शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

धरणांनी गाठला तळ

By admin | Updated: June 1, 2016 00:17 IST

त्र्यंबकेश्वर : पाणीटंचाईने ग्रामस्थ हवालदिल

 त्र्यंबकेश्वर : पावसाचे माहेरघर असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धरणांनीच तळ गाठल्याने पाणीटंचाईचे भीषण संकट ओढवले आहे. परिणामी पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून, जनावरे पाळायची कशी या चिंतेने शेतकरीवर्ग धास्तावला आहे. सर्वाधिक पाऊस पडूनही योग्य नियोजन नसल्याने मे महिन्यापर्यंत पाणीसाठा शिल्लक राहत नाही. पाणी वापराचे सुयोग्य, काटेकोरपणे नियोजन व वापर केल्यानेच संकटावर मात करणे शक्य होणार आहे. येथील जंगलामध्ये दरवर्षी होणारी घट तसेच पर्जन्याचे कमी झालेले प्रमाण यामुळे धरणे, तलाव पूर्ण क्षमतेने भरली जात नसल्याचे दिसून येते.तालुक्यात सहा ते आठ छोटी -मोठी धरणे असून, त्या सर्वांमधील पाणीसाठा कमी झालेला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने तलावात अपेक्षित पाणीसाठा होऊ शकला नाही. झालेल्या पावसाने धरणे कशीबशी भरली. उन्हाच्या झळा वाढल्यानंतर ते पाणीही आटले असून, काही पाझर तलाव उन्हाळ्याच्या मध्यावरच कोरडे ठणठणीत पडले आहेत. तालुक्यातील कोणे, वाघेरे, तळेगाव, अंबोली, अंजनेरी, नाईकवाडी या धरणांनी तळ गाठला आहे. काही दिवसात तलावही कोरडे पडतील अशी भीती लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. भीषण पाणीटंचाईमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे सरकारी कर्ज भरणेही अवघड झाले आहे. त्र्यंबकेश्वर शहरात व तालुक्यात दिवसागणिक पाणीटंचाईचे सावट गडद होऊ लागले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वणवण करावी लागत आहे. यासाठीच येणाऱ्या भावी पिढीसाठी पाणी वाचवा, जीवन वाचवा असे म्हणणे योग्य ठरेल. (वार्ताहर)