शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! १६० गावांमध्ये पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:18 IST

नाशिक जिल्ह्यात दर महिन्याला पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने प्रत्येक गावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. या नमुन्यांचे निरीक्षण ...

नाशिक जिल्ह्यात दर महिन्याला पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने प्रत्येक गावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. या नमुन्यांचे निरीक्षण केल्यानंतर कमी दूषित, अधिक दूषित व पाणी पिण्यायोग्य असे तीन प्रकारात त्याचे वर्गीकरण केले जाते. जून महिन्यात म्हणजेच पावसाळा सुरू होऊन काही कालावधी उलटत नाही तोच पाणी पुरवठा विभागाने अशा प्रकारचे नमुने तपासणीसाठी घेतले असता तपासलेल्या १८९४ नमुन्यांपैकी १६० गावांमधील पाणी दूषित म्हणजेच पिण्यासाठी योग्य नसल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे या गावांमध्ये साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त केली जात असून, संबंधित गावातील ग्रामपंचायतींना पाणी शुद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशुद्ध पाण्यामुळे मलेरिया, हिवताप, थंडी-ताप, सर्दी, खोकला यांसारखे आजार होण्याची शक्यता असल्यामुळे आरोग्य विभागालाही त्याबाबत अवगत करण्यात आले आहे.

-------------

तालुकानिहाय आढावा

कळवण- ३०२-९

बागलाण- ९६-२

मालेगाव- ९७-४

नांदगाव- ८३-९

चांदवड- ९०- ६

देवळा- ६०-०

सुरगाणा- १६९-९

पेठ- १०५-०

येवला- ९६-२

निफाड- १५६-१

इगतपुरी- ११६-११

नाशिक- ६४- १४

दिंडोरी- २२४-६८

सिन्नर- ६७- १२

त्र्यंबकेश्वर- १६९-१३

------------

ज्या गावात तपासणी झालीच नाही त्याचे काय?

* पाणी पुरवठा व स्वच्छता विभागावर प्रत्येक नागरिकाला पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेच्या पाण्याचे नमुने दरमहा घेतले जातात.

* अशा प्रकारचे नमुने दरमहा घेतले जातात. घेतलेले नमुने साधारणत: सलग तीन वेळा दोेषविरहीत आढळल्यास अशा गावांमध्ये पुन्हा तपासणी करण्याची गरज नसते.

* ज्या गावांमध्ये पाण्याची तपासणी झालीच नाही, अशा गावांची जबाबदारी ग्रामपंचायतींवर सोपविण्यात आली असून, ग्रामपंचायतींनी याकामी पुढाकार घेऊन वेळच्या वेळी पाणी नमुने तपासून घेणे आवश्यक करण्यात आले आहे.

-----------

कोरोनामुळे नमुने घटले

* गेल्या वर्षीपासून जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला असल्याने त्यापासून ग्रामीण भागही सुटला नाही. सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे पाण्याचे नमुने घेण्यात काही प्रमाणात अनियमितता आली.

* सप्टेंबर महिन्यापासून पाण्याचे नमुने पुन्हा तपासण्यास सुरुवात झाली आहे. गावोगावी जाऊन पाण्याचे नमुने घेण्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडे नसल्याने दरमहा सर्वच गावात पाणी नमुने घेणे शक्य नसते.

* कोरोना व अन्य कारणांमुळेही पाण्याचे नमुने घेणे अशक्य होत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, बऱ्याच वेळा ठराविक गावांतील पाण्याचे नमुने रॅन्डमली घेतले जातात.

--------------

* पाण्याचे नमुने तपासणी ही नियमित चालणारी बाब असून, दूषित पाणी पुरवठा होत असल्यास संबंधित ग्रामपंचायतीला रेड कार्ड दिले जाते.

* पाणी कमी दूषित असल्यास पिवळे कार्ड व पाणी शुद्ध असल्यास ग्रीन कार्ड दिले जाते. या कार्डाच्या आधारे ग्रामपंचायतींनी काय उपाययोजना केल्या, त्याची पाहणी होते.

------------

आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्या!

* दूषित पाण्यामुळे साथ रोगांबरोबरच गंभीर स्वरुपाचे आजार होऊन प्रसंगी मृत्यू होण्याचाही संभव आहे.

* मलेरिया, हिवताप, हगवण, वांत्या, सर्दी, खोकला, ताप अशा प्रकारचे आजार होण्याची शक्यता असल्याने पिण्यासाठी शुद्ध पाणी वापरावे, अशा सूचना आहेत.

* पाण्यापासून होणारे आजार टाळण्यासाठी पाणी शुद्ध असणे व त्यापेक्षा पाणी उकळून पिणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.

--------------

१,८९४ गावांचे नमुने घेतले तपासणीसाठी

१६० गावातील नमुने आढळले दूषित