शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

बालाजी विवाह सोहळा थाटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:52 IST

गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा... अशा मंगलाष्टकांच्या गजरात आणि व्यंकट रमणा गोविंदा असा जयघोष करत गंगापूर धबधब्याजवळील बालाजी मंदिरात भगवान बालाजी यांचा विवाह सोहळा गुरुवारी (दि. २८) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

नाशिक : गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा... अशा मंगलाष्टकांच्या गजरात आणि व्यंकट रमणा गोविंदा असा जयघोष करत गंगापूर धबधब्याजवळील बालाजी मंदिरात भगवान बालाजी यांचा विवाह सोहळा गुरुवारी (दि. २८) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून गुरुवारी (दि. २१) ब्रह्मोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून, दररोज येथील बालाजी मंदिरात विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रह्मोत्सवांतर्गत गुरुवारी (दि. २८) गोरज मुहूर्तावर देवी पद्मावतीशी भगवान बालाजी यांचा थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. २४) लवाटेनगर येथील महालक्ष्मी मंदिरात देवीला महावस्त्र अर्पण करून लग्नाचे आमंत्रण देण्यात आले होते. यावेळी आनंद जोशी, प्रमोद भार्गवे, राजाराम मोगल, आशिष कुलकर्णी, महेश हिरे, अशोक खोडके आणि अवधूत देशपांडे आदी विश्वस्तांसह शहरातील विविध भागांतून आलेल्या वºहाडी भाविकांची यावेळी सोहळ्यासाठी गर्दी झाली होती.