शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! १६० गावांमध्ये पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:18 IST

नाशिक जिल्ह्यात दर महिन्याला पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने प्रत्येक गावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. या नमुन्यांचे निरीक्षण ...

नाशिक जिल्ह्यात दर महिन्याला पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने प्रत्येक गावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. या नमुन्यांचे निरीक्षण केल्यानंतर कमी दूषित, अधिक दूषित व पाणी पिण्यायोग्य असे तीन प्रकारात त्याचे वर्गीकरण केले जाते. जून महिन्यात म्हणजेच पावसाळा सुरू होऊन काही कालावधी उलटत नाही तोच पाणी पुरवठा विभागाने अशा प्रकारचे नमुने तपासणीसाठी घेतले असता तपासलेल्या १८९४ नमुन्यांपैकी १६० गावांमधील पाणी दूषित म्हणजेच पिण्यासाठी योग्य नसल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे या गावांमध्ये साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त केली जात असून, संबंधित गावातील ग्रामपंचायतींना पाणी शुद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशुद्ध पाण्यामुळे मलेरिया, हिवताप, थंडी-ताप, सर्दी, खोकला यांसारखे आजार होण्याची शक्यता असल्यामुळे आरोग्य विभागालाही त्याबाबत अवगत करण्यात आले आहे.

-------------

तालुकानिहाय आढावा

कळवण- ३०२-९

बागलाण- ९६-२

मालेगाव- ९७-४

नांदगाव- ८३-९

चांदवड- ९०- ६

देवळा- ६०-०

सुरगाणा- १६९-९

पेठ- १०५-०

येवला- ९६-२

निफाड- १५६-१

इगतपुरी- ११६-११

नाशिक- ६४- १४

दिंडोरी- २२४-६८

सिन्नर- ६७- १२

त्र्यंबकेश्वर- १६९-१३

------------

ज्या गावात तपासणी झालीच नाही त्याचे काय?

* पाणी पुरवठा व स्वच्छता विभागावर प्रत्येक नागरिकाला पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेच्या पाण्याचे नमुने दरमहा घेतले जातात.

* अशा प्रकारचे नमुने दरमहा घेतले जातात. घेतलेले नमुने साधारणत: सलग तीन वेळा दोेषविरहीत आढळल्यास अशा गावांमध्ये पुन्हा तपासणी करण्याची गरज नसते.

* ज्या गावांमध्ये पाण्याची तपासणी झालीच नाही, अशा गावांची जबाबदारी ग्रामपंचायतींवर सोपविण्यात आली असून, ग्रामपंचायतींनी याकामी पुढाकार घेऊन वेळच्या वेळी पाणी नमुने तपासून घेणे आवश्यक करण्यात आले आहे.

-----------

कोरोनामुळे नमुने घटले

* गेल्या वर्षीपासून जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला असल्याने त्यापासून ग्रामीण भागही सुटला नाही. सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे पाण्याचे नमुने घेण्यात काही प्रमाणात अनियमितता आली.

* सप्टेंबर महिन्यापासून पाण्याचे नमुने पुन्हा तपासण्यास सुरुवात झाली आहे. गावोगावी जाऊन पाण्याचे नमुने घेण्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडे नसल्याने दरमहा सर्वच गावात पाणी नमुने घेणे शक्य नसते.

* कोरोना व अन्य कारणांमुळेही पाण्याचे नमुने घेणे अशक्य होत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, बऱ्याच वेळा ठराविक गावांतील पाण्याचे नमुने रॅन्डमली घेतले जातात.

--------------

* पाण्याचे नमुने तपासणी ही नियमित चालणारी बाब असून, दूषित पाणी पुरवठा होत असल्यास संबंधित ग्रामपंचायतीला रेड कार्ड दिले जाते.

* पाणी कमी दूषित असल्यास पिवळे कार्ड व पाणी शुद्ध असल्यास ग्रीन कार्ड दिले जाते. या कार्डाच्या आधारे ग्रामपंचायतींनी काय उपाययोजना केल्या, त्याची पाहणी होते.

------------

आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्या!

* दूषित पाण्यामुळे साथ रोगांबरोबरच गंभीर स्वरुपाचे आजार होऊन प्रसंगी मृत्यू होण्याचाही संभव आहे.

* मलेरिया, हिवताप, हगवण, वांत्या, सर्दी, खोकला, ताप अशा प्रकारचे आजार होण्याची शक्यता असल्याने पिण्यासाठी शुद्ध पाणी वापरावे, अशा सूचना आहेत.

* पाण्यापासून होणारे आजार टाळण्यासाठी पाणी शुद्ध असणे व त्यापेक्षा पाणी उकळून पिणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.

--------------

१,८९४ गावांचे नमुने घेतले तपासणीसाठी

१६० गावातील नमुने आढळले दूषित