शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खरीप कर्ज वाटपात बँकांची आडकाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:20 IST

नाशिक : खरीप हंगामात शेतकऱ्यांना २ हजार ७८० कोटींचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट असतानाही खासगी तसेच सरकारी ...

नाशिक : खरीप हंगामात शेतकऱ्यांना २ हजार ७८० कोटींचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट असतानाही खासगी तसेच सरकारी बँकांकडून आडकाठी केली जात असल्याने उद्दिष्ट पूर्ण होणार कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आतापर्यंत एकूण उद्दिष्टाच्या केवळ ५४ टक्के इतकेच कर्ज वाटप झाल्याचे समेार आले आहे.

सन २०२१-२२ च्या खरीप हंगामासाठी २ हजार ७८० कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. जिल्हा तसेच खासगी आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून कर्ज वाटप करण्यात येत आहे. मात्र, जिल्हा बँकवगळता अन्य बँकांकडून पुरेसा प्रतिसाद नसल्याने कर्ज वाटपात जिल्ह्याची कामगिरी उंचावलेली दिसत नाही. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोना संकटामुळे शेतकऱ्यांना कर्ज वाटप करावे, अशा सूचना दिलेल्या आहेत. त्यांना याबाबतचा आढावादेखील घेतला आहे. मात्र अजूनही त्यात अपेक्षित वाढ होऊ शकलेली नाही.

बँकांना २ हजार ७८० कोटी उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. राष्ट्रीयीकृत बँकेला १ हजार ८७२ कोटींचे उद्दिष्ट असताना वाटप ९३५ कोटी इतके झाले आहे. खासगी बँकेला ३६५ कोटींचे उद्दिष्ट असताना त्यांनी केवळ १४५ कोटींचे वाटप करण्यात आले आहे तर ग्रामीण बँकेने ८ कोटींपैकी ४.३५ कोटींचे वितरण केलेले आहे. जिल्हा बँकेची कामगिरी मात्र चांगली राहिली आहे. ५३५ कोटी ४२९ कोटींचे कर्ज वाटप केेलेले आहे. जिल्ह्यातील खरीप कर्जाची एकूण आकडेवारी पाहिली तर कर्ज वाटपाची टक्केवारी अवघी ५४ टक्के इतकी असून आतापर्यंत १ हजार ५१३ कोटी कर्ज वाटप करण्यात आले.

कोरोनाचा संकट काळ आणि खरिपाची परिस्थिती पाहता बँकांनी शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्यावर कर्जाचा पुरवठा करणे अपेक्षित आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून देखील दरवेळी याबाबतचा आढावा घेऊन बँकांचा सूचना दिल्या जातात. पालकमंत्र्यांनीही बँकांना याबाबतचे आवाहन केलेले आहेे. मात्र, त्यास अपेक्षित प्रतिसाद दिला जात नसल्याचे दिसते. शेतकऱ्यांना बी-बियाणे, खतांसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असते. मात्र, कर्ज देण्यास बँकांकडून आखडता हात घेतला जात असल्याचे आकडेवारीवरून दिसते.

शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा बँकेचा अपवादवगळता खासगी, ग्रामीण व राष्ट्रीयकृत बँकांचे कर्जवाटप कासवगतीने सुरू आहे. थकबाकी, एनओसी किंवा कर्जफेडीच्या कारणावरून शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार दिला जात आहे. त्यास जिल्हा बँक अपवाद असून जिल्हा बँकेला ५३५ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यापैकी ४२९ कोटींचे कर्ज वाटप केले आहे तर राष्ट्रीयीकृत, खासगी व ग्रामीण बँका कर्जवाटपात हात आखडता घेताना दिसत आहेत.