शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
5
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
8
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
9
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
10
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
11
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
12
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
13
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
14
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
15
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
16
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
17
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
18
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
19
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
20
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

बद्रीनाथ यात्रेत नाशिककर सुरळीत

By admin | Updated: June 29, 2015 01:09 IST

बद्रीनाथ यात्रेत नाशिककर सुरळीत

नाशिक : पावसामुळे पहाडी भागात आलेल्या पुराचा फटका बसून बंद झालेल्या बद्रीनाथ यात्रेत नाशिककर सुरळीत असून, ते परतीच्या मार्गावर असल्याची माहिती विविध टुर कंपन्यांनी दिली. बद्रीनाथ परिसरातील पाऊस आता लांबला असला तरी वाहून आलेला मलबा आणि गावांचा तुटलेला संपर्क यामुळे यात्रा स्थगित करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत हा अडथळा दूर झाल्यावर यात्रा पूर्ववत होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांपूर्वी केदारनाथ परिसरात आलेल्या भीषण पुरामुळे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर या भागात यात्रेसाठी जाणाऱ्यांची संख्या घटली होती. दोन वर्षांनंतर येथे येणाऱ्या भाविकांची संख्या वाढण्याची चिन्हे दिसत असतानाच पुन्हा जोरदार पाऊस आल्याने पहाडी भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे बुधवारपासून येथे अनेक यात्रेकरू अडकून पडले होते. त्यांना सोडविण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न सुरू होते. त्यादरम्यान येथील यात्राही स्थगित करण्यात आली होती.नाशिकमधून सुमारे दहा हजार भाविक चारधाम यात्रेला गेल्याचे सांगितले जात असून, त्यामुळे ते सगळे सुखरूप आहेत. त्यांच्यातील बहुसंख्य भाविक परतीच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते आहे. काही भाविक रेल्वेने, तर काही यात्रा कंपनीच्या माध्यमातून तिकडे रवाना झाले आहेत. पाऊस येऊन गेल्यानंतरही गंगोत्री यमुनोत्री यात्रा सुरळीत आहे. बद्रीनाथ-केदारनाथचे दर्शन दोन दिवसांपासून बंद असून, ते लवकरच सुरू होईल, असे सांगितले जाते आहे. नाशिकच्या काही भाविकांनी बद्रीनाथचे दर्शन न घेताच परतण्यास प्राधान्य दिले आहे. दोन दिवसांपासून डोंगराळ भागात होणारा पाऊस थांबला असून, पहाडांमधून वाहून आलेला मलबा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याशिवाय पुरामुळे तुटलेले पूल बांधण्याचे कामही सुरू असल्याने बुधवारपासून यात्रा सुरळीत होईल, अशा सूचना स्थानिक प्रशासनाकडून दिल्या जात असल्याचे भाविकांनी सांगितले. (प्रतिनिधी)