शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
2
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
3
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
4
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
5
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
6
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
7
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
8
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
9
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
10
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
11
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
12
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
13
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
14
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
15
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
16
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
17
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
18
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
19
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
20
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा संपावर

By admin | Updated: June 1, 2017 01:20 IST

विविध मागण्यांसाठी १ जूनपासून कळवण तालुक्यातील शेतकरी संपावर जाणार आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकरी बांधवांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी यांसह विविध मागण्यांसाठी १ जूनपासून कळवण तालुक्यातील शेतकरी संपावर जाणार असून, कळवण येथे गुरुवारी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांना किसान क्रांती मोर्चा व कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह शेतकरी बांधव मोर्चाद्वारे निवेदन देणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी बैठकीत दिली.कळवण येथील बाजार समिती आवारात १ जूनपासूनच्या संपाबाबत तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व शेतकरी नेते यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी बांधवांच्या मागण्या मान्य होईपर्यंत संप मागे न घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असून, कळवण तालुक्यातून दूध व भाजीपाला शहरी भागात जाऊ द्यायचा नाही व निर्णय होईपर्यंत पेरणी करायची नाही, असा निर्धार करण्यात येऊन शपथ घेण्यात आली. बाजार समिती आवारात आयोजित किसान क्र ांती मोर्चाच्या शेतकरी पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय पदाधिकारी बैठकीस धनंजय पवार, रवींद्र देवरे, राजेंद्र भामरे, नारायण हिरे, पांडुरंग पाटील, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख कारभारी अहेर आदी उपस्थित होते.,शेतकरी नेते शांताराम जाधव,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितेंद्र पगार,शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष पोपट पवार आदीसह तालुक्यातील महत्वपूर्ण पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थित उपस्थितीत संपन्न झाली .केंद्र व राज्य शासनस्तरावरु न शेतीप्रधान देशात सातत्याने शेतकरीविरोधी धोरण राबविली जात असल्याने शेतकरी देशोधडीला लागला आहे. त्यामुळे उद्योगधंदे व नोकरदारांप्रमाणे महागाई व परीस्थितीनुसार लाभ दिले जातात त्याप्रमाणे शेती हा पण एक मोठा उद्योग असल्याने शेतकर्यांनाही काळाची गरज ओळखुन सातबारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोग लागु करावा,60 वर्षावरील शेतकर्यांना पेन्शन, दुधाला भाव, सक्षम पिकविमा,???त्न अनुदानावर ठिबक व तुषार सिंचन योजना सुरु करावी आदी प्रमुख मागण्या असून मागण्यांची शासनाने दखल घ्यावी यासाठी शेतकरी संपावर जात असून सहभागी होण्याचे आवाहन शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी बैठकीत केले.राज्यातील शेतकर्यांच्या समस्या मार्गी लागत नसल्याने आता शेतकर्यांनी संपाचं हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला असून आता आत्महत्या नाही, तर हक्कासाठी लढाईचा निर्धार बळीराजांनी केला आहे.पेरणीच्या हंगामासमोर संपावर जाण्याचा निर्णय कळवण तालुक्यातील शेतकरी बांधवानी घेतला असून एक तर पिकत नाही आण िपिकलं तर मालाला भाव नाही, त्यामुळे शेतकरी वर्गासमोरच्या समस्या काही कमी होताना दिसत नाही.त्यावरचा उपाय म्हणून शेतकर्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेत असल्याने संपात सर्व शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन कळवण कृषी उत्पन्न बाजार समतिीचे सभापती धनंजय पवार यांनी यावेळी केले .बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितेंद्र पगार, जेष्ठ सेल जिल्हाध्यक्ष रामा पाटील,हरीभाऊ वाघ,वाय एस देशमुख, जगन्नाथ पाटील, प्रदीप पगार ,विलास रौंदळ, कैलास जाधव, सुभाष शिरोरे,शांताराम जाधव,कौतिक गांगुर्डे,संजय शेवाळे,संदीप वाघ, विनोद खैरनार, शितलकुमार आहीरे,नरेंद्र वाघ आदीसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.