शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

धरणांनी गाठला तळ

By admin | Updated: June 1, 2016 00:17 IST

त्र्यंबकेश्वर : पाणीटंचाईने ग्रामस्थ हवालदिल

 त्र्यंबकेश्वर : पावसाचे माहेरघर असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धरणांनीच तळ गाठल्याने पाणीटंचाईचे भीषण संकट ओढवले आहे. परिणामी पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून, जनावरे पाळायची कशी या चिंतेने शेतकरीवर्ग धास्तावला आहे. सर्वाधिक पाऊस पडूनही योग्य नियोजन नसल्याने मे महिन्यापर्यंत पाणीसाठा शिल्लक राहत नाही. पाणी वापराचे सुयोग्य, काटेकोरपणे नियोजन व वापर केल्यानेच संकटावर मात करणे शक्य होणार आहे. येथील जंगलामध्ये दरवर्षी होणारी घट तसेच पर्जन्याचे कमी झालेले प्रमाण यामुळे धरणे, तलाव पूर्ण क्षमतेने भरली जात नसल्याचे दिसून येते.तालुक्यात सहा ते आठ छोटी -मोठी धरणे असून, त्या सर्वांमधील पाणीसाठा कमी झालेला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने तलावात अपेक्षित पाणीसाठा होऊ शकला नाही. झालेल्या पावसाने धरणे कशीबशी भरली. उन्हाच्या झळा वाढल्यानंतर ते पाणीही आटले असून, काही पाझर तलाव उन्हाळ्याच्या मध्यावरच कोरडे ठणठणीत पडले आहेत. तालुक्यातील कोणे, वाघेरे, तळेगाव, अंबोली, अंजनेरी, नाईकवाडी या धरणांनी तळ गाठला आहे. काही दिवसात तलावही कोरडे पडतील अशी भीती लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. भीषण पाणीटंचाईमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे सरकारी कर्ज भरणेही अवघड झाले आहे. त्र्यंबकेश्वर शहरात व तालुक्यात दिवसागणिक पाणीटंचाईचे सावट गडद होऊ लागले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वणवण करावी लागत आहे. यासाठीच येणाऱ्या भावी पिढीसाठी पाणी वाचवा, जीवन वाचवा असे म्हणणे योग्य ठरेल. (वार्ताहर)