शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

आडसाली उसाकडे अल्पभूधारक शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:10 IST

चांदोरी : वाढत्या महागाईच्या काळात आडसाली उसातून उत्पादन घटू लागल्याने आडसाली ऊसशेतीचे क्षेत्र कमी होत आहे. एकीकडे साखर कारखाने ...

चांदोरी : वाढत्या महागाईच्या काळात आडसाली उसातून उत्पादन घटू लागल्याने आडसाली ऊसशेतीचे क्षेत्र कमी होत आहे. एकीकडे साखर कारखाने आडसाली उसाची उचल नियोजित गळीत हंगामात करीत नाहीत, तर दुसरीकडे ऊसतोडणी मजुरांकडून लूट होत असते, तसेच उसाची उचल १८ ते १९ महिन्यांनी होत असते. परिणामी, आडसाली ऊस उत्पादनात घट होते.

नाशिक जिल्ह्यात द्वितीय पीक घेण्याच्या पद्धतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला. यंदापासूनच आडसाली ऊस क्षेत्राकडे बहुतांश अल्पभूधारक शेतकऱ्यांनी पाठ फिरविली.

त्याऐवजी सोयाबीन, भात, टोमॅटो मका या पिकांना पसंती देत आहे.

ऊस शेतीच्या वाढत्या खर्चाचा आलेख बघता, पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने, ट्रॅक्टर मशागत खर्च मोठ्या प्रमाणात वाढला, रासायनिक खतांच्या किमती वाढल्या, नियोजित हंगामानुसार खतांच्या टंचाईचा फटका शेतीला बसतो.

शेतमजुरांच्या मजुरीची झालेली दरवाढ, मशागतीचा खर्च वाढल्याने आडसाली ऊस उत्पादक शेतकरी दिवसेंदिवस अडचणीत येत आहे.

कारखान्यांकडून ऊसतोडणीचे नियोजनात्मक कामकाज होत नाही. आडसाली उसाचे पीक १८ ते १९ महिने उभे ऊस पीक शेतात असते. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर होतो. १९ महिन्यांच्या ऊस पिकातून वजनात घट होते. उत्पादन खर्च अधिक नफा यांचा मेळ बसत नाही. आडसाली ऊस पीक हे गरीब व मध्यम शेतकऱ्यांना या काळात परवडत नाही.

-----------------

खरीप पिकांच्या उत्पादनाकडे कल

कोरोनाच्या महामारीच्या काळात होणारी अन्नधान्य टंचाई, तसेच खाद्यतेलाचे भडकलेले दर वाढती महागाई यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. खरीप पिकांच्या उत्पादनात धान्य मिळते. आडसाली उसाची वेळेवर तोड होत नाही. साखर कारखान्यांकडून आडसाली ऊस क्षेत्राची वेळेत उचल होत नाही. १८ ते १९ महिने ऊस उभे पीक असल्यामुळे वजनात घट होते. एकरी १५ ते १७ हजार रुपयांचा तोटा होतो.

- नीलेश शिंदे, शेतकरी चांदोरी