शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

बाणगंगेला दुसºयांदा पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 23:14 IST

कसबे सुकेणे : दिंडोरी तालुक्यात आणि ओझर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे बाणगंगेला यंदाच्या पावसाळ्यातील दुसरा महापूर आला. सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बाणगंगेने धोक्याची पातळी गाठली. मौजे सुकेणेच्या पारापर्यंत पुराचे पाणी पोहचले.

कसबे सुकेणे : दिंडोरी तालुक्यात आणि ओझर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे बाणगंगेला यंदाच्या पावसाळ्यातील दुसरा महापूर आला. सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बाणगंगेने धोक्याची पातळी गाठली. मौजे सुकेणेच्या पारापर्यंत पुराचे पाणी पोहचले.सोमवारी दुपारी साडेतीन वाजेनंतर दिंडोरी तालुक्यात बाणगंगेच्या पाणलोट क्षेत्रात सुमारे अडीच तास मुसळधार पाऊस झाला. ओझर, दीक्षी, सुकेणा परिसरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे सोमवारी सायंकाळी बाणगंगेला यंदाच्या पावसाळ्यातील दुसरा मोठा पूर आला़ बाणगंगेच्या मोठ्या पुरामुळे दीक्षी, दात्याणे, ओणे, शिलेदारवाडी, खोल्या ओहोळ येथील लहानमोठ्या फरश्या व पूल पाण्याखाली गेल्याने या भागाचा संपर्क ओझर-सुकेणा रस्त्याशी तुटला़ या भागातील शेतीचे अतोनात नुकसान झाले असून, सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे व बाणगंगेच्या पूरपाण्यामुळे या भागातील शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेल्याने अतोनात नुकसान झाले आहे़ कसबे सुकेणे व मौजे सुकेणे नदीकाठच्या भागात धांदल उडाली. सायंकाळी साडेसात वाजेनंतर बाणगंगेने रौद्र रूप धारण केले. कसबे सुकेणे येथील दाऊदशाहवली बाबा मंदिरासमोरच्या नागरी वस्तीत तसेच मौजे सुकेणेच्या पिंपळपार, हॉटेल, दुकानांना पुराच्या पाण्याचा वेढा होता. रात्री उशिरापर्यंत बाणगंगेची धोक्याची पातळी कायम होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर नैसर्गिक आपत्ती या भागावर ओढवली आहे.अभोणा : गेल्या चार दिवसांपासून अभोणा शहरासह तालुक्यात सर्वदूर विजांच्या कडकडाटासह कोसळणाºया मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. परतीच्या मुसळधार पावसाने सोयाबीन, भात, मका, बाजरी आदी काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. शेतकºयांनी उन्हाळ कांद्यासाठी टाकलेले बियाणे दबले जाण्याची शक्यता असून, उगवलेल्या कांदा रोपाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वेधशाळेने वर्तविल्याप्रमाणे हा परतीचा पाऊस येत्या आठवड्यापर्यंत असाच कोसळत राहिला तर संपूर्ण खरीप हंगाम वाया जाण्याचा धोका तर असणारच त्याचबरोबर शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसणार असल्याचे जाणकार शेतकºयांनी सांगितले.दिंडोरी तालुक्यात रात्रभर पाऊसदिंडोरी : तालुक्यातील सर्व गावांमध्ये रविवारी रात्रभर पाऊस झाल्यानंतर सलग चौथ्या दिवशी सायंकाळी विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला असून, यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. द्राक्षे, भाजीपाला व खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान होत असून, शेतकºयांच्या तोंडचा घास परतीचा पाऊस हिरावून घेत असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. अनेक नदीनाल्यांना मोठे पूर आले. जानोरी येथे मोठा पूर आल्याने काही काळ वाहतूक बंद झाली होती. सध्या दिंडोरी तालुक्यातील काही द्राक्षबागा फुलोºयात असल्यामुळे कुज होण्याची शक्यता आहे. सतत पडणाºया पावसामळे द्राक्षवेलीची पाने जास्त काळ ओली राहिल्यास डावणी, करपा वाढणार आहे. त्याप्रमाणे या परिसरामध्ये टमाटा पीक जोरात होते; पंरतु या पिकाचेही नुकसान होणार आहे. तालुक्यात आता सोयाबीन, उडीद, मूग ही पिके काढणीला आली आहेत. रोज पडणाºया पावसामुळे या पिकांचे नुकसान होणार आहे. परतीच्या पावसामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकºयांनी नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे.