शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

खरीप कर्ज वाटपात बँकांची आडकाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:20 IST

नाशिक : खरीप हंगामात शेतकऱ्यांना २ हजार ७८० कोटींचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट असतानाही खासगी तसेच सरकारी ...

नाशिक : खरीप हंगामात शेतकऱ्यांना २ हजार ७८० कोटींचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट असतानाही खासगी तसेच सरकारी बँकांकडून आडकाठी केली जात असल्याने उद्दिष्ट पूर्ण होणार कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आतापर्यंत एकूण उद्दिष्टाच्या केवळ ५४ टक्के इतकेच कर्ज वाटप झाल्याचे समेार आले आहे.

सन २०२१-२२ च्या खरीप हंगामासाठी २ हजार ७८० कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. जिल्हा तसेच खासगी आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून कर्ज वाटप करण्यात येत आहे. मात्र, जिल्हा बँकवगळता अन्य बँकांकडून पुरेसा प्रतिसाद नसल्याने कर्ज वाटपात जिल्ह्याची कामगिरी उंचावलेली दिसत नाही. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोना संकटामुळे शेतकऱ्यांना कर्ज वाटप करावे, अशा सूचना दिलेल्या आहेत. त्यांना याबाबतचा आढावादेखील घेतला आहे. मात्र अजूनही त्यात अपेक्षित वाढ होऊ शकलेली नाही.

बँकांना २ हजार ७८० कोटी उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. राष्ट्रीयीकृत बँकेला १ हजार ८७२ कोटींचे उद्दिष्ट असताना वाटप ९३५ कोटी इतके झाले आहे. खासगी बँकेला ३६५ कोटींचे उद्दिष्ट असताना त्यांनी केवळ १४५ कोटींचे वाटप करण्यात आले आहे तर ग्रामीण बँकेने ८ कोटींपैकी ४.३५ कोटींचे वितरण केलेले आहे. जिल्हा बँकेची कामगिरी मात्र चांगली राहिली आहे. ५३५ कोटी ४२९ कोटींचे कर्ज वाटप केेलेले आहे. जिल्ह्यातील खरीप कर्जाची एकूण आकडेवारी पाहिली तर कर्ज वाटपाची टक्केवारी अवघी ५४ टक्के इतकी असून आतापर्यंत १ हजार ५१३ कोटी कर्ज वाटप करण्यात आले.

कोरोनाचा संकट काळ आणि खरिपाची परिस्थिती पाहता बँकांनी शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्यावर कर्जाचा पुरवठा करणे अपेक्षित आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून देखील दरवेळी याबाबतचा आढावा घेऊन बँकांचा सूचना दिल्या जातात. पालकमंत्र्यांनीही बँकांना याबाबतचे आवाहन केलेले आहेे. मात्र, त्यास अपेक्षित प्रतिसाद दिला जात नसल्याचे दिसते. शेतकऱ्यांना बी-बियाणे, खतांसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असते. मात्र, कर्ज देण्यास बँकांकडून आखडता हात घेतला जात असल्याचे आकडेवारीवरून दिसते.

शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा बँकेचा अपवादवगळता खासगी, ग्रामीण व राष्ट्रीयकृत बँकांचे कर्जवाटप कासवगतीने सुरू आहे. थकबाकी, एनओसी किंवा कर्जफेडीच्या कारणावरून शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार दिला जात आहे. त्यास जिल्हा बँक अपवाद असून जिल्हा बँकेला ५३५ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यापैकी ४२९ कोटींचे कर्ज वाटप केले आहे तर राष्ट्रीयीकृत, खासगी व ग्रामीण बँका कर्जवाटपात हात आखडता घेताना दिसत आहेत.