शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लश्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
4
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
5
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
6
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
7
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
8
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
9
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
10
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
11
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
12
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
13
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
14
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
15
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
16
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
17
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
18
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
19
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
20
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...

अवकाळी पाऊस अन् गारपीटीनंतर द्राक्षबागांवर कुऱ्हाड; पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2022 12:38 IST

प्रत्येक वर्षी पडणारा अवकाळी पाऊस, गारपीट यांमुळे द्राक्ष उत्पादक शेतक-यांचे कंबरडे मोडले असून खर्च होणारे भांडवलसुध्दा निघत नाही.

दिंडोरी (नाशिक)- तालुक्यात मागील आठवड्यांत वादळीवा-यांसह पडलेला पाऊस व गारपीटमुळे द्राक्ष, गहू, कादां उत्पादकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्यांमुळे अनेक शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून वर्षभर शेतात कष्ट करून अवकाळी व गारपीटीमुळे क्षणात पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी द्राक्षबागा तोडण्यात आल्या. प्रशासनाने पिकांचे पंचनामे केले मात्र या नुकसानगस्त शेतक-यांना शासनाची मदत कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

प्रत्येक वर्षी पडणारा अवकाळी पाऊस, गारपीट यांमुळे द्राक्ष उत्पादक शेतक-यांचे कंबरडे मोडले असून खर्च होणारे भांडवलसुध्दा निघत नाही. त्यामुळे दिंडोरी तालुक्यातील बहुसंख्य द्राक्ष उत्पादकांनी द्राक्षबागांना कुऱ्हाड मारली आहे. सतत दोन वर्ष कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे द्राक्ष उत्पादकांचे ऐवढे हाल झाले की, पाच ते दहा रुपये प्रतिकिलोने द्राक्ष विकावी लागली तर काही द्राक्ष उत्पादकानी द्राक्ष बांधावर खुडून टाकली. त्यांत कोरोना संसर्गमुळे मजुरांनी घरी राहणे पंसद केल्यामुळे मजुरांची तीव्र स्वरूपाची टंचाई निर्माण होऊन द्राक्षबागा वेळेस खाली झाल्या नाही. 

परिणामी द्राक्षवेलीला विश्रांतीचा कालावधी मिळाला नाही. त्यांमुळे द्राक्षवेली अशक्त झाल्या. अनेक द्राक्षबागां मालाविना उभ्या राहिल्यां व ज्या द्राक्षबागाना घड निघाले त्या बागाना पुन्हा फ्लोरिंग आवस्थेत अवळाळी पावसाने झोडपल्यांमुळे गळ व कुज झाल्यांमुळे पुन्हा द्राक्ष उत्पादकाचे मोठे नुकसान झाले. ज्या बागा अवकाळीतून वाचल्या त्यांना चालू महिन्यांत झालेल्या वादळीवाऱ्यांसह पडलेल्यां अवकाळी पाऊस व गारपीटीचा मोठा फटका बसल्यांमुळे शेतकरी राजा संपूर्णपणे उध्वस्त झाला आहे.

पडलेला अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे कांदा उत्पादकाचेही नुकसान होऊन विविध रोगाचा  उत्पादक सामना करित आहे. या अवकाळीमुळे कादां पिक पिवळे पडले असून काद्यांची वाढ खुंटली आहे. अनेक रासायनिक औषधाच्या फवारण्या सध्या कांदा उत्पादक घेत आहे तर दुसरीकडे सोंगणीला आलेला गहू, हरबरा पिकांचे नुकसान झाले आहे. 

अनेक शेतकऱ्यांनी गारपीटीनंतर त्वरित सोंगणीला सुरवात केली असून गहू, हरभरा पिकांनाहि नुकसानीचा मोठा फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीचा शेतकरी वर्गाला प्रत्येक वर्षी फटका बसत असल्यामुळे शेतकरी वर्गापुढे शेती करावी की, नाही असा प्रश्न पडला आहे. या नैसर्गिक आपत्ती व पडलेल्या बाजार भावामुळे बळीराजा दिवसोदिवस कर्जबाजारी झाला असून शेती व्यवसाय एका धोक्याच्या वळणावर येवून उभा आहे .

एकीकडे शेतक-यांच्या पिकाला योग्य बाजारभाव मिळत नसल्यामुळे उत्पादन खर्च, रासायनिक खते, रासायनिक औषधे यांचा वाढलेले बाजार भाव त्या तुलनेत पिकांना भाव मिळत नाही परिणामी बळीराजा कर्जबाजारी होत आहे. वारंवार वातावरणात होणारे बदल त्यांमुळे उत्पादन खर्चात झालेली प्रंचड वाढ, नैसर्गिक आपत्ती यांमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. परिणामी आम्ही सहा एकर द्राक्षबागेवर गारपीटीनंतर लगेच तिसऱ्या दिवशी कु-हाड लावली आहे.पडलेल्या भावमुळे द्राक्षबाग पोसणे परवडण्यासारखे नाही म्हणून कर्जबाजारी होण्यापेक्षा द्राक्षबाग तोडणे योग्य आहे - योगेश मालसाने, नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादक निगडोंळ

इतर पिकांचे भांडवल द्राक्ष पिकाला खर्च करून योग्य बाजारभाव मिळत नाही. नैसर्गिक आपत्ती, वाढलेली मजुरी, वाढलेल्या रासायनिक खते व औषधाच्या किंमती, यामुळे उत्पादन खर्च वसुल होत नाही. परिणाम सतत कर्जबाजारीपणा वाढत आहे त्यामुळे आम्ही चार एकर द्राक्षबागेला कुऱ्हाड लावण्याचा निर्णय घेतला आहे-राहूल जाधव, शेतकरी करंजवण

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिक