शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

बेमोसमी पावसाने नाशिककर गारठले

By admin | Updated: February 28, 2015 23:44 IST

बेमोसमी पावसाने नाशिककर गारठले

नाशिक : फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धापासून उन्हाळ्याकडे सुरू झालेली वाटचाल आणि वातावरणात पसरलेला उष्मा अचानक आलेल्या पावसामुळे थंडीत परावर्तीत झाला आणि नाशिककरांनी रात्री पुन्हा थंडी अनुभवली. या थंडीची तीव्रता राज्यात सर्वाधिक होती. जानेवारीच्या मध्यापासून वातावरणातील उष्मा वाढू लागला होता. हे तपमान २० अंशापर्यंत पोहोचले होते. आता उन्हाळा कडाक्याचा पडणार आणि वैशाख वणव्याची झळ पोहोचणार, असा अंदाज वर्तविला जात असतानाच अचानक आलेल्या बेमोसमी पावसाने त्रेधातिरपीट उडाली. सकाळपासूनच आलेल्या ढगाळ वातावरणामुळे दिवसभर थंडीची जाणीव होत होती आणि पाऊस पडेल, असा अंदाज होता. अखेर दुपारी ४ च्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची धावपळ झाली. रस्त्यावरील विक्रेत्यांचे हाल झाले. अनेक रस्त्यांची कामे सुरू असल्याने ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली होती. शहरासह उपनगरांमध्येही झालेल्या पावसाने चाकरमान्यांची, तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. शाळा सुटण्याच्या वेळेस सुरू असलेल्या पावसामुळे विद्यार्थ्यांना मिळेल त्या वाहनाने घर गाठावे लागले, तर अनेक विद्यार्थी भिजतच घरी परतले. कार्यालये सुटल्यानंतर कर्मचाऱ्यांनाही ओलेचिंब होऊन घर गाठावे लागले. त्यामुळे खासगी वाहनांना मागणी वाढली होती.राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये हजेरी लावली. यामुळे आंब्याचा मोहोर आणि गव्हाचे काही प्रमाणात नुकसान झाले. गुजरात सीमेवर तसेच कच्छ परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील बहुतांश भागात पावसाचे वातावरण निर्माण झाले असून, येते एक-दोन दिवस हे वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रात्री दहानंतर पावसाचा वेग अधिकच वाढला. त्यामुळे गारठ्यात भर पडली. (प्रतिनिधी)