शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

बोराळे गावची केळी थेट परदेशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 22:03 IST

साकोरा : नांदगाव तालुक्यात गेल्या दोन तीन वर्षांपासून कोरडवाहू शेतीसाठी दुष्काळी परिस्थिती असतांना, केवळ गिरणा डॅम धरणाच्या भरवशावर बागायती शेती करणारे गिरणा डॅम खोऱ्यातील आमोदे- बोराळे परिसरातील अनेक शेतकरी दरवर्षी नवीन पिके घेत उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्नात असतात. असाच एक नवीन प्रयोग बोराळे येथील शेतकरी भिलासाहेब दगा सोळुंके यांनी केळीची लागवड यशस्वी केली असून, पहिलीच कटाई करत हा माल भारताबाहेर इराण येथे एक्सपोर्ट करत इतर शेतकऱ्यांच्या पुढे एक नवीन आदर्श ठेवला आहे.

ठळक मुद्दे केळीची पहिलीच कटाई इराणला एक्सपोर्ट

साकोरा : नांदगाव तालुक्यात गेल्या दोन तीन वर्षांपासून कोरडवाहू शेतीसाठी दुष्काळी परिस्थिती असतांना, केवळ गिरणा डॅम धरणाच्या भरवशावर बागायती शेती करणारे गिरणा डॅम खोऱ्यातील आमोदे- बोराळे परिसरातील अनेक शेतकरी दरवर्षी नवीन पिके घेत उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्नात असतात. असाच एक नवीन प्रयोग बोराळे येथील शेतकरी भिलासाहेब दगा सोळुंके यांनी केळीची लागवड यशस्वी केली असून, पहिलीच कटाई करत हा माल भारताबाहेर इराण येथे एक्सपोर्ट करत इतर शेतकऱ्यांच्या पुढे एक नवीन आदर्श ठेवला आहे.नाशिक आणि जळगाव जिल्ह्याच्या बॉर्डरवर गिरणा डॅम धरणाच्या पाण्याच्या भरवशावर वसलेले हे एक बोराळे छोटेसे गाव या गावातील उदरनिर्वाहाचे साधन म्हणून शेती हा प्रमुख व्यवसाय मानला जातो. नेहमी वेगवेगळे प्रयोग करत शेती करणारे भिला दगा सोळुंके हे त्याच्याकडे असणाºया चाळीस एकर क्षेत्रात केळी, ऊस, कपाशी, कांदा अशी पिके त्यांचे दोनभाऊ दादाभाऊ सोळुंके, साहेबराव सोळुंके, भाचा सुवर्णसिंग जाधव व पुतण्या नितेंद्र सोळुंके यांच्या मदतीने हा व्यवसाय करतात. शिक्षक झालेले असले तरी शेती कामात याची बरीच मोठी मदत यांना मिळत असते. त्यांचा लहान पुतण्या बलरामिसंग सोळुंके हा बी एस्सी. अ‍ॅग्री करून नंतर ए बी एम करून त्याला विदेशी मार्केटचा अभ्यास करण्यासाठी मागील चार वर्षात आफ्रिका, दुबई, थायलंड, इराण, इराक, सौदी अरेबिया, कुवेत आदी देशात पाठवून अभ्यास करून घेत मग स्वत:ची शेती आदर्श करण्यास त्यास मदत केली.बोराळे शिवारातील गट नंबर २८४ नंबर मधील नऊ एकर क्षेत्रात त्यांनी २५ जून २०१८ रोजी जैन कंपनीच्या केळी पिकाची लागवड केली होती. योग्य खत, पाण्याचे नियोजन केल्याने पीक पूर्णपणे तयार झाले आणि वर्षभरात स्वत:च्या शेतात लागवड केलेली केळीची पहलीच कटाई आपला पुतण्या बलरामिसंग सोळुंके याने सुरू केलेल्या एक्सपोर्ट व्यवसायामुळे हा माल आता इराणला जाण्याचे त्यांचे स्वप्न साकार झाले आहे.आमचा मुख्य व्यवसाय शेती असून या आधी कांदा, कपाशी आदी पिके घेतली आहेत. मात्र त्या पिकांना योग्य बाजारभाव न मिळाल्याने आता केळी पिकाची लागवड केली. केळीची पहिलीच कटाई इराणला एक्सपोर्ट करण्याचा निर्णय पुतण्या बलरामिसंग याने घेतल्याने मी त्यास होकार दिलाय माझा शेतीमाला थेट परदेशवारीला जात असल्याचे समाधान आहे.भिलासाहेब सोळूंके- शेतकरी, आमोदे ता. नांदगाव.