शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

वाकी खापरी धरणातून पाण्याचा बेसुमार

By admin | Updated: January 14, 2017 00:10 IST

विसर्गपाणी सोडणे न थांबवल्यास तीव्र आंदोलन

घोटी : नांदूरमधमेश्वर प्रकल्पांतर्गत इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणातून गेल्या महिन्यापासून दारणा धरणात सोडण्यात येणारे पाणी तत्काळ बंद करावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी आणि ग्रामपंचायतींच्या वतीने वाकी खापरी धरणाचे सहायक अभियंता हरिभाऊ गीते यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. परिसरातील अनेक गावांची शेती व्यवसायाची मदार या धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यातच धरणातून कोणतेही ठोस कारण नसताना पाणी सोडले जात असून, धरण रिकामे होत आहे. सोडण्यात येणारे पाणी जलद वेगाने जात आहे. पाण्याचा विसर्ग तत्काळ ंबंद करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी नव्याने झालेले यावर्षी काम पूर्णत्वाकडे असल्याने पूर्ण क्षमतेने भरले. सध्या धरणात ८०० दलघफू इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.या धरणाच्या अनेक दरवाज्यांतून दारणा धरणात गेल्या महिन्यापासून पाणी सोडण्यात येत आहे. पाणी सोडल्यामुळे या भागातील कुर्णोली, वाकी, कोरपगाव, भावली, पिंपळगाव भटाटा, वाळविहीर आदि गावांतील शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. असेच चालू राहिले तर ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीला धरण रिकामे होण्याची भीतीने परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. नांदूरमधमेश्वर प्रकल्पांतर्गत असणाऱ्या या धरणातून कारण नसताना पाणी सोडले जात असल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. पाणी सोडण्याचे तत्काळ न थांबवल्यास कुठल्याही क्षणी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. (वार्ताहर)