शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

पदवीधरांची पुनर्मतदार नोंदणी अशक्य

By admin | Updated: September 13, 2016 01:12 IST

प्रस्ताव : नाशिक, अमरावतीला मिळणार सूट

नाशिक : विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दर सहा वर्षांनी मतदारांची नव्याने नोंदणी करण्याची कायद्यात असलेल्या तरतुदीचे पालन करण्याचा दंडक सर्वोच्च न्यायालयाने घालून दिल्यानंतर तोंडावर येऊन ठेपलेल्या राज्यातील नाशिक व अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक घ्यायची की, नव्याने मतदार नोंदवायचे अशा संभ्रमात सापडलेल्या राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवून वस्तुस्थिती अवगत करून देण्याचा निर्णय घेतला आहे. तसे न झाल्यास येत्या १ आॅक्टोबरपासून नव्याने पदवीधरांची नोंदणी करावी लागणार आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ज्या प्रमाणे सहा वर्षांनी नवीन मतदारांची नोंदणी होते, तशीच नोंदणी पदवीधर मतदारसंघातही आजवर केली गेली, परंतु गेल्या वर्षी केंद्रीय निवडणूक आयोगाने सन २००९ मध्ये झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत जी मतदार यादी वापरण्यात आली ती तशीच कायम ठेवण्यास मान्यता देऊन या यादीचे पुनर्निरीक्षण करण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता व त्याचा आधार घेऊन आॅक्टोबर २०१५ मध्ये पदवीधर मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येऊन नवीन मतदारांची नोंदणीही करण्यात आली व त्यानंतर पुरवणी यादीही नोव्हेंबर २०१५ मध्ये जाहीर झाली होती. राज्यातील नाशिक व अमरावती या दोन विभागांत पदवीधर मतदारसंघाची मुदत ५ नोव्हेंबर २०१६ रोजी संपुष्टात येत असून, तत्पूर्वी या दोन्ही मतदारसंघात निवडणूक घ्यावी लागणार आहे. प्रशासकीय यंत्रणा त्या कामात व्यस्त असतानाच, चार दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देत, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत घटनेत असलेल्या तरतुदींचा विचार करता, निवडणुकीपूर्वी या मतदारसंघात नवीन मतदार यादी तयार करण्याच्या सूचना दिल्या व येत्या १ आॅक्टोबरपासून नवीन मतदार नोंदणी सुरू करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या सूचनेने निवडणूक अधिकाऱ्यांची धावपळ उडालेली असतानाच, या निर्णयाबद्दल राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनाही अवगत करण्यात आलेले आहे. नाशिक व अमरावती विभागांत ५ नोव्हेंबर पूर्वी निवडणूक होणार असून, तत्पूर्वी १ आॅक्टोबरपासून मतदार नोंदणी हाती घेतल्यास एका महिन्याच्या कालावधीत हा कार्यक्रम पूर्ण होणार नाही, शिवाय या निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात लागू होण्याची शक्यता आहे, या सर्व कार्यक्रमास किमान दोन महिने लागतील.