शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

बालाजी पावला, श्रीराम कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:32 IST

अवसायनात निघालेल्या श्रीराम सहकारी आणि बालाजी सहकारी बॅँकेत महापालिकेने ठेवलेल्या ११ कोटी ७४ लाखांच्या ठेवी जवळपास बुडीतच निघाल्याने पालिकेच्या सन २०१४-१५ च्या आर्थिक लेखा परीक्षण अहवालात गंभीर ताशेरे ओढण्यात आले असतानाच बालाजी बॅँकेकडून १६ लाख रुपये वसूल करण्यात महापालिकेला यश आले आहे.

नाशिक : अवसायनात निघालेल्या श्रीराम सहकारी आणि बालाजी सहकारी बॅँकेत महापालिकेने ठेवलेल्या ११ कोटी ७४ लाखांच्या ठेवी जवळपास बुडीतच निघाल्याने पालिकेच्या सन २०१४-१५ च्या आर्थिक लेखा परीक्षण अहवालात गंभीर ताशेरे ओढण्यात आले असतानाच बालाजी बॅँकेकडून १६ लाख रुपये वसूल करण्यात महापालिकेला यश आले आहे. अंशत: का होईना महापालिकेला बालाजी पावला. आता श्रीराम कधी पावणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.महापालिकेने श्रीराम सहकारी बॅँकेत सन २००१ मध्ये ठेवी व मुदत खात्यात रक्कम गुंतविली होती. त्यात पालिकेतील कर्मचाºयांचा निर्वाह निधी, कर्ज निवारण निधी, घसारा निधी तसेच काही रकमांचा समावेश होता. तसेच बालाजी सहकारी बॅँकेतही सन १९९६-१९९७ या काळात चालू खात्यात ४० लाख रुपये जमा होते. परंतु, सन २००२ मध्ये या दोन्ही बॅँका आर्थिकदृष्ट्या डबघाईला आल्या आणि नंतर अवसायनात निघाल्या. सन २०१४-१५ पर्यंत श्रीराम बॅँकेकडे व्याजाच्या रकमेसह ८ कोटी ६५ लाख ३५ हजार रुपयांची थकबाकी आहे. तसेच २ कोटी ६५ लाख रुपये मुदत खात्यात जमा आहेत. श्रीराम आणि बालाजी या दोन्ही बॅँका मिळून पालिकेची ११ कोटी ७४ लाख रुपयांची रक्कम अडकून पडलेली आहे. सदर दिवाळखोरीत निघालेल्या दोन्ही बॅँकांकडून व्याजासह ठेवी तसेच चालू खात्यातील रक्कम परत मिळावी यासाठी गेल्या १२-१३ वर्षांपासून महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. सद्यस्थितीत दोन्ही बॅँकांवर प्रशासकाची नियुक्ती आहे परंतु, वसुलीबाबत काहीच कार्यवाही होत नसल्याने त्याचा फटका पालिकेलाही बसला आहे. सदर बुडीत रकमेबद्दल सन २०१४-१५ च्या लेखा परीक्षण अहवालात लेखा परीक्षकांनी गंभीर ताशेरे ओढत तत्कालीन पदाधिकारी व अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्याचा शेरा मारला होता. दरम्यान, बुडीत रकमेबाबत पाठपुरावा करणाºया महापालिकेच्या प्रयत्नांना अंशत: का होईना यश आले असून, बालाजी बॅँकेकडून ४० लाखांपैकी १६ लाख रुपये वसूल करण्यात आले आहे. मात्र, श्रीराम बॅँकेकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने सदर वसुली ही डोकेदुखी ठरली आहे.