शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

वाकी खापरी धरणातून पाण्याचा बेसुमार

By admin | Updated: January 14, 2017 00:10 IST

विसर्गपाणी सोडणे न थांबवल्यास तीव्र आंदोलन

घोटी : नांदूरमधमेश्वर प्रकल्पांतर्गत इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणातून गेल्या महिन्यापासून दारणा धरणात सोडण्यात येणारे पाणी तत्काळ बंद करावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी आणि ग्रामपंचायतींच्या वतीने वाकी खापरी धरणाचे सहायक अभियंता हरिभाऊ गीते यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. परिसरातील अनेक गावांची शेती व्यवसायाची मदार या धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यातच धरणातून कोणतेही ठोस कारण नसताना पाणी सोडले जात असून, धरण रिकामे होत आहे. सोडण्यात येणारे पाणी जलद वेगाने जात आहे. पाण्याचा विसर्ग तत्काळ ंबंद करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी नव्याने झालेले यावर्षी काम पूर्णत्वाकडे असल्याने पूर्ण क्षमतेने भरले. सध्या धरणात ८०० दलघफू इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.या धरणाच्या अनेक दरवाज्यांतून दारणा धरणात गेल्या महिन्यापासून पाणी सोडण्यात येत आहे. पाणी सोडल्यामुळे या भागातील कुर्णोली, वाकी, कोरपगाव, भावली, पिंपळगाव भटाटा, वाळविहीर आदि गावांतील शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. असेच चालू राहिले तर ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीला धरण रिकामे होण्याची भीतीने परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. नांदूरमधमेश्वर प्रकल्पांतर्गत असणाऱ्या या धरणातून कारण नसताना पाणी सोडले जात असल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. पाणी सोडण्याचे तत्काळ न थांबवल्यास कुठल्याही क्षणी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. (वार्ताहर)