शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

साठवण तलावाने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2016 00:35 IST

येवला : ८ जुलैपर्यंतच पुरणार पाणी; टंचाईचे सावट गडद

 येवला : शहराला साठवण तलावातील मृत साठ्यातून पाणीपुरवठा सुरू झाला असून, तलावाचा तळ उघडा पडला आहे. केवळ ८ जुलैपर्यंत पाणी पुरणार असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. आता फक्त पावसाची प्रतीक्षा आहे. अन्यथा पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होणार असल्याची चिन्हे आहेत. एप्रिलमध्ये पालखेडच्या पाणी आवर्तनाने शहर साठवण तलावात सुमारे ४० द.ल.घ.फूट पाणी भरले. जुलैअखेरपर्यंत आपल्याला पाण्याची काहीच चिंता नाही अशा वल्गना झाल्या. सुरुवातीला आवर्तनानंतर १० दिवस पाणी चांगल्या पद्धतीने मिळाले. पुन्हा सहानंतर ८ आणि १८ मेपासून दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. पालखेड पाणी आवर्तनाने शहर साठवण तलावात एप्रिलमध्ये भरलेले ४० द.ल.घ.फूट पाणी जुलैअखेर पुरणार असे आकडेवारी सांगत होती.शहराला दररोज ५० लाख लिटर पाणी लागते. बाष्पीभवन व पाण्याचा अन्य मार्गाने अपव्यय झाला तरीही जुलैअखेर पुरायला हवे होते. नेमके गणित कुठे बिघडते हे सर्वांना समजत असूनही त्यावर प्रभावी उपाययोजना होत नाही, ही येवलेकरांची शोकांतिका आहे. दहा दिवसाआड पाणीपुरवठा करूनही अवघ्या अडीच महिन्यात अशी भीषण पाणीटंचाई शहरवासीयांच्या वाट्याला येत आहे. या परिस्थितीला नेमके जबाबदार कोण, असा प्रश्न सोशिक शहरवासीय विचारू लागले आहेत. गेल्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात शहरात अतितीव्र पाणीटंचाई भासली. या टंचाईत अनेकांनी शहराची तहान भागवण्यासाठी टँँकरची स्वखर्चाने व्यवस्था केली होती. (वार्ताहर)