शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

बद्रीनाथ यात्रेत नाशिककर सुरळीत

By admin | Updated: June 29, 2015 01:09 IST

बद्रीनाथ यात्रेत नाशिककर सुरळीत

नाशिक : पावसामुळे पहाडी भागात आलेल्या पुराचा फटका बसून बंद झालेल्या बद्रीनाथ यात्रेत नाशिककर सुरळीत असून, ते परतीच्या मार्गावर असल्याची माहिती विविध टुर कंपन्यांनी दिली. बद्रीनाथ परिसरातील पाऊस आता लांबला असला तरी वाहून आलेला मलबा आणि गावांचा तुटलेला संपर्क यामुळे यात्रा स्थगित करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत हा अडथळा दूर झाल्यावर यात्रा पूर्ववत होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांपूर्वी केदारनाथ परिसरात आलेल्या भीषण पुरामुळे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर या भागात यात्रेसाठी जाणाऱ्यांची संख्या घटली होती. दोन वर्षांनंतर येथे येणाऱ्या भाविकांची संख्या वाढण्याची चिन्हे दिसत असतानाच पुन्हा जोरदार पाऊस आल्याने पहाडी भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे बुधवारपासून येथे अनेक यात्रेकरू अडकून पडले होते. त्यांना सोडविण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न सुरू होते. त्यादरम्यान येथील यात्राही स्थगित करण्यात आली होती.नाशिकमधून सुमारे दहा हजार भाविक चारधाम यात्रेला गेल्याचे सांगितले जात असून, त्यामुळे ते सगळे सुखरूप आहेत. त्यांच्यातील बहुसंख्य भाविक परतीच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते आहे. काही भाविक रेल्वेने, तर काही यात्रा कंपनीच्या माध्यमातून तिकडे रवाना झाले आहेत. पाऊस येऊन गेल्यानंतरही गंगोत्री यमुनोत्री यात्रा सुरळीत आहे. बद्रीनाथ-केदारनाथचे दर्शन दोन दिवसांपासून बंद असून, ते लवकरच सुरू होईल, असे सांगितले जाते आहे. नाशिकच्या काही भाविकांनी बद्रीनाथचे दर्शन न घेताच परतण्यास प्राधान्य दिले आहे. दोन दिवसांपासून डोंगराळ भागात होणारा पाऊस थांबला असून, पहाडांमधून वाहून आलेला मलबा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याशिवाय पुरामुळे तुटलेले पूल बांधण्याचे कामही सुरू असल्याने बुधवारपासून यात्रा सुरळीत होईल, अशा सूचना स्थानिक प्रशासनाकडून दिल्या जात असल्याचे भाविकांनी सांगितले. (प्रतिनिधी)