शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
4
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
5
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
6
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
8
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
9
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
10
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
11
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
12
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
13
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
14
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
15
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
16
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
17
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
18
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
19
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
20
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी

साठवण तलावाने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2016 00:35 IST

येवला : ८ जुलैपर्यंतच पुरणार पाणी; टंचाईचे सावट गडद

 येवला : शहराला साठवण तलावातील मृत साठ्यातून पाणीपुरवठा सुरू झाला असून, तलावाचा तळ उघडा पडला आहे. केवळ ८ जुलैपर्यंत पाणी पुरणार असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. आता फक्त पावसाची प्रतीक्षा आहे. अन्यथा पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होणार असल्याची चिन्हे आहेत. एप्रिलमध्ये पालखेडच्या पाणी आवर्तनाने शहर साठवण तलावात सुमारे ४० द.ल.घ.फूट पाणी भरले. जुलैअखेरपर्यंत आपल्याला पाण्याची काहीच चिंता नाही अशा वल्गना झाल्या. सुरुवातीला आवर्तनानंतर १० दिवस पाणी चांगल्या पद्धतीने मिळाले. पुन्हा सहानंतर ८ आणि १८ मेपासून दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. पालखेड पाणी आवर्तनाने शहर साठवण तलावात एप्रिलमध्ये भरलेले ४० द.ल.घ.फूट पाणी जुलैअखेर पुरणार असे आकडेवारी सांगत होती.शहराला दररोज ५० लाख लिटर पाणी लागते. बाष्पीभवन व पाण्याचा अन्य मार्गाने अपव्यय झाला तरीही जुलैअखेर पुरायला हवे होते. नेमके गणित कुठे बिघडते हे सर्वांना समजत असूनही त्यावर प्रभावी उपाययोजना होत नाही, ही येवलेकरांची शोकांतिका आहे. दहा दिवसाआड पाणीपुरवठा करूनही अवघ्या अडीच महिन्यात अशी भीषण पाणीटंचाई शहरवासीयांच्या वाट्याला येत आहे. या परिस्थितीला नेमके जबाबदार कोण, असा प्रश्न सोशिक शहरवासीय विचारू लागले आहेत. गेल्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात शहरात अतितीव्र पाणीटंचाई भासली. या टंचाईत अनेकांनी शहराची तहान भागवण्यासाठी टँँकरची स्वखर्चाने व्यवस्था केली होती. (वार्ताहर)