्यंत यासाठी १९१ अर्ज दाखल करण्यात आले असून, जिल्ह्याला ३३५ सतके उद्दिष्ट देण्यात आले असून, त्यापेक्षा अधिक अर्ज आले तर त्यांचाही विचार होऊ शकतो.

- विश्वास बर्वे, तंत्र अधिकारी, कृषी विभाग, नाशिक