शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

बागलाणला झिरपले ‘विनायकाच्या’ निधीचे पाझर

By admin | Updated: October 1, 2015 00:14 IST

लाखोंचा निधी एकाच तालुक्यात : जलयुक्त शिवार अभियानाची किमया

नाशिक : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ठरलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील अनेक गमतीजमती आता बाहेर येऊ लागल्या असून, या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी सामाजिक संस्था व विश्वस्त मंडळांनी केलेली ‘सढळ’ हाताने मदत, त्याच तत्परतेने ठरावीक तालुक्यात पळविण्यात आल्याचा आरोप होऊ लागला आहे.नाशिक जिल्ह्णासाठी मुंबईस्थित एका प्रख्यात न्यासाने दिलेल्या एक कोटी रुपयांच्या निधीतील सुमारे ६५ लाखांहून अधिकची रक्कम चार बंधाऱ्यांच्या कामापोटी एकट्या बागलाण तालुक्यातच ‘झिरपल्याने’ त्याविषयी जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आता चर्चा सुरू झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्णातील २२९ गावांमध्ये पहिल्या टप्प्यात सीमेंट प्लग बंधारे, कोटा बंधारे तसेच अन्य जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. हे अभियान यशस्वी होण्यासाठी शासनाने लोकसहभागही वाढविला असून, सरकारी तिजोरीतील खडखडाटामुळे या योजनेसाठी सामाजिक संस्था, कंपन्या, न्यास व विश्वस्त संस्था यांनाही मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार शिर्डी, मुंबईसह राज्यभरातून अनेक ठिकाणांहून जलयुक्त शिवार अभियानासाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मुंबईस्थित अशाच एका सामाजिक न्यासाकडून नाशिक जिल्ह्णातील जलयुक्त शिवार अभियानासाठी सुमारे एक कोटीचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने हा निधी जिल्हा परिषदेकडे जलयुक्त शिवार अभियानासाठी वर्ग केला. जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाने या निधीपैकी तब्बल ६७ लाखांचा निधी बागलाण तालुक्यातील चार बंधाऱ्यांच्या कामांसाठी तरतूद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. वास्तविक पाहता जिल्ह्णात सिन्नर, येवला, नांदगाव व मालेगावसह काही तालुक्यांत आता आतापर्यंत टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. तसेच या तालुक्यांतील काही भागात बाराही महिने दुष्काळ पाचवीला पूजलेला असूनही लाखोंचा निधी एकट्या बागलाण तालुक्यातच कसा ‘झिरपला’ अशी चर्चा सदस्यांमध्ये आहे. काही सदस्यांनी बागलाण तालुक्यात गेलेल्या या न्यासाच्या निधीची चौकशीची मागणी केल्याने जलयुक्त शिवार अभियान चर्चेत आले आहे.(प्रतिनिधी)