शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

सावधान! १६० गावांमध्ये पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:18 IST

नाशिक जिल्ह्यात दर महिन्याला पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने प्रत्येक गावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. या नमुन्यांचे निरीक्षण ...

नाशिक जिल्ह्यात दर महिन्याला पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने प्रत्येक गावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. या नमुन्यांचे निरीक्षण केल्यानंतर कमी दूषित, अधिक दूषित व पाणी पिण्यायोग्य असे तीन प्रकारात त्याचे वर्गीकरण केले जाते. जून महिन्यात म्हणजेच पावसाळा सुरू होऊन काही कालावधी उलटत नाही तोच पाणी पुरवठा विभागाने अशा प्रकारचे नमुने तपासणीसाठी घेतले असता तपासलेल्या १८९४ नमुन्यांपैकी १६० गावांमधील पाणी दूषित म्हणजेच पिण्यासाठी योग्य नसल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे या गावांमध्ये साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त केली जात असून, संबंधित गावातील ग्रामपंचायतींना पाणी शुद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशुद्ध पाण्यामुळे मलेरिया, हिवताप, थंडी-ताप, सर्दी, खोकला यांसारखे आजार होण्याची शक्यता असल्यामुळे आरोग्य विभागालाही त्याबाबत अवगत करण्यात आले आहे.

-------------

तालुकानिहाय आढावा

कळवण- ३०२-९

बागलाण- ९६-२

मालेगाव- ९७-४

नांदगाव- ८३-९

चांदवड- ९०- ६

देवळा- ६०-०

सुरगाणा- १६९-९

पेठ- १०५-०

येवला- ९६-२

निफाड- १५६-१

इगतपुरी- ११६-११

नाशिक- ६४- १४

दिंडोरी- २२४-६८

सिन्नर- ६७- १२

त्र्यंबकेश्वर- १६९-१३

------------

ज्या गावात तपासणी झालीच नाही त्याचे काय?

* पाणी पुरवठा व स्वच्छता विभागावर प्रत्येक नागरिकाला पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेच्या पाण्याचे नमुने दरमहा घेतले जातात.

* अशा प्रकारचे नमुने दरमहा घेतले जातात. घेतलेले नमुने साधारणत: सलग तीन वेळा दोेषविरहीत आढळल्यास अशा गावांमध्ये पुन्हा तपासणी करण्याची गरज नसते.

* ज्या गावांमध्ये पाण्याची तपासणी झालीच नाही, अशा गावांची जबाबदारी ग्रामपंचायतींवर सोपविण्यात आली असून, ग्रामपंचायतींनी याकामी पुढाकार घेऊन वेळच्या वेळी पाणी नमुने तपासून घेणे आवश्यक करण्यात आले आहे.

-----------

कोरोनामुळे नमुने घटले

* गेल्या वर्षीपासून जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला असल्याने त्यापासून ग्रामीण भागही सुटला नाही. सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे पाण्याचे नमुने घेण्यात काही प्रमाणात अनियमितता आली.

* सप्टेंबर महिन्यापासून पाण्याचे नमुने पुन्हा तपासण्यास सुरुवात झाली आहे. गावोगावी जाऊन पाण्याचे नमुने घेण्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडे नसल्याने दरमहा सर्वच गावात पाणी नमुने घेणे शक्य नसते.

* कोरोना व अन्य कारणांमुळेही पाण्याचे नमुने घेणे अशक्य होत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, बऱ्याच वेळा ठराविक गावांतील पाण्याचे नमुने रॅन्डमली घेतले जातात.

--------------

* पाण्याचे नमुने तपासणी ही नियमित चालणारी बाब असून, दूषित पाणी पुरवठा होत असल्यास संबंधित ग्रामपंचायतीला रेड कार्ड दिले जाते.

* पाणी कमी दूषित असल्यास पिवळे कार्ड व पाणी शुद्ध असल्यास ग्रीन कार्ड दिले जाते. या कार्डाच्या आधारे ग्रामपंचायतींनी काय उपाययोजना केल्या, त्याची पाहणी होते.

------------

आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्या!

* दूषित पाण्यामुळे साथ रोगांबरोबरच गंभीर स्वरुपाचे आजार होऊन प्रसंगी मृत्यू होण्याचाही संभव आहे.

* मलेरिया, हिवताप, हगवण, वांत्या, सर्दी, खोकला, ताप अशा प्रकारचे आजार होण्याची शक्यता असल्याने पिण्यासाठी शुद्ध पाणी वापरावे, अशा सूचना आहेत.

* पाण्यापासून होणारे आजार टाळण्यासाठी पाणी शुद्ध असणे व त्यापेक्षा पाणी उकळून पिणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.

--------------

१,८९४ गावांचे नमुने घेतले तपासणीसाठी

१६० गावातील नमुने आढळले दूषित