शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

निरोगी जीवनाबाबत समाजात सजगता आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:16 IST

नाशिक : सुदृढ आणि निरोगी जीवन जगण्यासाठी समाजात सजगता निर्माण होणे गरजेचे आहे, यासाठी सकारात्मक विचार जागृत ठेऊन कार्य ...

नाशिक : सुदृढ आणि निरोगी जीवन जगण्यासाठी समाजात सजगता निर्माण होणे गरजेचे आहे, यासाठी सकारात्मक विचार जागृत ठेऊन कार्य करणे महत्त्वपूर्ण आहे, असे मनोगत ज्येष्ठ समाजसेवक व मानसोपचार तज्ज्ञ डॉ.भरत माेटवाणी यांच्यासह अन्य मान्यवरांनी व्यक्त केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे कोविड १९ आजारासंदर्भात जनजागृतीसाठी आयोजित या ऑनलाइन कार्यशाळेत या कार्यशाळेत डॉ.भरत वाटवाणी यांच्यासह सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ.विजय सुरासे, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.नितीन करमळकर आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. भरत वाटवाणी यांनी आरोग्य शिक्षणातील सर्वांनी समाजभान जागृत ठेऊन कार्य करावे. रुग्णांशी आदराने वागावे, तसेच भावनिक नाते जोडावे. काम करताना प्रतिसादाकडे न पाहता सहानुभूतीने वागावे, तरच काम केल्याचे समाधान मिळते, असे मत व्यक्त केले. सध्याची कोविड१९ आजाराची स्थितीही लवकरच बदलेल, यासाठी आपण खंबीर राहून कार्य करावे. आपली प्रबळ इच्छाशक्ती व सकारात्मतेने कार्य केल्यास नक्कीच यश मिळते, असे त्यांनी सांगितले. डॉ.विजय सुरासे यांनी कोविडचा प्रभाव पुढील काही दिवसात कमी होईल. याबद्दल सोशल मीडियावरील बनावट न्यूज, संदेश पाहून घाबरू नका. आपल्यातील सकारात्मक विचारांचे आदान-प्रदान मोठया प्रमाणात करा. कुटुंबातील व्यक्ती, समाजातील रुग्ण यांच्याशी संवाद साधा. संवादाने नकारात्मक विचारांचे उच्चाटन होते, असे त्यांनी सांगितले.

कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांनी प्रास्ताविकात आरोग्य क्षेत्रातील लोकांचे कोविडविरुद्धच्या लढयात महत्त्वपूर्ण योगदान आहे. आरोग्यसेवांचे कार्य पाहता कोविडची परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल, असे सांगितले, तर कुलसचिव डॉ.कालिदास चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्निल तोरणे कार्यशाळेचे सूत्रसंचलन केले.