शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
7
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
8
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
9
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
10
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
11
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
12
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
13
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
14
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
15
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
17
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
18
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
19
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
20
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...

सावधान! १६० गावांमध्ये पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:18 IST

नाशिक जिल्ह्यात दर महिन्याला पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने प्रत्येक गावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. या नमुन्यांचे निरीक्षण ...

नाशिक जिल्ह्यात दर महिन्याला पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने प्रत्येक गावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. या नमुन्यांचे निरीक्षण केल्यानंतर कमी दूषित, अधिक दूषित व पाणी पिण्यायोग्य असे तीन प्रकारात त्याचे वर्गीकरण केले जाते. जून महिन्यात म्हणजेच पावसाळा सुरू होऊन काही कालावधी उलटत नाही तोच पाणी पुरवठा विभागाने अशा प्रकारचे नमुने तपासणीसाठी घेतले असता तपासलेल्या १८९४ नमुन्यांपैकी १६० गावांमधील पाणी दूषित म्हणजेच पिण्यासाठी योग्य नसल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे या गावांमध्ये साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त केली जात असून, संबंधित गावातील ग्रामपंचायतींना पाणी शुद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशुद्ध पाण्यामुळे मलेरिया, हिवताप, थंडी-ताप, सर्दी, खोकला यांसारखे आजार होण्याची शक्यता असल्यामुळे आरोग्य विभागालाही त्याबाबत अवगत करण्यात आले आहे.

-------------

तालुकानिहाय आढावा

कळवण- ३०२-९

बागलाण- ९६-२

मालेगाव- ९७-४

नांदगाव- ८३-९

चांदवड- ९०- ६

देवळा- ६०-०

सुरगाणा- १६९-९

पेठ- १०५-०

येवला- ९६-२

निफाड- १५६-१

इगतपुरी- ११६-११

नाशिक- ६४- १४

दिंडोरी- २२४-६८

सिन्नर- ६७- १२

त्र्यंबकेश्वर- १६९-१३

------------

ज्या गावात तपासणी झालीच नाही त्याचे काय?

* पाणी पुरवठा व स्वच्छता विभागावर प्रत्येक नागरिकाला पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेच्या पाण्याचे नमुने दरमहा घेतले जातात.

* अशा प्रकारचे नमुने दरमहा घेतले जातात. घेतलेले नमुने साधारणत: सलग तीन वेळा दोेषविरहीत आढळल्यास अशा गावांमध्ये पुन्हा तपासणी करण्याची गरज नसते.

* ज्या गावांमध्ये पाण्याची तपासणी झालीच नाही, अशा गावांची जबाबदारी ग्रामपंचायतींवर सोपविण्यात आली असून, ग्रामपंचायतींनी याकामी पुढाकार घेऊन वेळच्या वेळी पाणी नमुने तपासून घेणे आवश्यक करण्यात आले आहे.

-----------

कोरोनामुळे नमुने घटले

* गेल्या वर्षीपासून जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला असल्याने त्यापासून ग्रामीण भागही सुटला नाही. सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे पाण्याचे नमुने घेण्यात काही प्रमाणात अनियमितता आली.

* सप्टेंबर महिन्यापासून पाण्याचे नमुने पुन्हा तपासण्यास सुरुवात झाली आहे. गावोगावी जाऊन पाण्याचे नमुने घेण्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडे नसल्याने दरमहा सर्वच गावात पाणी नमुने घेणे शक्य नसते.

* कोरोना व अन्य कारणांमुळेही पाण्याचे नमुने घेणे अशक्य होत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, बऱ्याच वेळा ठराविक गावांतील पाण्याचे नमुने रॅन्डमली घेतले जातात.

--------------

* पाण्याचे नमुने तपासणी ही नियमित चालणारी बाब असून, दूषित पाणी पुरवठा होत असल्यास संबंधित ग्रामपंचायतीला रेड कार्ड दिले जाते.

* पाणी कमी दूषित असल्यास पिवळे कार्ड व पाणी शुद्ध असल्यास ग्रीन कार्ड दिले जाते. या कार्डाच्या आधारे ग्रामपंचायतींनी काय उपाययोजना केल्या, त्याची पाहणी होते.

------------

आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्या!

* दूषित पाण्यामुळे साथ रोगांबरोबरच गंभीर स्वरुपाचे आजार होऊन प्रसंगी मृत्यू होण्याचाही संभव आहे.

* मलेरिया, हिवताप, हगवण, वांत्या, सर्दी, खोकला, ताप अशा प्रकारचे आजार होण्याची शक्यता असल्याने पिण्यासाठी शुद्ध पाणी वापरावे, अशा सूचना आहेत.

* पाण्यापासून होणारे आजार टाळण्यासाठी पाणी शुद्ध असणे व त्यापेक्षा पाणी उकळून पिणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.

--------------

१,८९४ गावांचे नमुने घेतले तपासणीसाठी

१६० गावातील नमुने आढळले दूषित