शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

संमेलनाच्या निधीसाठी आता बँका ‘रडारवर’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:19 IST

नाशिक : साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी लागणाऱ्या निधीसाठी आमदार, खासदार आणि नगरसेवक यांच्याकडून निधीसाठीची ‘फिल्डिंग’ लावल्यानंतर आता आयोजकांनी त्यांचा मोर्चा ...

नाशिक : साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी लागणाऱ्या निधीसाठी आमदार, खासदार आणि नगरसेवक यांच्याकडून निधीसाठीची ‘फिल्डिंग’ लावल्यानंतर आता आयोजकांनी त्यांचा मोर्चा जिल्ह्यातील नागरी सहकारी बँका आणि पतसंस्थांकडे वळवला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील एका प्रख्यात ‘बँकर’कडेच ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आधीच ‘एनपीए’ग्रस्त झालेल्या बँकांना हे ‘सांस्कृतिक औदार्य’ दाखवणे शक्य नसूनही काहीतरी उसने अवसान आणून ‘योगदान’ देण्याची गळ घातली जात असल्याची चर्चा घडू लागली आहे.

साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी प्रारंभी २ कोटींपर्यंत ठरविण्यात आलेले बजेट आता वाढत जाऊन ४ कोटींपर्यंत लागणार असल्याचा आयोजकांचा अंदाज आहे. त्यामुळे शासनाकडून प्राप्त रक्कम, लोकप्रतिनिधींकडून मिळणारी प्रस्तावित रक्कम, स्थानिक उद्योजक, व्यावसायिकांनी दिलेली देणगी, नाशिककरांनी दिलेले योगदान, स्टॉल्स उभारणीतून मिळणारा निधी, अडीच कोटींहून अधिक निधी उभारणी पूर्ण झाली आहे. मात्र, सुधारित प्रस्तावानुसार आता संमेलनासाठीचे आर्थिक लक्ष्य हे ४ कोटींवर जाऊन पाेहोचले आहे. त्यामुळे उर्वरित निधीची पूर्तता कशी करायची, याबाबतची काळजी आयोजकांना वाटत होती. त्यासाठी मग गावोगाव फिरून निधी गोळा करणे, समित्यांमधील सदस्यांना पावती फाडण्यास सांगणे यासह विविध पर्यायांचा अवलंब करण्यात येत आहे. मात्र, तेवढ्यावरदेखील अपेक्षित निधीचे लक्ष्य गाठणे शक्य होणार नसल्याचे आयोजकांच्या लक्षात आले. त्यामुळेच संमेलनाच्या मुख्य कार्यकारिणीतील प्रमुख आणि समिती प्रमुखांनी मिळून कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या जिल्ह्यातील बँकांकडून संमेलनासाठी ‘योगदान’ मिळवण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अनेक नागरी सहकारी बँका, पतसंस्थांचे संस्थापक, अध्यक्ष आणि सर्वेसर्वा असणाऱ्यांना अनौपचारिक भेटीची निमंत्रणे गेली. या मान्यवरांना संबंधितांनी भेटीचे कारणही सांगितले न गेल्याने ते बुचकळ्यात पडले. मात्र, एकमेकांशी संपर्क झाल्यानंतर त्या कारणाचा त्यांना उलगडा झाला. त्यातदेखील ज्यांच्याकडून निमंत्रण गेले ते टाळता येण्याजोगे व्यक्तिमत्त्व नसल्याने संबंधित बँकांचे प्रमुख निर्धारित ठिकाणी पोहोचल्यानंतर विषय उलगडला गेला.

इन्फो

तब्बल १० लाखांचे ‘टार्गेट’

काही मोठ्या नागरी बँकांच्या प्रमुखांना संमेलन निधीसाठी विचारणा करण्यात आली. मात्र, एनपीए आणि अन्य आर्थिक समस्यांचा पाढा त्यांनी वाचल्याचे समजते. तरीदेखील किमान १० लाखांचे सांस्कृतिक औदार्य दाखवण्याचे आवाहन करून त्यांना एकप्रकारे तेवढे टार्गेटच देण्यात आले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे संबंधित बँक प्रमुखांची ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशीच अवस्था झाल्याचे बोलले जात आहे.

लोगो

साहित्य संमेलनाचा लोगो वापरावा.