शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
5
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
6
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
7
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
8
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
9
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
10
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
11
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
12
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
13
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
14
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
15
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
16
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
17
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
18
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
19
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
20
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप

अंबोली धरणाने गाठला तळ

By admin | Updated: June 30, 2016 00:47 IST

त्र्यंबकेश्वर : तीन आठवडे पुरेल इतकेच पाणी

 त्र्यंबकेश्वर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अंबोली धरणातील जलाशयाने तळ गाठला असून, केवळ तीनच आठवडे पाणी पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याचे दिसून येत आहे. धरणातून शेतीसाठी उचलण्यात येणारे पाणी बंद केले आणि पाण्याचा वापर जपून केला तरच पाणी पुरेल, असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख बाळासाहेब फसाळे यांनी सांगितले.त्र्यंबक शहराला सध्या ७० टक्के पाणी अंबोली धरणातून व ३० टक्के पाणी गौतमी-गोदावरी (बेझे) धरणातून देण्यात येत आहे. या दोन्हीही धरणांतील पाणीसाठा जवळपास संपुष्टात आला आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसात पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांबरोबरच त्र्यंबकवासीयांची पाण्याची स्थिती गंभीर होणार आहे. पावसाच्या हुलकावण्या सुरूच आहेत. आकाशात जमा झालेले काळे ढग इतरत्र जात आहेत. अन् पाऊस झालाच तर तो रिमझिम स्वरूपाचा आहे. जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.दरम्यान, शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण केली असून, त्यासाठी जोरदार पावसाची आवश्यकता आहे. अन्यथा दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे राहणार आहे. पाण्याचा साठा संपुष्टात येत असल्याने पाऊस पडेपर्यंत पिण्याच्या पाण्याचा वापर नागरिकांनी काटकसरीने करावा व पाणी जपून वापरावे, असे आवाहन नगरपालिका प्रशासन व पालिका पदाधिकाऱ्यांनी केले आहे. (वार्ताहर)