शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

वाकी खापरी धरणातून पाण्याचा बेसुमार

By admin | Updated: January 14, 2017 00:10 IST

विसर्गपाणी सोडणे न थांबवल्यास तीव्र आंदोलन

घोटी : नांदूरमधमेश्वर प्रकल्पांतर्गत इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणातून गेल्या महिन्यापासून दारणा धरणात सोडण्यात येणारे पाणी तत्काळ बंद करावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी आणि ग्रामपंचायतींच्या वतीने वाकी खापरी धरणाचे सहायक अभियंता हरिभाऊ गीते यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. परिसरातील अनेक गावांची शेती व्यवसायाची मदार या धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यातच धरणातून कोणतेही ठोस कारण नसताना पाणी सोडले जात असून, धरण रिकामे होत आहे. सोडण्यात येणारे पाणी जलद वेगाने जात आहे. पाण्याचा विसर्ग तत्काळ ंबंद करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी नव्याने झालेले यावर्षी काम पूर्णत्वाकडे असल्याने पूर्ण क्षमतेने भरले. सध्या धरणात ८०० दलघफू इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.या धरणाच्या अनेक दरवाज्यांतून दारणा धरणात गेल्या महिन्यापासून पाणी सोडण्यात येत आहे. पाणी सोडल्यामुळे या भागातील कुर्णोली, वाकी, कोरपगाव, भावली, पिंपळगाव भटाटा, वाळविहीर आदि गावांतील शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. असेच चालू राहिले तर ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीला धरण रिकामे होण्याची भीतीने परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. नांदूरमधमेश्वर प्रकल्पांतर्गत असणाऱ्या या धरणातून कारण नसताना पाणी सोडले जात असल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. पाणी सोडण्याचे तत्काळ न थांबवल्यास कुठल्याही क्षणी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. (वार्ताहर)