शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधरांची पुनर्मतदार नोंदणी अशक्य

By admin | Updated: September 13, 2016 01:12 IST

प्रस्ताव : नाशिक, अमरावतीला मिळणार सूट

नाशिक : विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दर सहा वर्षांनी मतदारांची नव्याने नोंदणी करण्याची कायद्यात असलेल्या तरतुदीचे पालन करण्याचा दंडक सर्वोच्च न्यायालयाने घालून दिल्यानंतर तोंडावर येऊन ठेपलेल्या राज्यातील नाशिक व अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक घ्यायची की, नव्याने मतदार नोंदवायचे अशा संभ्रमात सापडलेल्या राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवून वस्तुस्थिती अवगत करून देण्याचा निर्णय घेतला आहे. तसे न झाल्यास येत्या १ आॅक्टोबरपासून नव्याने पदवीधरांची नोंदणी करावी लागणार आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ज्या प्रमाणे सहा वर्षांनी नवीन मतदारांची नोंदणी होते, तशीच नोंदणी पदवीधर मतदारसंघातही आजवर केली गेली, परंतु गेल्या वर्षी केंद्रीय निवडणूक आयोगाने सन २००९ मध्ये झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत जी मतदार यादी वापरण्यात आली ती तशीच कायम ठेवण्यास मान्यता देऊन या यादीचे पुनर्निरीक्षण करण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता व त्याचा आधार घेऊन आॅक्टोबर २०१५ मध्ये पदवीधर मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येऊन नवीन मतदारांची नोंदणीही करण्यात आली व त्यानंतर पुरवणी यादीही नोव्हेंबर २०१५ मध्ये जाहीर झाली होती. राज्यातील नाशिक व अमरावती या दोन विभागांत पदवीधर मतदारसंघाची मुदत ५ नोव्हेंबर २०१६ रोजी संपुष्टात येत असून, तत्पूर्वी या दोन्ही मतदारसंघात निवडणूक घ्यावी लागणार आहे. प्रशासकीय यंत्रणा त्या कामात व्यस्त असतानाच, चार दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देत, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत घटनेत असलेल्या तरतुदींचा विचार करता, निवडणुकीपूर्वी या मतदारसंघात नवीन मतदार यादी तयार करण्याच्या सूचना दिल्या व येत्या १ आॅक्टोबरपासून नवीन मतदार नोंदणी सुरू करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या सूचनेने निवडणूक अधिकाऱ्यांची धावपळ उडालेली असतानाच, या निर्णयाबद्दल राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनाही अवगत करण्यात आलेले आहे. नाशिक व अमरावती विभागांत ५ नोव्हेंबर पूर्वी निवडणूक होणार असून, तत्पूर्वी १ आॅक्टोबरपासून मतदार नोंदणी हाती घेतल्यास एका महिन्याच्या कालावधीत हा कार्यक्रम पूर्ण होणार नाही, शिवाय या निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात लागू होण्याची शक्यता आहे, या सर्व कार्यक्रमास किमान दोन महिने लागतील.