शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
2
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
3
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
4
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
5
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
6
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
7
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
8
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
9
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
10
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
11
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
12
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
13
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
14
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
15
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
16
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
17
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
18
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
19
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
20
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 

आयुर्वेदाला प्राधान्याची गरज

By admin | Updated: August 21, 2016 23:41 IST

श्रीराम सावरीकर : ‘मर्म’ राष्ट्रीय परिषदेमध्ये प्रतिपादन

नाशिक : कुठल्याही आजारांमध्ये आयुर्वेद ही प्रथम उपचार पद्धती असणे आवश्यक आहे. केरळने यानुसार अंमलबजावणी सुरू केली असून, अन्य राज्यांमध्येही आयुर्वेदाला प्राधान्य देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन गुजरात आयुर्वेद विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. श्रीराम सावरीकर यांनी केले.ओजस वैद्य समूह, विश्वगंध आयुर्वेद चिकित्सालय संशोधन केंद्र आणि वैद्यरत्नम औषधशाळा केरळ यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय ‘मर्म’ राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकामध्ये झालेल्या परिसंवादाच्या उद्घाटनाप्रसंगी सावरीकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी के. के. वासुदेवान, वैद्य समीर जमदग्नी, वैद्य श्रीलाल अ‍े. एम. वैद्य, डॉ. अभय कुलकर्णी, वैद्य डॉ. सुदेश कु मार, तुषार सूर्यवंशी आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी सावरीकर म्हणाले, सरकारी पातळीवर आयुर्वेदाला विशेष महत्त्व प्राप्त होण्याची गरज आहे. सरकारने विविध राज्यांमध्ये शुद्ध आयुर्वेदाचे ज्ञान देणारी महाविद्यालये खुली क रण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जोपर्यंत जनसामान्यांमध्ये आयुर्वेदाचे ज्ञान पोहचणार नाही तोपर्यंत आयुर्वेद उपचारपद्धतीबाबत जागरूकता आणि शाश्वती नागरिकांमध्ये येणार नाही. आयुर्वेदिक रुग्णालयांची संख्या वाढविणे ही काळाची गरज आहे. केरळ राज्याच्या धर्तीवर अन्य राज्यांमध्येही आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार व प्रभावी उपचारपद्धतीचा अवलंब होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. आयुर्वेदात १०७ मर्मस्थाने सांगितलेली असून, रोगावर उपचार करताना या मर्मस्थानांचा विचार महत्त्वाचा ठरतो हे लक्षात घेणे गरजेचे असल्याते सावरीकर यांनी यावेळी सांगितले.दुपारच्या अखेरच्या तिसऱ्या सत्रात पुण्याचे वैद्य डॉ. समीर जमदग्नी यांनी उपस्थित सुमारे तीनशे वैद्यांना तीन मर्माविषयीची सखोल माहिती सांगितली. यावेळी त्यांनी हृदय, मेंदू, किडनी विकारांमध्ये पाळावयाची पथ्ये, उपयुक्त औषधांचे वर्णन केले. (प्रतिनिधी)