शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
4
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
5
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
6
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
7
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
8
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
9
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
10
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
11
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
12
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
13
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
14
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
15
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
16
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
17
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
18
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
19
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
20
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना

रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता हवी

By admin | Updated: January 11, 2017 00:34 IST

रवींद्र सिंघल : रस्ता सुरक्षा सप्ताह उद्घाटन

नाशिक : वाहतूक नियमांच्या वाढत्या उल्लंघनाकडे सामाजिक समस्या म्हणून पाहताना रस्ता सुरक्षेबाबत समाजात जागरूकता आणणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी केले.  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताह उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र कदम, पोलीस उपायुक्त विजय पाटील, श्रीकांत धिवरे, लक्ष्मीकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता रणजित हांडे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक पी. जी. खोडसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर आदि उपस्थित होते.  अपघात कमी करण्यासाठी मानसिकतेत परिवर्तन आणणे महत्त्वाचे आहे. पोलीस आणि परिवहन विभाग मिळून रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता आणण्याचे उपक्रम आयोजित करीत आहेत. अपघाताची नोंद करताना हेल्मेट घातले असल्याबाबत नोंद करण्याच्यादेखील सूचना देण्यात आल्या ते म्हणाले. जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन म्हणाले, विविध गुन्ह्यात होणाऱ्या मृत्यूपेक्षा रस्ते अपघात मानवहानीचे प्रमाण जास्त आहे. बऱ्याचदा अपघातात घरातील कर्तापुरुष गमावल्याने कुटुंबासमोर गंभीर समस्या उभी राहते. त्यामुळे सामाजिक दृष्टिकोनातून असे अपघात टाळणे महत्त्वाचे असून, हे अभियानचे उद्दिष्ट असून, शाळा- महाविद्यालयांना अशा अभियानात मोठ्या प्रमाणात सहभागी करून घ्यावे, अशी सूचना त्यांनी केली. पोलीस उपायुक्त पाटील यांनी वाहतूक नियमांबाबत स्वयंशिस्त महत्त्वाची असल्याचे नमूद करून शिक्षक आणि पालकांची भूमिका जनजागृतीसाठी महत्त्वाची असल्याचे सांगितले. प्रास्ताविकांत कळसकर यांनी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यामागची भूमिका विशद केली. (प्रतिनिधी)