शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

पाण्यासाठी श्रेयवादाची रंगली लढाई

By admin | Updated: December 24, 2016 00:58 IST

उपोषणाची यशस्वी सांगता : पालखेडच्या आवर्तनातून बंधारे भरण्याचे आदेश

येवला : तालुक्यातील पूर्वभागातील वितरिका क्रमांक ४६ ते ५२ या आठमाही करण्यासाठी व चालू आवर्तनातून पिण्यासाठी बंधारे भरून देण्याच्या मागणीसाठी लाभक्षेत्रातील २३ शेतकऱ्यांनी उपोषणाचे हत्त्यार उपसल्यानंतर त्याची पालकमंत्र्यांसह पाटबंधारे विभागाने तातडीने दखल घेतली व तसे आदेश संबंधित विभागाला देत लेखी आश्वासन दिले. मात्र श्रेयवादावरून तालुक्यात राजकारण पेटल्याचे चित्र दिसत आहे.पालखेड तट डावा कालवा किमी ११० ते १२० वरील वितरिका क्र . ४६ ते ५२ खरीप कालवा आठमाही करण्याची मागणी प्रलंबित असून, २०१४ मध्ये जलसंपदा खात्याकडून चारी क्र. ४६ ते ५२ या चाऱ्यांकरिता पाणी मिळाले होते. परंतु या वर्षीच्या नियोजन बैठकीमध्ये त्या चारीला पाणी देण्याचे नियोजन केले गेले नाही. याबाबत उपोषणकर्त्यांची मागणी न्याय आहे, पाणी दिले पाहिजे, असे निवेदन राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीने दिले तर भाजपा आणि शिवसेनादेखील पाणीप्रश्नासाठी सरसावली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमी सारी ताकद एकवटली आणि शेतकऱ्यांना पाणी मिळाले. आमच्यामुळेच पाणी आले, अशी हाकाटी राजकीय पक्षांनी पिटली असली तरी खरे पाणी मिळवण्याचे श्रेय उपोषणकर्त्यानाच आहे. पालखेड कालव्याच्या ४६ ते ५२ चारी वरील बंधारे मिळाले पाहिजे, अशी त्यांची मागणी होती. दरम्यान, चौथ्या दिवशी पाच उपोषणकर्ते अत्यवस्थ झाल्याने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. त्यामुळे उपोषणाचे हत्यार अधिक धारदार झाल्याने पालकमंत्र्यांसह पाटबंधारे विभागाने चौथ्या दिवशी दखल घेऊन अखेर २३ डिसेंबरला वितरिका क्र. ४६ ते ५२ मधील कालव्यालगतचे बंधारे भरून देण्याचे लेखी आश्वासन उपोषणकर्त्यांना दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले.उपोषणस्थळी तिसऱ्या दिवशी एकही शासकीय अधिकारी फिरकला नाही. त्यामुळे पालखेडच्या पाण्याने तालुक्यात चांगलाच पेट घेतला. दरम्यान, पाण्याची मागणी मान्य न झाल्यास रास्ता रोकोचे नियोजनही करण्यात आले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंपी, शाखा अभियंता सुदाम दाणे, उपविभागीय अधिकारी वैभव भागवत यांनी तातडीने येवला गाठत उपोषणकर्त्यांची भेट घेतली व पाणी सोडता येणार नाही, असे ठामपणे सांगितले. वितरिका क्र .४६ ते ५२चा विचार आगामी फेब्रुवारी महिन्यातील आवर्तनात केला जाईल. त्यामुळे आपण उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती केली होती. मात्र, आंदोलक संतप्त झाले व त्यांनी जोपर्यंत पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांनाही कोठेही जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला. याबाबत भाजपाचे शहराध्यक्ष आनंद शिंदे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन व दादा भुसे यांच्याशी चर्चा केली. अखेर महाजन यांनी अभियंता राजेंद्र शिंपी यांना पाणी सोडण्याचा आदेश दिला आणि उपोषणकर्त्यांना उपोषण सोडले. (वार्ताहर)