शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी श्रेयवादाची रंगली लढाई

By admin | Updated: December 24, 2016 00:58 IST

उपोषणाची यशस्वी सांगता : पालखेडच्या आवर्तनातून बंधारे भरण्याचे आदेश

येवला : तालुक्यातील पूर्वभागातील वितरिका क्रमांक ४६ ते ५२ या आठमाही करण्यासाठी व चालू आवर्तनातून पिण्यासाठी बंधारे भरून देण्याच्या मागणीसाठी लाभक्षेत्रातील २३ शेतकऱ्यांनी उपोषणाचे हत्त्यार उपसल्यानंतर त्याची पालकमंत्र्यांसह पाटबंधारे विभागाने तातडीने दखल घेतली व तसे आदेश संबंधित विभागाला देत लेखी आश्वासन दिले. मात्र श्रेयवादावरून तालुक्यात राजकारण पेटल्याचे चित्र दिसत आहे.पालखेड तट डावा कालवा किमी ११० ते १२० वरील वितरिका क्र . ४६ ते ५२ खरीप कालवा आठमाही करण्याची मागणी प्रलंबित असून, २०१४ मध्ये जलसंपदा खात्याकडून चारी क्र. ४६ ते ५२ या चाऱ्यांकरिता पाणी मिळाले होते. परंतु या वर्षीच्या नियोजन बैठकीमध्ये त्या चारीला पाणी देण्याचे नियोजन केले गेले नाही. याबाबत उपोषणकर्त्यांची मागणी न्याय आहे, पाणी दिले पाहिजे, असे निवेदन राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीने दिले तर भाजपा आणि शिवसेनादेखील पाणीप्रश्नासाठी सरसावली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमी सारी ताकद एकवटली आणि शेतकऱ्यांना पाणी मिळाले. आमच्यामुळेच पाणी आले, अशी हाकाटी राजकीय पक्षांनी पिटली असली तरी खरे पाणी मिळवण्याचे श्रेय उपोषणकर्त्यानाच आहे. पालखेड कालव्याच्या ४६ ते ५२ चारी वरील बंधारे मिळाले पाहिजे, अशी त्यांची मागणी होती. दरम्यान, चौथ्या दिवशी पाच उपोषणकर्ते अत्यवस्थ झाल्याने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. त्यामुळे उपोषणाचे हत्यार अधिक धारदार झाल्याने पालकमंत्र्यांसह पाटबंधारे विभागाने चौथ्या दिवशी दखल घेऊन अखेर २३ डिसेंबरला वितरिका क्र. ४६ ते ५२ मधील कालव्यालगतचे बंधारे भरून देण्याचे लेखी आश्वासन उपोषणकर्त्यांना दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले.उपोषणस्थळी तिसऱ्या दिवशी एकही शासकीय अधिकारी फिरकला नाही. त्यामुळे पालखेडच्या पाण्याने तालुक्यात चांगलाच पेट घेतला. दरम्यान, पाण्याची मागणी मान्य न झाल्यास रास्ता रोकोचे नियोजनही करण्यात आले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंपी, शाखा अभियंता सुदाम दाणे, उपविभागीय अधिकारी वैभव भागवत यांनी तातडीने येवला गाठत उपोषणकर्त्यांची भेट घेतली व पाणी सोडता येणार नाही, असे ठामपणे सांगितले. वितरिका क्र .४६ ते ५२चा विचार आगामी फेब्रुवारी महिन्यातील आवर्तनात केला जाईल. त्यामुळे आपण उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती केली होती. मात्र, आंदोलक संतप्त झाले व त्यांनी जोपर्यंत पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांनाही कोठेही जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला. याबाबत भाजपाचे शहराध्यक्ष आनंद शिंदे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन व दादा भुसे यांच्याशी चर्चा केली. अखेर महाजन यांनी अभियंता राजेंद्र शिंपी यांना पाणी सोडण्याचा आदेश दिला आणि उपोषणकर्त्यांना उपोषण सोडले. (वार्ताहर)