शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

धरणांनी गाठला तळ

By admin | Updated: June 1, 2016 00:17 IST

त्र्यंबकेश्वर : पाणीटंचाईने ग्रामस्थ हवालदिल

 त्र्यंबकेश्वर : पावसाचे माहेरघर असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धरणांनीच तळ गाठल्याने पाणीटंचाईचे भीषण संकट ओढवले आहे. परिणामी पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून, जनावरे पाळायची कशी या चिंतेने शेतकरीवर्ग धास्तावला आहे. सर्वाधिक पाऊस पडूनही योग्य नियोजन नसल्याने मे महिन्यापर्यंत पाणीसाठा शिल्लक राहत नाही. पाणी वापराचे सुयोग्य, काटेकोरपणे नियोजन व वापर केल्यानेच संकटावर मात करणे शक्य होणार आहे. येथील जंगलामध्ये दरवर्षी होणारी घट तसेच पर्जन्याचे कमी झालेले प्रमाण यामुळे धरणे, तलाव पूर्ण क्षमतेने भरली जात नसल्याचे दिसून येते.तालुक्यात सहा ते आठ छोटी -मोठी धरणे असून, त्या सर्वांमधील पाणीसाठा कमी झालेला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने तलावात अपेक्षित पाणीसाठा होऊ शकला नाही. झालेल्या पावसाने धरणे कशीबशी भरली. उन्हाच्या झळा वाढल्यानंतर ते पाणीही आटले असून, काही पाझर तलाव उन्हाळ्याच्या मध्यावरच कोरडे ठणठणीत पडले आहेत. तालुक्यातील कोणे, वाघेरे, तळेगाव, अंबोली, अंजनेरी, नाईकवाडी या धरणांनी तळ गाठला आहे. काही दिवसात तलावही कोरडे पडतील अशी भीती लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. भीषण पाणीटंचाईमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे सरकारी कर्ज भरणेही अवघड झाले आहे. त्र्यंबकेश्वर शहरात व तालुक्यात दिवसागणिक पाणीटंचाईचे सावट गडद होऊ लागले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वणवण करावी लागत आहे. यासाठीच येणाऱ्या भावी पिढीसाठी पाणी वाचवा, जीवन वाचवा असे म्हणणे योग्य ठरेल. (वार्ताहर)