शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

बाणगंगेला दुसºयांदा पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 23:14 IST

कसबे सुकेणे : दिंडोरी तालुक्यात आणि ओझर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे बाणगंगेला यंदाच्या पावसाळ्यातील दुसरा महापूर आला. सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बाणगंगेने धोक्याची पातळी गाठली. मौजे सुकेणेच्या पारापर्यंत पुराचे पाणी पोहचले.

कसबे सुकेणे : दिंडोरी तालुक्यात आणि ओझर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे बाणगंगेला यंदाच्या पावसाळ्यातील दुसरा महापूर आला. सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बाणगंगेने धोक्याची पातळी गाठली. मौजे सुकेणेच्या पारापर्यंत पुराचे पाणी पोहचले.सोमवारी दुपारी साडेतीन वाजेनंतर दिंडोरी तालुक्यात बाणगंगेच्या पाणलोट क्षेत्रात सुमारे अडीच तास मुसळधार पाऊस झाला. ओझर, दीक्षी, सुकेणा परिसरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे सोमवारी सायंकाळी बाणगंगेला यंदाच्या पावसाळ्यातील दुसरा मोठा पूर आला़ बाणगंगेच्या मोठ्या पुरामुळे दीक्षी, दात्याणे, ओणे, शिलेदारवाडी, खोल्या ओहोळ येथील लहानमोठ्या फरश्या व पूल पाण्याखाली गेल्याने या भागाचा संपर्क ओझर-सुकेणा रस्त्याशी तुटला़ या भागातील शेतीचे अतोनात नुकसान झाले असून, सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे व बाणगंगेच्या पूरपाण्यामुळे या भागातील शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेल्याने अतोनात नुकसान झाले आहे़ कसबे सुकेणे व मौजे सुकेणे नदीकाठच्या भागात धांदल उडाली. सायंकाळी साडेसात वाजेनंतर बाणगंगेने रौद्र रूप धारण केले. कसबे सुकेणे येथील दाऊदशाहवली बाबा मंदिरासमोरच्या नागरी वस्तीत तसेच मौजे सुकेणेच्या पिंपळपार, हॉटेल, दुकानांना पुराच्या पाण्याचा वेढा होता. रात्री उशिरापर्यंत बाणगंगेची धोक्याची पातळी कायम होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर नैसर्गिक आपत्ती या भागावर ओढवली आहे.अभोणा : गेल्या चार दिवसांपासून अभोणा शहरासह तालुक्यात सर्वदूर विजांच्या कडकडाटासह कोसळणाºया मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. परतीच्या मुसळधार पावसाने सोयाबीन, भात, मका, बाजरी आदी काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. शेतकºयांनी उन्हाळ कांद्यासाठी टाकलेले बियाणे दबले जाण्याची शक्यता असून, उगवलेल्या कांदा रोपाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वेधशाळेने वर्तविल्याप्रमाणे हा परतीचा पाऊस येत्या आठवड्यापर्यंत असाच कोसळत राहिला तर संपूर्ण खरीप हंगाम वाया जाण्याचा धोका तर असणारच त्याचबरोबर शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसणार असल्याचे जाणकार शेतकºयांनी सांगितले.दिंडोरी तालुक्यात रात्रभर पाऊसदिंडोरी : तालुक्यातील सर्व गावांमध्ये रविवारी रात्रभर पाऊस झाल्यानंतर सलग चौथ्या दिवशी सायंकाळी विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला असून, यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. द्राक्षे, भाजीपाला व खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान होत असून, शेतकºयांच्या तोंडचा घास परतीचा पाऊस हिरावून घेत असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. अनेक नदीनाल्यांना मोठे पूर आले. जानोरी येथे मोठा पूर आल्याने काही काळ वाहतूक बंद झाली होती. सध्या दिंडोरी तालुक्यातील काही द्राक्षबागा फुलोºयात असल्यामुळे कुज होण्याची शक्यता आहे. सतत पडणाºया पावसामळे द्राक्षवेलीची पाने जास्त काळ ओली राहिल्यास डावणी, करपा वाढणार आहे. त्याप्रमाणे या परिसरामध्ये टमाटा पीक जोरात होते; पंरतु या पिकाचेही नुकसान होणार आहे. तालुक्यात आता सोयाबीन, उडीद, मूग ही पिके काढणीला आली आहेत. रोज पडणाºया पावसामुळे या पिकांचे नुकसान होणार आहे. परतीच्या पावसामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकºयांनी नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे.